Saturday, 14 November 2015

पुस्तकविक्री आणि जातीय विभागणी

जसा एकेकाळी पौरीहीत्य हा नावाजलेला व्यवसाय होता तसा आता पुस्तके लिहिणे आणि विकणे हा व्यवसाय झालेला आहे. पुस्तकांचे वेड सुमारे २०० वर्षात आपल्या समाजाला लावले गेले. पूर्वी पुस्तकातून ज्ञान येत नव्हते, ते मुखोद्गत असे. जे लहानपणी किवा दिवस रात्र आपण पाठ करतो ते आपल्या मनावर इतके चिकटते कि झोपेतही आपण ते सांगू शकतो. जे शिकायचे वय असते तेव्हाच हे शिकले जाते. नंतर पुस्तकांची मदत घ्यावी लागते. 
force = mass x acceleration, 
energy = mass x (velocity of light) square.
DNA variations = time of existence. 
Natural frequency = root(mass/stiffness)
ज्या घरात आपण राहतो ते घर भूकंपात तग धरू शकते का? हा सिद्धांत आपले घर कसे हादरते व कसे पडते  ह्याला कारणीभूत आहे. उंच टोलेजंग इमारती गुजरातेत बांधल्या आणि त्या भूजच्या भूकंपात पडल्या व असंख्य लोकांना गारद केले गेले, नेपाळमध्ये तेच झाले. आधीही भूकंप होत होते. पण चोरांची घरे दुमजली होती आणि सामान्य लोकांची घरे एकमजली होती. तेव्हा मेले ते चोर मेले. सामान्य मेले नाहीत, कारण त्यांची घरे कुडाची, आणि लाकडाची होती. लातूर, भूज ह्या भूकंपानंतर तिथे मी स्वतः काम केले आहे आणि डोळ्याने बघितले आहे कि परमेश्वराची काठी कशी चालते, तिचा आवाजही येत नाही. मोठमोठे इमले, वाडे आणि बंगले  कोसळले तेव्हा सामान्य लोक तिथे आमच्या आधी येउन त्यांचे लुटलेले सोने शोधून शोधून घेऊन जात होते.
असे अनेक आधुनिक सिद्धांत आम्ही शिकलो आहोत. भूकंपात मरणारे  पापी आणि पुण्यवान वेगळे कसे हे प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांनी पाहता तेव्हाच तुम्हाला ते कळू शकते. समस्त मानव दुसऱ्या जीवाला लुटताना कसलाच विधीनिषेध पाळत नाही. त्यात तो आपल्या जगण्याच्या लढ्यात सृष्टीला सुद्धा सोडत नाही. 
नंतर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही. 
आपण आता मूळ विषयाकडे  वळूया 
सध्या पुस्तकविक्री जोरात करण्यासाठी लोकांनी २ सिद्धांत  बनवले आहेत, ते असे,
१) सवर्ण हे वैदिक आणि बहुजन हे अवैदिक,
२) आर्य हे देव आणि अनार्य हे असुर. 
हे दोन्हीही सिद्धांत कसे फोल आहेत हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल, 
ज्योतिष्य शास्त्रानुसार मानवाचे खालील चार प्रकार बनतात,
सवर्ण म्हणजे ब्राम्हण, आपल्या प्रथा जपणारे कट्टरवादी, त्यांची सहनशक्ती अतिशय अल्प असते, हा त्यांचा दुर्गुण. जेव्हा विश्वामित्राने कर्णाला शाप दिला तेव्हा त्याने हेच सांगितले होते. त्यांची संख्या समाजात आज किती राहिली आहे तर फारफार ३ %. 
त्यानंतर क्षत्रिय वर्णाचा नंबर लागतो, तो थोडा संयमी आहे पण तोही फार सहनशक्ती बाळगत नाही. आपल्या देशात  बंडाळी करणाऱ्या लोकांचा इतिहास तपासला तर त्यांची सहनशक्ती कशी संपली हे वाचकांना नक्कीच लक्षात येईल. 
वैश्य हे तिसरे जातिवंत सहनशील पण  संधी साधून आपला माल विकून मोकळे होतात. 
शुद्र हे पिढीजात सहनशील, त्यांना कसेही रेटा, हाणा, मारा पण ते  सेवाच करत राहणार. 
म्हणजे ह्यातील ब्राम्हण, अर्धे साधन क्षत्रिय, ह्यान्ना सोडून बाकी राहिलेले लोक ह्यांना बहुजन आणि असुर (राक्षस) म्हणायचे. कारण ह्यांची संख्या समाजात ९७% आहे, त्यांची सहानुभूती मिळवून आपली पुस्तके विकायची असल्या घाणेरड्या युक्त्या हे लोक करतात. शिवाय ह्यांच्या विचारात काही तथ्य आहे का हे शोधण्यासाठी राहिलेले ३% ह्यांची पुस्तके वाचतात असा हा १००% ग्राहक गळाला लावायचा धंदा लोक करत आहेत. 
एकवेळ निरीश्वरवादी परवडले पण आपले आत्मघातकी लांडगे किती घाणेरडी कामे करतात ते पहा,
आपलेच काही लोक वैदिक अवैदिक वाद उकरून काढतात, देव-असुर वाद असे माहित नसलेले विषय काढून लिखाण करतात. हे लोक नरकासुर, टिपू सुलतान आणि पेरीस हल्ला हा गरम विषय असल्याने हिरहिरीने त्यावार लिहित आहेत. 
पुढे हेच लोक टिपू सुलतानाची पाठराखण करीत आहेत, हीही त्यांना  काहीच गरज नव्हती. पण आपण अति हुशार असे समजून काहीतरी लिहायचे, त्याचा सर्वांनी शक्य त्या प्रकारे निषेध करावा. टिपू सुलतान हा अतिशय क्रूर, कपटी, हिंदूद्वेष्टा राज्यकर्ता होता हे सुर्याइतके स्पष्ट आहे त्यामुळे त्याची पाठराखण करणे म्हणजे इसीस, तालिबान ह्यांची पाठराखण करण्यासारखे होईल.  
हे कमी झाले म्हणून हे लोक पेरीस मध्ये झालेल्या हल्ल्याला हिंदूंना दोष देत आहेत. ते अमेरिकेला देतच आहे, पण ते त्यानच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत, जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा भारतात परकीयांचे अनन्वित अत्याचार चालू होते. त्यावेळी जे अतिरेकी काम चालले होते त्याला अमेरिका कारणीभूत होती का? इस्लाम्वाद्यांनी हिंदुस्तान वर आक्रमण करून हजारो वर्षे लुट केली त्याला बायबलचा पहिला करार, पलेस्ताइन इस्राईल वाद कारणीभूत आहे असे हे लोक सांगतात. आहे कि नाही हास्यास्पद. हिंदू हे करार करायला गेले होते का? मग त्यांना ह्यात ओढून का आणले जात आहे? हिंदूंनी इस्लामी आक्रमकांना इथे बोलावले नव्हते, इंग्रजांनाहि कधी आम्ही इथे बोलावले नव्हते. इथल्या मातीची सुबत्ता पाहून ते इथे आले, त्यांनी "घी बघितले पण बडगा बघितला नाही" . कुठे ह्यांचे वाद आणि कुठे हिंदुंवर झालेले अत्याचार! काहीही संबंध नाही. फक्त प्रसिद्धी लोलुप, आणि संधिसाधू वृत्तीने काहीतरी लिहायचे आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे. जे आज दुसर्याचा घरात झाले आहे ते पूर्वी अपल्या घरात झालेले होते, व पुढे होणार आहे याचा विचार न करता हे लोक इसीस तालिबान आणि तत्सम दहशतवादी संघटनांची वकिली करताहेत. टिपू सुलतानला महान ठरवत आहेत, अशा लोकांचा जाहीर धिक्कार!!
 

Thursday, 5 November 2015

जातीसंस्थाविरोधी ज्योतिषशास्त्र

जातीसंस्था शब्दाचा अर्थ जन्माधारित जातीसंस्था असाच आहे, हे मी आधीच सांगून लेखाची सुरुवात करतोय.
बरेच विद्वान ऋग्वेदाचे अर्थ/अन्वयार्थ काढून हिरहिरीने वैदिक लोक हे जन्माधारित वर्णव्यवस्थेचे कारक आहेत हे सांगत असतात. हे सगळे विद्वान एकतर पाश्चिमात्य इतिहास संशोधक किवा डॉ. आंबेडकरांचे साहित्य वापरून सगळे दाखले देत असतात. स्वतःचे असे त्यांचे काहीच नाही हे अगदी स्पष्ट होते. क्षत्रिय शब्द हा खेतीय/खतिय ह्या प्राकृत शब्दावरून आला हे वाचून हसू आल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्या खतीय शब्दाला काहीच अर्थ नाही, उलट क्षत्रिय शब्दाला क्षत: त्रायते इति क्षत्रिय हि साधी बाळबोध उत्पती आहे, पण त्यात खेत आणि खेती आली कुठून? उलट जे क्षत्रिय होते त्यांना शेती दिली गेली हे वास्तव आहे. क्षत्रिय वर्णाशिवाय कुठलाही समाज हा पंगु आहे, इतकेच काय गुनाधारित वर्ण आणि कर्म विभाजनाशिवाय समाज प्रगती आणि स्वरक्षण करू शकत नाही. साधी गोगलगायसुद्धा संकटकाळात पोटात पाय घालून घेते. आधी शेती करणारा हिंदू समाज ह्या गोगल गाइपेक्षा स्वरक्षणासाठी अधिक पंगु होता. मध्ययुगात इस ७०० ते १७०० ह्याकाळातही आपला समाज पंगूच होता हे इतिहास वाचून सिद्ध होते. असे का त्याची मुलभुत कारणे ह्यांचा विचार आपण करूया,
१) शेती उघड्या जमिनीवर असल्याने युद्धप्रसंगी तिचे रक्षण करणे अवघड नव्हे अशक्य होते. 
२) शेती करणारा समाज विस्तृत प्रदेशात पसरलेला असल्याने तो विखुरला होता, सीमावर्ती भागात एकत्र होणे शेतीच्या दृष्टीने अशक्य होते. 
३) पाण्याची धरणे, नद्या अडवून शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले जात होते. 
४) शेती व्यवसायात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नव्हते.
५) शेतिअधरित मानव हा अधिकाधिक शाकाहारी बनत चालला होता त्यामुळे हिंसा हा प्रकार शेती समाजाला निषिद्ध होता, 
अशी अनेक कारणे आहेत. 
पशुपालक मानव हा हिंसा करणारा असणार हे नक्की. नंतर हजारो शेती करण्याच्या नादात तो हिंसा विसरून गेला. इतकेच वेदपूर्व काळातील पुरावे पाहून सांगू शकतो. ऋग्वेदात सर्वात प्रथम वर्णांचा उल्लेख आढळतो. पण तो वेगळ्या शब्दांनी व्यक्त केला आहे. विशेषतः तिथे क्षत्रियाला राजन्य शब्द आलेला आहे. तसे पहिले तर राजन हा एक आदरवाचक शब्द आहे इतकेच. पण तूर्तास आपण राजन ह्या रजोगुणी म्हणून राजन्य म्हणूया. 
नंतर ऋग्वेदातच पुरुषसुक्त आलेले आहे, त्यात समाजरुपी पुरूषाचे अनुक्रमे शीर हे ब्राम्हण, हात हे क्षत्रिय, पोट हे वैश्य तर पाय हे शुद्र असे वर्णन आलेले आहे. पण ह्यात कुठेही हे चार वर्ण जन्माधारित आहेत असे म्हटलेले नाही. तर तो इतिहास्कारांचा काढीव अर्थ आहे. पुढे पुरुषसुक्त हे ऋग्वेदात नंतर घुसडले गेले असा तर्क विद्वान काढतात. ह्याचे कारण म्हणे चार वर्णांचा शब्दशः अर्थ पूर्वी ऋग्वेदात कुठेही येत नाही म्हणून. हेही आपण मान्य करूया. 
म्हणजे जन्माधारित वर्णवाद वाढवण्यासाठी पुरुषसुक्त बनवले गेले असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. आता आपण थोडे पुढे जाऊ, ज्योतिष्यशास्त्र भारतीय लोकांना पूर्वी माहीतच नव्हते असे विद्वान समजतात. ते अलेक्झांडर ह्याच्या आक्रमणानंतर ग्रीकांनी भारतात आणले असे विद्वान मानतात. ज्योतिष्यशास्त्राचे जनक वराहमिहिर ह्यांचा काळ इस ५०० ते ६०० असा सांगितला जातो. म्हणजे पुरुषसुक्त समजा ह्याच काळात जरी घुसडले गेले असे मानले तरी न ज्योतिष्यशास्त्र जन्माधारित वर्णांचा पुरस्कार करते न पुरुषसुक्त. 
ज्योतिष्यशास्त्राप्रमाणे दर २ तासाच्या अंतराने जन्माला आलेल्या व्यक्तीचा वर्ण वेगळा असतो. तो सर्वस्वी आकाशातील ग्रह तारे व नक्षत्र ह्यांच्यातील चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतो. म्हणजे ज्योतिष्य शास्त्र जन्माधारित वर्ण व्यवस्थेला मोठा सुरुंग लावणारे आहे. तसेच पुरुषसुक्त फक्त एका सर्वांग आणि मजबूत समाज संस्थेचे वर्णनमात्र आहे.

आता विचार करा कि ह्या समाजात सर्वात वरचे स्थान प्राप्त झालेल्या ब्राम्हणांना पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य ह्यांचा उदो उदो करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा होता का? पण तरीही त्यांनी तो मूर्खपणा केलाच. इतकेच नव्हे तर बरेच ज्ञान शोधणारे आपले पूर्वज हे नुसते ब्राम्हण नव्हते. तेसुद्धा त्याकाळातील पुरोगामी होते. बहुजनांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पुरातन जन्माधारित प्रथा चालूच ठेवल्या. शेवटी पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य सांगणारे हारले आणि नाईलाजास्तव त्यांनीही जन्माधारित जाती-वर्ण ह्यांना होकार दिला, अजूनही आपल्या समाजात गुनाधारित कर्म व्यवस्था येत नाही तोवर आपला समाज पंगूच राहणार आहे. बाकी सगळ्या वल्गना आहेत.


Monday, 21 September 2015

सिंहस्थ (कुंभमेळा) आणि दुष्काळ

मोदी सरकार आले आणि नेमका सिंहस्थ कुंभमेळाही आलाय. पण सरकारची डोकेदुखी वेगळ्या कारणाने वाढली आहे. ते कारण म्हणजे पावसाअभावी पडलेला दुष्काळ. त्यामुळे हा सिंहस्थ कुंभमेळा काय प्रकार आहे जाणून घेण्याची आपली सर्वांचीच उत्कंठा ताणली गेली आहे. तो काही योगायोगाचा भाग आहे का म्हणून सध्याच्या सरकारच्या नशिबी आला ? हेही आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. 
कुंभमेळा आणि आकाशिय ग्रहांचा संबंध आहे हे बहुतेकांना माहित आहे. जेव्हा गुरु हा ग्रह सिंह राशीला येतो तेव्हा कुंभमेळा साजरा होतो हे सर्वाना माहित आहे. म्हणून त्यासाठी आपण आधी गुरु आणि सिंह राशीची माहिती करून घेऊ. गुरु हा पृथ्वीच्या जवळचा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. भौतिकशास्त्रीय दृष्ट्या आपल्या गुरुत्वाच्या शक्तीने सुर्यमालेला स्थिरता देण्याचे काम गुरूच करतो हे शास्त्राज्ञानी आधीच सिद्ध केले आहे. गुरुचे महत्व ज्योतिष्यशास्त्रातही तितकेच आहे. गुरु हा फार महत्वाचा शुभग्रह मानला गेला आहे. विपुलता, धष्ट-पुष्टता, शुभत्व, नैतिकता, भरभराट, वृद्धी, संचय ह्यांचा कारक गुरु हा आहे.
सिंहस्ठ काळात हा गुरु नेमका सिंह राशीला येतो. सिंह रास हि रवीची स्वतःची रास आहे. तसेच ती अग्नितत्वाची रास आहे. मेष, सिंह आणि धनु ह्या अग्नितत्वाच्या राशी आहेत. पण त्यातले त्यात सिंह हि रवीची असल्याने आधीपासूनच जास्त प्रभावी मानली गेली आहे. शिवाय रवि आपल्या सौरमालेचा राजा, असे असूनही हा एक पापग्रह समजला गेला आहे. त्याला उग्रता, राजकीय कठोरता, उष्णता, शुष्कता, ओसाडपणा, अध्यात्म आणि पर्यायाने येणारे वैराग्य ह्यांचा कारक समजले जाते. 
आता थोडक्यात पहा, जेव्हा गुरु हा पिककपाण्याचा व भरभराटीचा कारक असलेला ग्रह जेव्हा सूर्याच्या उग्र राशीला जातो तेव्हा काय होणार? पाउस कमी, उष्णता वाढणार. म्हणजेच थोडक्यात दुष्काळ. 
म्हणजे सिंहस्ठ हा काळ दुष्काळासाठी समजला जाणारा काळ होता व आहे. १७७०, १८७६-१८७७, १९७२ चा मोठा दुष्काळ असताना गुरु धनु राशीला होता, १८९७ ते १८९९ चा दुष्काळ असताना गुरु सिंह राशीला होता. दुष्काळ हा आपल्या पाचवीला पुजला आहे आणि होता. पण त्यावर संशोधन करून काहीतरी तारतम्य काढायचे काम गेल्या १०० वर्षांत कोणीही केले नाही. आता मोदी सरकारची ह्या दुष्काळाने मोठी गोची होणार आहे.
आता आपले पूर्वापार साजरे होत आलेले सण कसे ऋतूचक्राप्रमाणे साजरे केले जात हे थोडे पाहू! लग्नसराई फेब्रुवारी ते जूनचा पाऊस सुरु होईपर्यंत आणि मग परत नोव्हेंबरला तुळशीच्या लग्नानंतर अशी नियोजित केलेली आहे. मोठे सण नवरात्रापासून सुरु होतात ते दिवाळीपर्यंत, म्हणजे नेमके शेतीची कामे संपलेली असतात. शेतकरी जरा निवांत झालेला असतो अश्या वेळी. बलिप्रतिपदा तर सर्वांना माहीतच आहे. यमद्वितीया म्हणजे भाऊबीज हा पुराणातील चांद्रसेनीय कायस्थ लोकांचा सण आहे. चित्रगुप्ताने यमाला मदत केली आणि त्याच्या कामातून सवड मिळवून दिली म्हणून तो त्याच्या बहिणीला भेटू शकला अशी ही कथा आहे अशा इतर अनेक कथा आहेत. सुर्यषष्ठी, रथसप्तमी, शिमगा (होलिका) असे आपले असंख्य प्राचीन सण अश्या प्रकारे ऋतूचक्राप्रमाणे ठरवले गेले होते. गणेश चतुर्थी आणि गणपती हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या साजरा करायला सुरुवात केली. त्यापूर्वी ब्राम्हण लोकांना संकष्टी चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे व्रत माहित होते. कारण आपण आधीच पहिले कि गणपती हि बुद्धी-सिद्धीची देवता आहे. तिची उपासना करायचे सामान्य बहुजन वर्गाला करायचे काहीही प्रयोजन नव्हते.
अगदी अश्याच प्रकारे सिंहस्थ कुंभमेळा हा ह्या काळात येणाऱ्या अवर्षणाच्या दृष्टीने मुद्दाम धार्मिक कार्यासाठी राखून ठेवलेला होता असे पुढे सहज स्पष्ट होते. शेतकरी मर-मर राबतो. त्याला सुद्धा थोडा बदल हवा असतो. युरोप आणि अमेरिकेत असे बदल घडविण्यासाठी नवीन सण जन्म घेत आहेत. आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत सुद्धा असे सण आणि उत्सव नुसते एका वर्षापुरते नव्हे तर अनेक शतकांचा विचार करून ठरवले गेले होते, त्यातलाच हा वैदिक आणि अवैदिकांनी स्वीकारलेला सण म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा हा होय.
दुष्काळाची चाहूल व त्यांचा इतिहास जर समजून घेतला तर त्याचा सामना करायचे योग्य नियोजन आपण करू शकू. 

Saturday, 19 September 2015

महत्वाच्या व्यक्तींच्या जन्मपत्रिका



श्रीकृष्ण
 
पंडीत नेहरु

महात्मा गांधी

इंदिरा गांधी

एडोल्फ हिटलर

बाबासाहेब अ‍म्बेडकर

सचिन तेंडुलकर

अमिताभ बच्चन

नरेंद्र मोदी
आहे कि नाही गम्मत. श्रीकृष्णाची जन्मपत्रिका अशीच नेटवर शोध घेताना सापडली आहे. पण त्यातील अचूकता किती  किती हे मलाही माहित नाही. विशेष म्हणजे ह्या जन्मपत्रिकेत चंद्र, बुध, शनि आणि मंगळ हे सगळेच उच्चीचे आहेत. शिवाय रवि शुक्र आणि गुरु हे स्वराशीचे आहेत. म्हणजे हि पत्रिका थोडी अतिशयोक्ती वाटू शकते. इतकेच. 
 ब्राम्हण घरात जन्मलेला सचिन मैदानावर तुफान खेळत आलाय तो खरा तर जन्माने क्षत्रिय वर्णीय आहे. नेहरू, गांधी, आणि मोदी वेगवेगळ्या जातीतून आलेले पण समाजमनावर गारुड करून बसलेले आहेत. एकाकी लढणारा हिटलर खरा क्षत्रिय होता आत्तापर्यंत जगात झालेल्या सर्वात मोठ्या युद्धाचा कर्ता करविता हा तोच हिटलर. इंदिरा गांधींना वंशपरंपरेने सत्ता मिळाली. पण त्यांच्या मनातील धोरणे वेगळी होती आणि  परिस्थिती वेगळी उद्भवत गेली. इंदिराजींच्या आर्थिक धोरणांचा विचार वेगळ्याने करायची गरज आहे. नाईलाज म्हणून त्यांनी युद्धे केली आणि जिंकली. पण शत्रूच्या आर्थिक दुरवस्थेचा त्यांनी नेमका फायदा उठवला. महत्वाचे म्हणजे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान ह्यांत फार मोठा आर्थिक असमतोल आहे हे विचारात घेणे महत्वाचे आहे.त्यातून त्यांच्या वैश्यत्वाची प्रचीती येते. बाबासाहेब आंबेडकर हे शुद्र वर्णीय होते म्हणून त्यांना शूद्रांचे खरे दुखः समजले. त्यांनी ज्या हिरहिरीने शूद्रांचे नेतृत्व केले असे दुसरा तिसरा कोणीही करू शकला नसता. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शूद्रांच्या अधोगतीची कारणे शोधून काढली व आपली संपन्न घटना निर्माण केली. "जावे त्याचा वंशा" हे म्हणतात ते अजिबात चुकीचे वाटत नाही. घटना लिहिणे हे निर्माणकर्त्याचे क्लिष्ट काम त्यांनी अगदी अचूक करून ठेवले, त्याला तोड नाही. शुद्र वर्णीयांचे ज्ञान हे ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णीयांच्या इतकेच होते ह्याचा पुरावा आपल्यासमोर आणून ठेवला हि त्यांची अपूर्वाई आहे. ते नुसते मानव गणाचे नव्हते तर महामानव होते. इतकेच आपण म्हणू शकतो. त्यांनी वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून त्यावरून जातीवादाची कारणे त्यांनी प्रभावीपणे आपल्यासमोर मांडली. त्या काळात वैदिकांना असा छेद देणे फारच धाडसाचे काम होते.
आता आपण अमिताभ बच्चन ह्यांचा विचार करू. अभिनय क्षेत्रात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने मोठी छाप पडणारा माणूस! पण थोडा अभिताभचा सुरुवातीचा काळ आठवा. उत्तम दिग्दर्शक मिळाल्याशिवाय एका नटाचे काम हे शुन्य असते हे ते परवाच म्हणाले होते. नंतर त्यांचा राजकीय क्षेत्रात शिरल्याचा इतिहास आठवा, त्यांनी तिथे यशस्वी माघार घेतली. ती घेतली नसती तर ते पंतप्रधान सहज बनू शकले असते. ते मुळात कलाकार पिंडाचे आहेत. त्यांना कलेची उपासना करायला आवडते हे त्यांचे अलीकडचे चित्रपट पाहून स्पष्ट होते. म्हणजे ते शुद्र कसे हे स्पष्ट होते. 
थोडक्यात आपण जे जात-जात म्हणतो तसे काहीच नसते. पुढच्या भागात आपण आणखी अशाच पत्रिकांचा अभ्यास करूयात. त्यामुळे ज्योतिष्यशास्त्र म्हणजे नक्की काय हेही आपल्याला स्पष्ट होईल. वरील पत्रिकांचा अभ्यास करताना पत्रिकेतील १२ स्थाने व त्यांचा अर्थ काय हेही खाली दिलेल्या चित्रात स्पष्ट होईल. 
शुभग्रह- चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे आहेत. (खरे शुभ गुरु आणि शुक्र हेच आहेत, बाकीचे चंद्र बुध ज्यांच्या बरोबर असतात तसे वागतात)

अशुभ ग्रह- रवि, मंगळ, शनि, राहू, केतू.
आपण कोण आहोत कसे आहोत हि जिज्ञासा असेल तर अगदी निशुल्क "हिंदू क्यालेन्डर" हे एप  डाऊन लोड करा. आपली जन्मपत्रिका काढा आपला वर्ण, गण जाणून घ्या. आपण ज्या वर्णाचे/गणाचे आहात त्याच्या आत्मविश्वासाने जगा. जातिव्यवस्थेचा अंत करा. ती फक्त एक मध्ययुगीन जंगली संकल्पना होती. विशेषतः तरुण मुला-मुलींनी ह्याचा विचार करायला पाहिजे. गुण बघा, जात आणि पैसे बघू नका, लाथ मारून पैसे काढणारा जोडीदार मिळाला तर आयुष्यात काय कमी शिल्लक राहते??
वाचकांनो कृपया तुमच्या प्रतिक्रिया द्या. 
श्रीरामाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करण्यासाठी http://serveveda.org/?p=87 इथे भेट द्या. श्रीरामाच्या पत्रिकेचा कालखंड अचुकपणे शोधण्याचा दावा i-serve ह्या संस्थेने केला आहे. श्रीरामाच्या पत्रिकेत सर्वच ग्रह उच्चीचे आहेत. शिवाय बाकीचे राहिलेले स्वराशीचे बलवान आहेत. पण एक सत्य त्या पत्रिकेत दिसते कि श्रीराम हे देव गणाचे शुद्र वर्णीय होते. म्हणूनच कैकेयीने त्यांना राजेपद नाकारले का? किवा तेथील वैदिकांना हि बाब खटकली म्हणून त्यांनी रामाला वनवासात पाठवले? भरताची पत्रिका माझ्याकडे नाही. पण कारणे मोठी विचार करण्यासारखी आहेत. श्रीकृष्ण आणि राम उच्च ग्रहयुक्त पण अनुक्रमे वैश्य आणि शुद्र म्हणून जन्माला आले. त्यांना वैश्य आणि शूद्रांचे पुनरुत्थान करायचे होते का? रामाने शबरीची उष्टी बोरे का खाल्ली? गाई-गुरे पाळणारा श्रीकृष्ण आणि वनवासाला जाणारा, पत्नीला त्यागणारा राम ह्यावरून हेच स्पष्ट होते. याशिवाय वैदिक कालखंड आणि त्यात वर्णन केलेली ग्रहस्थिती नक्षत्र कशी अचूक जुळतात हेही मोठे उद्बोधक रहस्य इथे http://serveveda.org/?p=141  पहा. हा संशोधनाचा नवा आयाम आहे. बघूया पुढे काय होते ते!!

Tuesday, 15 September 2015

छत्रपति शिवाजी महाराज:जन्मपत्रिका



मी छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या पत्रिकेने सुरुवात करत आहे. 
मुळात शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद अजूनही पूर्ण निवळला नाही. त्यात त्यांच्या जन्मपत्रिकेच्या (१९-२-१६३० च्या सायंकाळी ६-२६) अभ्यासाने आणखी काही वाद तयार होऊ शकतात. मलाही माझ्या बुद्धिवादी दृष्टीकोनातून त्यांची जन्मतारीख आणि वेळ फारशी अचूक वाटत नाही. मुळात पत्रिकेप्रमाणे त्यांचा वर्ण क्षत्रिय नाही, तर तो वैश्य आहे. ते देव किवा मनुष्य गणाचे नसून राक्षस गणाचे होते, हे त्यांच्या जन्म पत्रिकेप्रमाणे स्पष्ट होते. शिव जन्माची वेळ चूक कि अचूक हि शंका येते, त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. 
१) शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीच्या नवसाने आले हि सत्यकथा किवा भाकडकथा असू शकते. कारण शिवाजींचे नाव कृत्तिका नक्षत्र चरण-२ प्रमाणे "ई" नावाने येते. 
२) शिवा, सिवा, सेवा हि सर्व चाराणाक्षारे एकतर षा-हस्त नक्षत्र कन्या राशी-वैश्य वर्ण -देव गण असे येते. किंवा अद्याक्षरे सा-सी-सू शततारका नक्षत्र,  - कुंभ राशी-शुद्र वर्ण-राक्षस गण असे येते. शेवटी से हे आद्याक्षर पूर्वाभाद्रपदा प्रथम चरण, मनुष्य गण, शुद्र वर्ण असे येते. 
३) पण ठेवलेले नाव आणि प्रचलित नाव ह्यामुळे फारच वादग्रस्त मुद्दे तयार होतात त्यामुळे जे काही इतिहास संशोधकांनी सांगितले आहे त्याचा (म्हणजेच वर दिलेल्या शिवाजी महाराजांच्या पत्रिकेचा) अभ्यास करू. मुद्दे पटले नाहीत तर परत विचार करू. 
अभ्यास- मुद्दे:
***शिवाजी हे राक्षस गणाचे वैश्य वर्णीय होते. राक्षस गण हा भयंकर महत्वाकांक्षा दर्शवितो. शिवाय ज्यामुळे शिवाजींना हि राक्षसी महत्वाकांक्षा मिळाली ते कृत्तिका नक्षत्र इतके दोषास्पद नाही कि त्याला शांती करावी लागते हेही विचारात घेणे महत्वाचे आहे. म्हणजे ते शांतचित्त होते पण तितकेच महत्वाकांक्षी होते. 
*** शिवाजींनी फारच थोड्या वेळी हातात तलवार घेतली हेही ते वैश्य वर्णाचे प्रवर्तक होते असे त्यांच्या वरील पत्रिकेवरून  स्पष्ट होते. 
*** शिवाजींनी परदेशी खाजीन्यांची लुट करवली. आपल्या अधिकाराने शेतसार्यांत मोठे बदल घडविले ह्यावरून ते वैश्य वर्णीय होते असे वाटते. 
*** शिवाजींना किल्ले बांधताना मोठमोठे खजिने सापडले आणि मग त्यांनी स्वराज्य वाढविले हाही भाकड इतिहास असू शकतो. पण शिवाजींना धनाचे आणि सुवर्णाचे महत्व कळले होते हेही ह्या दंतकथातून स्पष्ट होते.
*** सिंह लग्न हे शिवाजींचे खास वैशिष्ट्य. हि अग्नितात्वाची राशी आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मकाळी मोठा दुष्काळ पडला असावा हे सामान्य भाकीत आहे. पण स्वतःच्या मतावर ठाम राहणे हाही सिंह लग्नाचा  एक स्वभाव आहे. सिंह लग्न कुणालाही वश होत नाही हेही एक गमतीचे संशोधन आहे.  
*** सिंह लग्न हे स्थिर लग्न आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थतीत सुद्धा न डळमळणे हा ह्या राशीचा गुणधर्म आहे. हि रवीची राशी असून १२ राशींपैकी रविला मिळालेली १ राशी आहे. चंद्राला सुद्धा १ रास मिळाली आहे. मंगळाला २ राशी, बुधाला २ राशी, गुरूला २ राशी, शुक्राला २ राशी, शनीला २ राशी आणि शेवटी राहू केतुला वरील ग्रहात विभागून मिळालेली प्रत्येकी एक एक रास आहे. त्यामुळे बाकीच्या राशींच्या मनाणे रवि व चंद्र ह्यांच्या राशी कमी लोकांना मिळतात हे स्पष्ट होते.
आता आपण विरोधी मुद्द्यांचा विचार करू. 
^^^ औरंगझेबाच्या दरबारात झालेल्या अपमानाची जी उस्फुर्त प्रतिक्रिया शिवाजीराजांनी दिली ती त्यांच्या वरील पत्रिकेच्या अगदी विरोधी आहे. सहनशक्तीची हि परीक्षा आपल्या अनेक राजे राजवाड्यांची पूर्वी झालेली आहे. त्यात शिवाजींचा आत्मसंयम कमी होता हे हेही शक्य आहे. पण दुसरीकडे ते वरील पत्रिकेत मंगळीक नाहीत. (मंगळ १-४-७-८ किवा १२ व्या स्थानात असणे) त्यामुळे त्यांची त्यावेळी प्रतिक्रिया कशी उमटली हेही महत्वाचे आहे. 
त्यासाठी आपण आधी मंगळीक शब्दाचा अर्थ समजावून घेऊ. पूर्वी मंगळीक एक शाप आणि आशीर्वाद अश्या दोन्ही स्वरुपात होता.
मंगळीक म्हणजे ज्यांचे विवाह ठरायला फार अडचणी येतात असे  स्त्री- पुरुष. कारण मंगळीक माणसाला संसार सुख नसते. आपला जोडीदार लवकर मरतो असा एक अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी संसार करण्यापेक्षा देशसेवा, समाजसेवा, लष्करी नोकरी करून देशासाठी शहीद व्हावे अशी विभागणी आधीच करून ठेवली गेली होती. मंगळीक लोकांना सार्वजनिक जीवनात त्यांच्या अपुऱ्या सहनशक्तीमुळे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागतात. पोटी संतती जन्माला येताना नेमके कापपापी करायची वेळ मंगळीक लोकांवरच येते. 
@ दुसरा अर्थ गरोदरपनात पत्नीला त्रास होतो. संतती जन्मताना पत्नी दगावते. असेही दाखले मिळतात. पुरुष तापट स्वभावाचे असून अनेक अनर्थ स्वतःवर ओढवून घेतात.  पत्नी मंगळीक असेल तर पती स्वतःवर संकटे ओढवून घेतो. 
@ महत्वाचे म्हणजे मंगळीक व्यक्तीला कतर दुसर्या मंगळीक (किवा प्रतिकारक) व्यक्तीबरोबर संसार करणे किवा देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेणे हेच मंगळीक असण्याचे पर्याय उपलब्ध असतात . शिवाजी संयमी होते पण ते मंगळीक नव्हते इतकेच मी वरील पत्रिकेप्रमाणे म्हणू शकतो. 
@  आता पुढचा प्रवाद माझ्या डोक्यात येतो तो असा, कि छत्रपतींची जन्मवेळ अचूक आहे का हा! ते जर मंगळीक असतील तर त्यांचा जन्म एकतर सायं. ६ वाजून २६ मी. च्या पूर्वी सव्वा दोन गुणिले २ असे साडे चार तास आधी झालेला असू शकतो. तरच ते मंगळीक असू शकतात ती पत्रिका आपण पाहू. (१९-२-१६३० च्या सायंकाळी ४-१५)


ही नेमकी मंगळीक पत्रिका आहे, त्यातले प्रमुख महत्वाचे मुद्दे आपण पाहू,
१) लग्नी बुध(शत्रू) राशीचा मंगळ म्हणजे सहकार न करणारे बांधव आणि एत्तदेशीय.  त्यामुळे हतबलता आलेली असणे,  पण हे खरे नाही.
२) पंचमात  उच्चीचा शनि, संभाजी सारखा अलौकिक पुत्र जन्माला घातला, राजारामही तितकाच तुल्यबळ पण तो महाराजांच्या ह्या पत्रिकेत स्पष्ट दिसत नाही. 
३) दशमात शुक्र म्हणजे आईने मोठे केले हे दिसतेच माता हीच पिता असे दिसते.  पित्याच्या दुसर्या पत्नीचा प्रभाव त्रास दर्शविते. पण तसेही नाही.
४) पण ह्या पत्रिकेत केंद्रात शुक्राशिवाय कुठलाही शुभग्रह नाही. त्यामुळे शिवाजीना जी नशिबाची साथ मिळाली ती फक्त देवीच्या व (फारतर) पित्याच्या दुसर्या पत्नीचा कृपेने मिळाली का असा प्रश्न येतो.  दशमात शुक्र उच्चीचा आणि अंशात्मक आहे हे इथे महत्वाचे. 
५) व्ययस्थानात दोन महत्वाचे (राहू -चंद्र) हे ग्रह सुद्धा मोठे प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात. त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला पण तोही अल्पकाळ निघाला.  इतका लहान काळातील कारावास तो ह्या राहू चंद्रामुळे भोगावा लागला हे सत्य वाटत नाही. म्हणजे शिवाजी मंगळीक नव्हते. पण स्वाभिमानी क्षत्रिय होते असे पुढचे अनुमान निघते.
आता आपण थोड्या आधीच्या वेळेचा विचार करू, हि वेळ (१९-२-१६३०) सकाळची ९. १५ ची आहे. तिची वैशिष्ठ्ये पहा,
१) मेष रास लढाऊ वृत्ती दाखवते, क्षत्रिय वर्ण आणि राक्षस गण म्हणजे क्षत्रिय कुलवन्तस हे अगदी शोभून दिसते. 
२) लग्नी मीन राशी (उच्चीचा) शुक्र स्त्री दैवताचा वरदहस्त डोक्यावर दिसतो. आणि तोही प्रथम स्थानात त्यामुळे अदभूत प्रसंगांनी जीवन भरलेले आहे. केंद्रातील हा प्रभावी ग्रह आहे. 
३) तृतीय (भातृस्थानात) राहू आहे. म्हणजे भावंडे जवळचे नातेवाईक मदत करणार नाहीत. 
४) चतुर्थ स्थानात मंगळ आहे. हे मातृस्थान आहे. त्यामुळे आईने शिवाजींच्या मनात बंडाचे विचार तयार केले असे म्हणता येईल. पण मातेशी पटत नाही. जमीन (राज्य) मित्र ह्यांचे सुख मिळत नाही. शिवाय ह्यामुळे शिवाजी मंगळीक होतात. त्याचा विचार आपण वर केलाच आहे. 
५) अष्टमात उच्चीचा शनि, अनपेक्षित धनलाभ, गुप्तधन, पण थोडे आयुष्य. 
६) व्ययस्थानात बुध, गुरु आणि रवि सगळे शनीच्या राशीला म्हणजे निर्बल. कायम अज्ञातवासात जीवन कंठावे लागले. त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला पण तोही अल्पकाळ निघाला. इतका लहान काळातील कारावास तो ह्या गुरूमुळे भोगावा लागला हे सत्य वाटत नाही.
पण त्यांची जन्मतारीख पक्की नसली तरी वेळ चुकणे अशक्य आहे. विशेषत: जेव्हा जिजाऊ राज्याभिषेकाच्या वेळी होत्या तेव्हा त्यांना अंदाजे का होईना जन्मवेळ माहित होती त्यामुळे जन्मवेळ चुकीची असणे अशक्य वाटते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या पत्रिकेचा उहापोह नक्कीच झाला असणार. 
(१९-२-१६३०) सकाळची ९. १५ पत्रिका)



  तर अशा प्रकारे आपण पहिले कि शिवाजी महाराजांची जन्मतारिख जरी पक्की समजली तरी नुसत्या जन्मवेळेने किती वेगवेगळ्या पत्रिका निघतात. शिवाय तारीख बरोबर आहे का हा पुढचा प्रश्न आहेच. पण त्या तारखेदरम्यान आकाशातील ग्रह खरेच प्रभावी होते, उच्चीचा शनी, शुक्र हे त्यातील महत्वाचे होत, म्हणून हीच तारीख (किवा अलीकडे पलीकडे १५ दिवस) त्यांची जन्मतारीख असावी असे समजून आपण पुढे जाऊया. थोडे मागे जाऊन दिनांक १८-२-१६३० ची सायंकाळी ६-२६ ची पत्रिका काढली तर? 



मेष राशी, मनुष्य गण, क्षत्रिय वर्ण व पत्रिका जवळपास वरील क्रमांक १ प्रमाणेच. हि पत्रिका फारच प्रभावी होती. उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, इथे रास बदलते, वृषभ वरून मेष होते. असा ओढून ताणून जन्मपत्रिका काढण्याचा व शिवाजींना क्षत्रिय बनवायचा मी प्रयत्न करतोय असे अनेकांचे मत बनू शकते. पण मी पूर्णपणे ज्योतिष्यशास्त्र ह्या विषयाच्या अनुषंगाने शिवाजींच्या चरित्राचा विचार करतोय. विशेष म्हणजे असा दृष्टीकोन ठेऊन कोणीही ते पूर्वी केलेले नाही. अनेक ऐतिहासिक पुरावे, पत्रे दिली गेलीत पण, त्यात इतिहासाचा किती अपभ्रंश झालाय हे कळायला दिलेले पुरावे अपुरेच आहेत. निदान महान वैदिकांनी (ज्यांना जन्माधारित वर्ण व्यवस्था अजिबात मान्य नव्हती) त्यांनी तरी शिवाजींच्या जन्मपत्रिकेचा उहापोह राज्याभिषेक प्रसंगी करायला हवा होता. तसे केल्याचे कुठेच दिसत नाही. म्हणजे ज्योतिष्यशास्त्र लयास गेले होते आणि जातीव्यवस्था किडीसारखी पसरली होती. पण नंतर अचानक पेशवाईत यज्ञ आणि ज्योतिष्याचा सूळसूळाट सुरु झाला ते कसे? असो. 
म्हणजे शेवटी पत्रिकेत एक दिवसाचा घोळ आहे कि काय? हा घोळ वाटला म्हणून किवा १९-२-१६३० च्या सायंकाळी ६-२६ प्रमाणे ते वैश्य वर्णीय होते म्हणून वैदिकांनी त्यांना राज्याभिषेक नाकारला असेल तर ठीक, पण ते (जन्माधारित) जातीने क्षत्रिय नव्हते म्हणून जर तो नाकारला असेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच!! 
जय भवानी जय शिवाजी ।

Friday, 11 September 2015

देवास अथवा देवीस नैवेद्य कसा दाखवावा

देवीस नैवेद्य कसा दाखवावा
तुळजा भवानीस तीन प्रकारचे नैवेद्य वर्षभर दाखवतात.
गोड नैवेद्य: यात पुरणपोळी, गुळवणी, तिखट आमटी, पालेभाजी, कुरडई, पापडी, भजी, वरण भात व त्यावर तूप इत्यादी यांचा समावेश असतो. 
दही भात नैवेद्य: यात दही व भात यांचा समवेश असतो. 
तिखट नैवेद्य: यात ज्याला बोल्हाई आहे त्यांनी बोल्हाईचे (म्हणजे मेंढीचे) आणि ज्यांना बोल्हाई नाही त्यांनी बोकडाचे मटण व त्याचा रस्सा, कोरडे परतलेले मटण, चपाती किवा भाकरी, कलेजी (शक्य असल्यास) भात, लिंबू, मीठ व कांदा असे पदार्थ येतात. 
हे तिन्ही नैवेद्य विनाखंड देवीस दाखवले जातात. 
विधी: शुद्ध पाणी घेऊन त्याने प्रत्येक नैवेद्याचे ताट देवीसमोर ठेवण्यापूर्वी एक मंडल (चौकोन) काढावा व त्यावर ताट ठेवावे. तेच पाणी घेऊन ताटाभोवती १ किवा ३ वेळा फिरवावे. नंतर ताटातील प्रत्येक पदार्थाचा लहान तुकडा (सगळे तुकडे हातात मावतील अशाप्रकारे) किवा एक एक घेऊन प्रथम देवीच्या मुखास लावावेत, मग उजव्या आणि डाव्या खांद्यास, मग पायास लावावेत. देवीस नमस्कार करावा. हे तुकडे स्वतः खावेत, कीटाकांस, गाईस द्यावेत किवा पायदळी जाणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवावेत. राहिलेला नैवेद्य प्रसाद म्हणून खावा. फेकून देऊ नये.
घरात नैवेद्य दाखवताना हाच विधी करावा. पदार्थ आपापल्या प्रथेप्रमाणे व कुलदैवताप्रमाणे वेगवेगळे असू शकतात. 
देवास नैवेद्य कसा दाखवावा
खंडोबाला नैवेद्य हा गोड नैवेद्य असतो तसेच त्याला वांग्याचे भरीत, दही व भाकरीचा नेवैद्य दाखवतात. विधी वरीलप्रमाणेच करावा. 
इतकेच काय गणपती व इतर घरातील देव ह्यांनाही अशा प्रकारे नैवेद्य दाखविल्यास तो देवापर्यंत पोचतो असे म्हणतात. त्यामुळे घरात सुखशांती नांदते. अन्नधान्याची कमी कधीही पडत नाही. नैवेद्य दाखवणे हा हिंदू  धर्मातील पूजेचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पूजेचे उद्दिष्ट ६० टक्के साध्य होते. 

Sunday, 6 September 2015

भाकड कथा आणि सत्य : गणपती

शंकर पार्वती हे राजन्य (क्षत्रिय) जोडपे होते, पिता बर्याच काळाने (परमुलुखात लढायला गेल्याने) घराकडे परतला, तो इतके दिवस बाहेर राहूनही त्याची पत्नी, तिचे बाळंतपण आणि जन्मलेला पुत्र हे अगदी सुरक्षित राहिले कारण ते एका बलवान क्षत्रिय समाजाच्या आश्रयाला राहत होते. पिता इतके काळ दूर असल्याने पुत्राचा जन्म मळापासून झाला असा तर्क बनला असावा. तोवर पार्वतीने आपल्या पुत्राला मोठे केले. कालांतराने पिता परत आला. तेव्हा एका अनोळखी पुत्राने त्यांची वाट अडवली, त्यांच्यात अतिभयंकर वाद झाला. इतका कि पित्याने पुत्राला मरणप्राय शाब्दिक यातना दिल्या. (महाभारतात धर्मराजाच्या एका चुकीसाठी अर्जुनाला त्याचा वध करणे भाग होते, पण पर्याय म्हणून श्रीकृष्णाने अर्जुन ला धर्मराजाची निर्भात्सना करायले सांगितले, म्हणजे निर्भत्सना करणे वध करन्या इतकेच वाईट कृत्य समजले जायचे) तिथे पार्वती आली आणि हा आपला स्वतःचा पुत्र असल्याचे रहस्य सांगितले, तेव्हा मात्र पिता पुत्राचे वादविवाद कौशल्य पाहून खुश झाला व ह्या मुलाला मी भरपूर ज्ञान देईल असे कबूल केले. गणपतीची जन्मकुंडली नक्कीच त्याचा वडिलांनी पहिली असेल आणि  महाज्ञानी बनेल असे भाकीत वर्तवले. अश्या प्रकारे प्रचंड ज्ञानामुळे त्याचे डोके हत्तीसारखे मोठे असेल असा त्याचा मूळ अर्थ होता पण त्याच्या अपभ्रंशाने गणपतीला सोंड लावली गेली. काळाच्या ओघात हा अपभ्रंश होत असतो. तो  बोलीभाषेतच जास्त झालाय.
पुढे गणपतीने आपल्या चाणाक्ष बुद्धीने मोठमोठी युद्धे लढली व अन्यायकारक शत्रूला पाणी पाजले, म्हणून त्याची दखल समाजाला घ्यावीच लागली. तेव्हा तो बुद्धीची देवता बनला. त्याने उंदरांचा वापर करून शत्रूला नामोहरम केले, म्हणून तो मूषक-अधिपती बनला. हत्तींचा मोठ्या बुद्धीने वापर करून शत्रूला हरवले असा दुसरा अर्थ त्याचा सोंडेतून अभिप्रेत होतो. आत्ताही आपल्याला जगताना काही महापुरुषांना वजा करून जगता येत नाही. तसाच एकेकाळी गणेश हा महापुरुष होता त्याला विसरून समाजाला पुढे जाणे अशक्य होते. गणपतीने फार पूर्वी एक संस्कृती बनवली आणि तेव्हापासून लोक गणपतीचे व्रत/पूजा करू लागले. पुढे इतिहासात अपभ्रंश येत गेले. काही लोक प्रवाद करतात कि पूर्वी आदिवासी लोक हत्तीचे तोंड लाऊन त्यांच्या देवकाचा उत्सव करीत असत. पण मुळात असे विचित्र रूप धारण करायची त्या आदिवासींना गरज काय होती? त्यांच्या अख्याईका इतक्या निरर्थक नसतात हेही तितकेच खरे आहे. तर खरे कारण इतकेच कि गणपती हीच त्याच मागची प्रेरणा होती. सिंधू संस्कृतीच्या अवशेषात सापडलेला गणेश ह्यावरून गणेशाचा काळ बराच सिंधूपूर्व आहे हे दिसते. गणपती शिवपुत्र कसा हेही वरील कथेत स्पष्ट होते. आत्ताचे गजानन रूप आहे ते मोठे मोहक आणि मंगलकारक आहे हेही तितकेच खरे.
ब्रम्हदेवाला चार डोकी असल्याचे आपण चित्रात व अनेक शिल्पात पाहत आलोय. वास्तविक अर्थ चार डोक्यांच्या इतकी बुद्धिमत्ता असलेला असा श्रेष्ठ असाच त्याचा अर्थ होतो. हीच बाब अनेक वैदिक आणि अवैदिक देवतांना लागू होते.  

Saturday, 5 September 2015

भाकड कथा आणि सत्य : खंडोबा

काही संकल्पना व त्यांचा अर्थ.

आपल्या देवांचे खरे स्वरूप काय होते हे समजून घेण्यासाठी काही मुलभुत संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. 
त्यासाठी मुळात ब्रम्हा, विष्णू, महेश हे त्रिकुट काय प्रकार आहे आधी समजून घ्यायला लागेल.
१) तर ब्रम्हा म्हणजे मानवाला ज्ञान देऊन मानव जन्म प्राप्त करून देतो म्हणून त्याला ब्राम्हण वर्णाची प्रतिनिधी मानला आहे. त्याची पत्नी सावित्री, सावित्रीचा अर्थ प्रकाश देणारी, म्हणजे ज्ञान देणारी देवता व कन्या सरस्वती. 
२)विष्णू हा वैश्य (वैशस-ण) वस्तूंची देवाणघेवाण करणारा व त्याद्वारे समाज पोसणारा, पालक आहे. त्याची पत्नी लक्ष्मी हि संपत्तीचे प्रतिक मानली जाते. हा वैश्य वर्णाचा प्रतिनिधी
मानला आहे..
२) महेश हा महीचा ईश, म्हणजे पृथ्वी नियंत्रित करणारा, क्षेत्र नियंत्रित करणारा, संहार आणि नियंत्रण करणारा क्षत्रिय वर्णाचा प्रतिनिधी आहे. शक्ती त्याची पत्नी आहे. शक्ती म्हणजे शस्त्र हेही स्पष्ट आहे.
म्हणजे ह्या वरील तीन वर्णात जन्माला आलेले महापुरुष पुढे त्या त्या प्रतिनिधी देवांचे अवतार मानले गेले असा याचा अर्थ होते. त्यायोगाने खंडोबा व वर्णाने (क्षत्रिय) होता म्हणून त्याला शिवाचा अवतार मानण्याचा प्रघात आहे. आता आपण ,
खंडोबाच्या कथेकडे वळूयात. 
 मल्हारी महात्म्य ह्या ग्रंथात खंडोबाची पूर्ण माहिती मिळते त्याचे २२ अध्याय आहेत. खंडोबाच्या लोककथा, वाघ्या मुरलीची गाणी, जेजुरीच्या परिसरातील महत्वाची ठिकाणे आणि खंडोबाची आरती ह्यांच्याशी जुळणारी माहिती मल्हारी महात्म्य ह्या ग्रंथात आढळते त्यामुळे तीच खंडोबाची मूळ कथा आहे असे समजून त्यावर आपण विवेचन करूयात.
हे २२ अध्याय पुढीलप्रमाणे,  
 १ मंगलाचरण, मणिचूर्ण पर्वतावरील सप्तऋषींच्या कुटिरांचे वर्णन, मल्हासुर कुटिरे उद्ध्वस्त करतो. यज्ञात विघ्ने आणतो त्यांच्या स्त्रिया पळवतो. 
_मल्लासुर नावाचा संबंध मल्लराष्ट्राशी जोडला जातो. मल्लराष्ट्रचा अर्थ मला सामान्य पणे (मल्ल) पैलवान लोकांचा प्रदेश असे वाटते. अशा मल्लाला मारायला नक्कीच तुल्यबळ पुरुष आणावा लागला व तो मल्लारी बनला हेही स्पष्टच आहे.
अशोकाच्या शिलालेखात जो ‘रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले. या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले. गोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते.
_आता इथे ऋषी म्हणजे नेमके कोण ? तर दोन पर्याय  उभे राहतात , एकतर ते वैदिक धर्मप्रचारक नुकतेच (नर्मदे खालील)  मध्य व दक्षिण भारतात आश्रम व्यवस्थेचा स्वरुपात येउन राहायला  लागले होते. त्यांची वैदिक संस्था  उत्तर भारतात बलवान होती.  दुसरा पर्याय म्हणजे ते इथलेच शांत जीवन जगणारे लोक होते व ते आश्रम करून राहत होते. पण हि शक्यता चुकीची वाटते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खंडोबाचा मोठा भक्त वर्ग हा पशुपालक धनगर समाजाचा आहे. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांचा विचार केला तर पशुपालनाचा टप्पा शेतीच्या आधी येतो. खंडोबाची विविध रूपे, त्याचे श्वान, अश्व, पत्नी, तिच्या कथा यावरून  त्या काळातील पशुपालक लोकांचे महत्व अधोरेखित होते. पण पुढचा प्रश्न असा येतो कि पशुपालक लोक भटके होते, ते पशूंच्या चाऱ्यासाठी फिरत होते म्हणजे ते एका ठिकाणी कुटीरे आणि आश्रम तयार करून राहत नव्हते. म्हणजे दुसरी शक्यता चुकीची वाटते म्हणून हे ऋषी हे वैदिक असावेत असेच स्पष्ट होते. 

ऋषी इंद्राकडे जातात. इंद्रदरबाराचे वर्णन, इंद्राची मदत करण्याबाबत असमर्थता, वैकुंठात जाऊन विष्णूची मदत घेण्याचा सल्ला. 
३ वैकुंठाचे वर्णन, ऋषी विष्णूची स्तुती करतात व मदतीची याचना करतात.विष्णू ऋषींसोबत कैलास पर्वतावर येतात.
४ कैलास पर्वताचे वर्णन, कैलासाची शोभा बघून ऋषी व विष्णू यांना झालेला आनंद.
५ शंकराच्या महालाचे वर्णन.
६ शंकर-पार्वती यांच्या दिव्य रूपाचे वर्णन.
म्हणजे याचा अर्थ ह्या ऋषींच्या काही प्रतिनिधींनी उत्तरेतील आपल्या  बलवान वैदिक संस्थेकडे मदत मागितली.  काही जवळच्या वैदिकांनी मदत करण्यास असमर्थता दर्शविली. त्यात काही तांत्रिक कारणांचा (दूरवर जाऊन युद्ध करणे, युद्धाचे उद्दिष्ट) इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.  बहुतेक ह्या वैदिक टोळ्या ज्या मदत करण्यास असमर्थ होत्या त्या ब्राम्हण किवा वैश्य प्रधान टोळ्या असाव्यात त्यांनाच इंद्र आणि विष्णू म्हटले गेले आहे. शेवटी ऋषींचे प्रतिनिधी कैलासा जवळील बलवान क्षत्रिय (शिव) टोळीकडे गेले. तेथील ऋषींनी आपल्या गटातील (जन्माने नव्हे कारण वैदिक जन्माधारित वर्ण व्यवस्था मानत नव्हते) जन्मकुंडलीप्रमाणे पूर्ण संस्कारित बलदंड क्षत्रिय वर्णी तरुणास आमंत्रित निवडले बहुतेक तो सपत्निक असावा. तो उत्तम सेनानी, संघटक, लढवैय्या असावा. तोच हा खंडोबा. 
 ७ ऋषी शंकराची स्तुती करतात, शंकर ऋषीगणांस अभयदान देतो, धृतमरीचा जन्म.
धृतमरी हि एक अन्यायाने शीघ्रकोपी  होणारी क्षत्रियांची उपटोळी होती ती क्षत्रिय वर्ण व पत्रिकेत मंगळ असणारे लोक ह्यांचा हा गट होता . मणी -मल्लांच्या अन्यायाच्या कथा  ऐकून हि टोळी प्रक्षुब्ध  बनली आणि युद्धोत्सुक झाली असा खरा अर्थ अभिप्रेत होतो.
८ शंकर मार्तंडभैरव अवतार घेतो, देवसैन्याचे वर्णन, युद्धास निघतात.
इथे बरेच प्रवाद आहेत, एक मत असे आहे कि, अचानक कडेपठार ह्या ठिकाणी लिंगरुपात खंडोबा (शिव) उत्पन्न झाले. त्यांचे शरीर गरम व लाल झाले होते. (ह्याचा खरा अर्थ कि एखादा सशक्त तरुण कुठूनतरी आत्मज्ञान घेऊन तिथे आला होता) व तो ध्यानस्वरुपात (लिंगरुपात) बसला होता. तेव्हा काही धनगर मुलांनी त्याला पहिले व त्याच्या अंगावर हळद व तूप ओतून शांत केले. 
दुसरे मत असे आहे कि, खंडोबा (शिव) आपल्या पूर्ण सेनेसह (शिवगण), पार्वती, नंदी, गणपती, कार्तिकेय ह्यांच्यासह माणीचूल पर्वतावर अवतारित झाले. पण हे पुढे आपोआपच खोटे ठरते. कारणे पुढीप्रमाणे,
_ खंडोबा अवतारात नंदी नसून पांढरा घोडा आहे, उत्तरेतून इतक्या त्वरेने यायला घोडा हेच उपयुक्त साधन वाटते. नंदी म्हणजे जुळवाजुळव केलेली वाटते. वाघ्या कुत्र्याचे हि तसेच म्हणावे लागेल. कारण कुत्रा हा प्राणी मानसशास्त्रीयदृष्ट्या मानवाच्या अतिशय जवळचा समजला जातो त्यामुळे तो खंडोबाने मनीचूल पर्वतावर प्राप्त केला असे होणे साहजिक आहे. 
_पार्वतीचा अवतार असलेली म्हाळसा हि खंडोबाला महाराष्ट्रात नेवाश्याला येउन मिळाली असा समज आहे. मग जी त्याचा बरोबर आली होती ती कोण? त्यामुळे खंडोबा हा सहपरिवार सापत्न जेजुरीला आला नाही हेच सिद्ध होते. 
_ तिसरे आणि सगळ्यात महत्वाचे हे स्पष्ट होते कि खंडोबा हा उत्तम नेतृत्व गुण असलेला तरुण आपल्या थोडक्या सेनेसह जेजुरीत अवतरला. त्याने इथल्याच लोकांचे संघटन उत्तमप्रकारे केले. शिवाय  खंडोबाचा जन्म व बालपण ह्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. विवाह आणि तत्सम कथा भरपूर आहेत पण जन्माची एकही कथा नाही तिथे अवतार ह्या अविश्वसनीय गोष्टीकडे सगळेच साहित्यिक घुसतात. अवताराचा खरा अर्थ मी लावलाय तोच जास्त सत्याचा जवळ जाणारा आहे. कारण खंडोबाच्या जन्माच्या विषयी फक्त "चंपाषष्ठी दिवशी अवतार धारीशी" इतकेच कळते. पण अशाप्रकारे अचानक अवतार घेण्याच्या भाकडकथेपेक्षा खंडोबाचे अवतृत (म्हणजे घोड्यावरून जमिनीवर उतरणे) हेच जास्त खरे वाटते.
९ मल्लासूरास देवसेनेच्या आक्रमणाची खबर मिळते, दैत्यगणांची युद्धतयारी.
१० युद्धाचे वर्णन.
११ कार्तिकेय व खंडगदृष्याचे युद्ध, कार्तिकेयाचा विजय.
१२ गणपती व उल्कामुखाचे युद्ध,गणपतीचा विजय; नंदी व कुटिलोमाचे युद्ध नंदीचा विजय.
कार्तिकेय आणि गणपती हे पूर्वीच्या क्षत्रिय युद्ध करणाऱ्या टोळ्यांचे महत्वाचे सल्लागार होते . त्यांनी नाना योजना  आणि युक्त्या करून शत्रूला नामोहरम केले .
१३ मणिदैत्य व खंडोबाचे युद्ध, मणीचा वध.
१४ विष्णू मल्लासूरास समजावण्याचा प्रयत्न करतात, मल्लासूर सल्ला धुडकावून युद्धास जातो.
१५ धृतमरी आणि मल्लासूराचे युद्ध, धृतमरीचा पराभव.
१६ मल्लासुराचे व खंडोबाचे युद्ध, मल्लासूराचा पराभव.
१७ मल्लासुराकडून खंडोबाची स्तुती, खंडोबा मल्लासुरास वर देतो.
१८ ऋषींच्या विनंतीनुसार मणिमल्लांच्या वधस्थळी दोन लिंगे प्रकट होतात, देवगण त्यास्थळी तीर्थयात्रेसाठी येतात.
१९ प्रेमपुरी यात्रेचे महत्त्व, .
२० प्रेमपुरी स्थळाचे वर्णन.
२१ खंडोबाच्या पूजेचे माहात्म्य.
२२ ग्रंथ वाचून मिळणारे फळ.
इथे  कथेत  किती सत्य आहे आणि असत्य आहे  हे आपण बाजूला ठेऊ , आणि मानवाच्या सांस्कृतिक टप्प्यांचा विचार करू,
१) सगळ्यात प्रथम अवतार हि कल्पना वादग्रस्त ठरते.
२) खंडोबाच्या कथेत वैदिकांनी अनेक ढवळाढवळ केले असा लोक आरोप करतात. तत्कालिक  वैदिकांना माता पिता ह्यांच्या नावापेक्षा गुणाने सक्षम असलेला समाज अपेक्षित होता. आज आपल्या देशाच्या सीमेवर जे सैनिक जातात त्यात आपल्या आई-बाप व त्यांचे घराणे मोठे म्हणून जाणारे सैनिक किती आहेत?. जातीव्यवस्था आणि निरपेक्ष वैदिक व्यवस्था ह्यातील हाच फरक आहे.
३) वैदिक निरपेक्ष धर्म सुधारक होते, त्यांनी नासदीय सुक्तात स्पष्ट सांगितले आहे कि परमेश्वर जो सगळी सृष्टी नियंत करतो तो कोण आहे? (हे आम्हालाही माहित नाही) तो हे कुठून करतो, का, कसे करतो कुठे लपून बसला आहे , तोच हा प्रचंड अंधक्कार आणि प्रकाश आहे का? असे नुसतेच त्यांचे प्रश्न!! 
वैदिक अवैदिक लढा असा पूर्वापार चालू आहे. आई-बापाच्या नावाशिवाय कर्मावर माणसाचे गुण ठरवणारे हे मूळ वैदिक होते, त्यांनी जन्माप्रमाणे जातीसंस्था ह्यावर विजय मिळवण्यासाठी मोठी ग्रंथ निर्मिती केली. तिला आपण जातीयवादी म्हणून हिणवत गेलो. पण खरे जातीयवादी आपण अवैदिक लोकच आहोत. आपल्या पुत्राप्रेमाच्या, सम्पतीच्या हव्यासापायी आपण आपले पुत्र पोत्रदि ह्यांना आपले सगळे अधिकार देत गेलो. मुला/मुलीच्या गुणांप्रमाणे त्यांनी  


















































Saturday, 29 August 2015

जन्मपत्रिकेतील चार वर्ण व तीन गण.

आता  आपण जन्मपात्रिकेतील चार वर्ण आणि त्यांचे स्वभाव कसे ते बघूया.
१) ब्राम्हण वर्ण:
_हा कधीही व्यायाम करून शरीरयष्टी बळकट करणार नाही.
_बोलणार अतिशय मोजके. पण ह्याची एखाद्याशी नाळ जुळली कि त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो.
_स्वतःची शारीरिक आणि मानसिक कमजोरी हुशारीने लपवून ठेवणार आणि दुसर्याच्या मर्मावर बरोबर बोट ठेवणार!
_अति उन्ह, थंडी, पाऊस अशात ह्याला लगेच त्रास होतो.
_स्वतःच्या वेळा अगदी पळणार. दुसर्यांच्या वेळेची फारशी तमा बाळगत नाही. 
_स्वच्छता जरी म्हणत असला तरी त्याची फार तमा बाळगत नाही.
_स्वतःच्या खिशातले पैसे कधीच काढणार नाही. गावाबाहेर गेला तर सर्व नातेवाईक ह्यांचे पत्ते नीट जपून ठेवणार.
_विश्वातील सगळे सत हे आपल्याच मुळे अबाधित राहिले आहे असा प्रत्येक ब्राम्हण वर्णीयाचा समज असतो.
_समोर वाघ काय साधे कुत्रे जरी आले तरी हा पळून जातो.
अश्या अनेक गमतीजमती आहेत ह्या ब्राम्हण वर्णाच्या.

२) आता शुद्र वर्णाकडे वळू.
_मुळात शुद्र म्हणजे शू: ह्या शौच, तथा शुचिता आणि पुढे स्वच्छता ह्या शब्दाचे कारण आहे. द्र हा देणारा द्र आहे. शुचिता देतो तो शुद्र. असा मूळ वैदिक अर्थ आहे. _स्वभावाने सगळ्यात आळशी हा शुद्र. त्याला उठवून उठवून कामाला लावावे  लागते. शेवटी जे शिल्लक राहते ते त्याला काम करावे लागते हा यज्ञ संस्थेतील मूळ अर्थ वैदिकांना माहित होता. म्हणून सगळा सोहळा आटोपला कि जागा होऊन साफसफाई करणारा हा वैदिक शुद्र होय.
_नंतर हा अर्थ काही कारणांनी अधिक विस्तृत होत गेला.
_शूद्राला स्वतःचे मत तयार व्हायला थोडा अधिक जास्त काळ लागतो. पण ज्यावेळी त्याचे स्वतःचे मत प्रगल्भ नसते तेव्हा तो जे त्याला पटलेले आहे त्याला पूर्णपणे चिकटून राहतो.
_शूद्राची कष्ट करण्याची क्षमता अफाट असते. तो शारीरिक श्रम किवा मानसिक श्रम अफाट करू शकतो. पण त्याला अजिबात जाणीव करून देऊ नका कि तो कष्ट करतोय ती. एखादे गाणे गुनगुनत तो संपूर्ण घर धुवून काढेल, किवा २४ तास नेटवर मान मोडून एखादा शोध घेत राहील.
_ तुमच्या दारात एखादे कुत्रे, किवा गाढव मरून पडले तर उचलायला दोनच वर्ण पुढे येतात ते म्हणजे शुद्र आणि क्षत्रिय.   

३) आता आपण क्षत्रिय वर्णाकडे वळू, ह्या वर्णातील वैदिकांचा क्षत्रिय आणि शेतकऱ्यांचा क्षेत्रीय ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. वैदिक क्षत्रिय हा क्षत करणारा क्षतिःय, क्षत्रप असा आहे त्याचबरोबर क्षत्रपाळ, म्हणजेच छत्रपाल हा शब्द पुढे आला नंतर त्याचे छत्रपति अशी व्युत्पत्ती झालेली आहे. त्याआधीच ग्रामीण भागातील मोठमोठ्या शेत्या ह्या क्षेत्रीय, शेतकरी लोकांनी पटकावल्या. शिवाय वैदिकांनीही त्यांना गपचूप मान्य करून घेतले. कारण त्यांना क्षत्रिय शुद्र हा सगळा समाज आयता मिळाला होता. त्यांनी आपली जुनी वर्णीय नावे नवीन लोकांना चिकटवली. शेतकरी हे लोक साधे होते त्यांनीही आपल्या आजच्या संस्कृत संशोधकांसारखे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र ह्या शब्दाचे अर्थ जुळवायचा प्रयत्न केला. वैदिकांनी दरवेळी त्यांना जो त्यांच्या धर्माप्रमाणे अर्थ अभिप्रेत होता तोच सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकून घेतोय कोण? ज्याला सगळ्यात मोठा वाटा मिळालाय तो कशाला पुढे येउन आपल्या वाट्यात  वाटेकरी करून घ्यायला तर होणार? विस्तृत जमिनीबरोबर बहुपत्नीत्व ह्यासारखी अनेक सुखे आपोआपच क्षेत्रीय लोकांना प्राप्त झाली. सत्युगात एकपत्नी राम झाला आणि पुढे तोच कृष्ण कसा झाला ह्यातले गूढ हेच आहे.
 वैदिक स्वतःच्या लढवैय्या समाजाची संख्या वाढवण्यात विलक्षण चाणाक्ष होते. पण नाईलाजास्तव त्यांना आता एका अनोळखी लोकांना क्षत्रिय समजून त्यांची संख्या वाढवायला मूक अनुमती द्यावी लागली. वैदिक इथे काहीच करू शकत नव्हते. ते मोठे तत्वज्ञान सांगू शकत होते पण समाजात बदल घडवून आणण्याइतकी त्यांची शक्ती नव्हती. आत्ताही तेच चालू आहे, हे नीट विचार केला तर चटकन लक्षात येते. .....contd

Sunday, 2 August 2015

पुरोगाम्यांचा सूळसूळाट?

पुरोगाम्यांचा सूळसूळाट
 लेखाचा विषय जरा कटू शब्दाने वर्णीत केला आहे पण मुळात पुरोगामी ह्या शब्दाबद्दल काही फार राग नाही, पण कधी कधी असे वाटते कि तथाकथित पुरोगामी लोक आपल्या समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास एका विचित्र अलिप्त टोकावरून करत असतात. त्यांनी आपल्या देशाचा खालीलप्रमाणे अभ्यास, करणे गरजेचे आहे
  • भौगोलिक स्थान,
  • कटू-गोड इतिहास,
  • लोकांच्या उपजीविकेची साधने,
  • इथे जन्मलेले धर्म व विचार
कॉंग्रेसचे विचार पुरोगामी होते असे वाटून भारतीय जनतेने त्यांना ६० वर्ष वंशपरंपरागत सत्ता भोगायला दिली. सुरुवातीला ते पुरोगामी विचार मोठे रोचक वाटत होते, पण नंतर नंतर त्यातला फोलपणा स्पष्ट होत गेला. आणि मे २०१४ ला ऐतिहासिक सत्तापालट होऊन कोन्ग्रेस हा पुरोगामी पक्ष विरोधी नेतेपदाची दावेदारीही सांगू शकला नाही. हजारो वर्षे पुरोगामी विचारांचा लढा देणाऱ्या आपल्या देशाने हा विचार का केला? का नाकारले ह्या पुरोगामी पक्षाला? ह्या लेखात पुरोगामी नावाखाली सध्या काय चालू आहे, काय आहे, ह्याचा उहापोह केला आहे.
  
१) सध्याचे पुरोगामित्व हे भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाला अधोगामी ठरवत चाललेले पुरोगामित्व आहे. बरेचसे पुरोगामी देशाचे व समाजाचे  वाट्टोळे हे वैदिक ह्यांनीच केले हे पटविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात.  पुरोगामी विचारतात कि समजा सगळे मुस्लिम भारतातून निघून गेले तर आपले सगळे प्रश्न संपतील का? त्यांना एक प्रश्न विचारायला हवा कि, वैदिक शिल्लकच नाहीत, ते संपुष्टात आल्याने समाज फार बदललाय का? समाजाचे सगळे प्रश्न सुटलेत का? ज्यांनी आत्तापर्यंत ज्ञान आपल्या ताब्यात ठेवले ते ते तथाकथित वैदिक तर परदेशात पळून गेलेत. थोडेफार राहिलेत तेही पळून जायच्या मार्गावर आहेत. मग उच्चवर्णीय राहतात कोण? तर राहतात क्षत्रिय, (म्हणजे मराठे) त्यांना फक्त लढायला लावले गेले. लढायला लावणारे जसे वैदिक होते तसेच वैश्य व शुद्रही होते, कारण लढणे हि सामाजिक जबाबदारी होती. शुद्र आणि वैश्य आम्ही लढायला जबाबदार नाही असे म्हणून हात काढून घेते झाले नसतील हे हे सत्य असू शकते. 

दहशतवादाचे उद्दातीकरण
इतिहासाचे दाखले देताना पुरोगामी नेहमी वेद, त्यातील हिंसा, वैदिक वान्ग्मायाचा भंपकपणा ह्यावर हिरहिरीने लिहितात पण पण इतर धर्मातील हिंसा व त्यातील दाखले ह्याबद्दल नेहमीच आदराने बोलतात. त्यांच्या ह्या लूटमारीत किती पुरुष मेले, किती बायकानची अब्रू लुटली गेली, किती गुलाम देशातून बंदी बनवून नेले गेले ह्याचा आकडा हे पुरोगामी शोधत नाहीत. 
पुरोगामी संकल्पना
पुरोगमी म्हणजे आपल्या जुनाट संस्कृतीला नावे ठेवणे असे झाले आहे. त्यापेक्षा आपले पूर्वज कशा प्रतिकूल परिस्थितीत राहत होते. प्रतिकूल जीवन असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण संकल्पना जन्माला घातल्या. ह्यांचा पूर्ण अभ्यास न करता विचार करणे म्हणजे पुरोगामी असे पुरोगामित्वाचे स्वरूप झालेले आहे. त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी ह्यातील सीमारेषा आपली चिकित्सावृत्ती आणि प्रतिगामी लोकांचे जीवन जाणून घेण्यावरून अवलंबून आहे. आत्ता आपण एक रात्र वीजपुरवठा बंद झाल्यास नुसते उकाड्याने अस्वस्थ होण्याशिवाय अनेक प्रश्नांना आपण तोंड देतो. आत्ताची पिढी रात्री भटकण्याला पुरोगामी समजते. पण हे इतिहासात किती अवघड होते? आत्ताही काहींना ते सोपे असले तरी काही अपवाद वगळता सर्वांना ते चमत्कारिक वाटते!

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था
कोणत्याही धर्माचा व त्यातील गुणावगुण ह्यांचा अभ्यास नुसताच इतिहासावरून होत नसतो, त्यासाठी तो धर्म जिथे स्थापला गेला, वाढला त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची जीवनपद्धती, उत्पन्नाची साधने, भौगोलिक स्थान हेही विचारात घेणे महत्वाचे असते.
१) हिंदू धर्माचा अभ्यास करताना नुसतेच वैदिक व इतर असा विचार करणे चूक आहे, त्यासाठी हिंदू धर्माची इतर धर्मांशी तुलना केली तर फारच महत्वपूर्ण माहिती हाती लागते.
अ) हिंदू धर्म जिथे वाढला तिथे शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. तसेच नागरिकीकरण झालेले होते. त्यामुळे शेतीवर आधारित समाजरचना अस्तित्वात आली. शेती करणारा, त्या मालाची विक्री (देवाण घेवाण) करणारा व थोडेफार रक्षण करणारा समाज येथे तयार झाला. भारताचा उत्तर, वायव्य भाग दुर्गम असल्याने अंतर्गत भागावर सहसा सतत अक्रमने झाली नाहीत (चंगेज खान हा भारतात न घुसता मध्य पूर्वेत गेला होता त्याआधी खलिफा क्र. १ अनेकदा सिंध पर्यंत येउन माघारी गेला होता कारण त्याच्या सैनिकांनी त्याला सांगितले कि पुढे मोठे वाळवं
आहे तिथे आपल्याला लुटायला काहीच नाही. ).
ब) याउलट इस्लाम, ख्रिश्चन आदि
धर्म हे टोळीवाल्यांच्या प्रदेशात वाढले. त्यांचे थोडेफार पशुपालन होते. त्यांचे प्रमुख उद्योग पशुपालन त्यामुळे पशूंना लागणारा चारा ह्यासाठी भटकणे, अक्रमणे करून लुट मिळवणे हेच होते. त्यात त्यांना वर्ग जाती व वर्ण तयार करणे अशक्य होते. कारण समाज वर्गात विभाजित झाला तर लढाईला संख्याबळ कमी पडत असे. पूर्वी लढल्या संख्याबळावर लढल्या जायच्या हे  वेगळे सांगायची गरज नाही.
क) हिंदू धर्मात रक्षण करणारा वर्ग पूर्वी अस्तित्वातच नसावा कारण त्याची गरज नव्हती. जो रक्षक समाज होता तो फक्त अंतर्गत नियमन करणारा पोलीस सदृश राजा होता.
ड) ग्रामीण भागात जातीय/वर्णीय व्यवस्था अजून टिकून आहे त्याचे कारण तिथे शेती अजून टिकून आहे. वाढत्या शहरीकरणात वर्ण/जातीव्यवस्था गळून पडत आहे हे त्याचेच पुढचे कारण.

Tuesday, 28 July 2015

मानवी मनातील ईश्वर

ईश्वराचा साक्षात्कार
सृष्टीतील दृश्य शक्ती म्हणजेच देव हि एक कल्पना प्रथम रूढ झाली. सूर्य, चंद्र, समुद्र, वायू, पाऊस, नद्या हेच देव असावेत असे मानवाला वाटू लागले. पण कधीकधी ह्या सृष्टीतील शक्ती ह्याच मानवाच्या जीवावर उठत असत. हा देव असा कसा ! त्याची किती स्तुती केली, धावा केला तरी तो कधी कोणासाठी हलत असे ना येत जात असे. त्याला करायचे तेच काम तो करत असे. मग त्या शक्ती देव कशा असू शकतील? पण प्रत्येक वेळी पराधीन मानवाला संकटकाळी कोणांतरी अज्ञात शक्तीचा धावा करण्याचा शेवटचा मार्ग शिल्लक असतो, इथेच देव ह्या संकल्पनेची सुरुवात  झाली. त्यावेळच्या लोकजीवनाची कल्पना केली तर लक्षात येते कि त्या मानवाचे जीवन निसर्गाशी फार सुसंगत होते. माणूस संख्येने फारच थोडा होता. त्यामुळे जीवन फारच शांत होते. रोजची आजारपणे, संघर्ष संकटे क्वचित येत असत. पण जो अशा संकट काळी मदत करतो तोच परमेश्वर, हा माणसाचा विश्वास धृढ होत होता. डोंगर हाच देव हीआदिम मानवाची सगळ्यात प्रथम कल्पना होती. डोंगरातच आदिम मानव लपून राहू शकत होता. डोंगरामुळे एक निसर्गसंस्था निर्माण होत असते. तिथेच जीवन असते पाउस पडतो, वनस्पती वाढतात, नद्या वाहतात.बरेच पर्वत हेच शिव (लिंगाकार) आहेत अशी संकल्पना तेव्हा अस्तित्वात आली असावी.
शिवलिंग म्हणजे पुरुष जननेन्द्रिय हा काहीसा अर्धवट विचार आहे. शिव ही संकल्पना मूलतः द्वीपकल्पीय भारतात निर्माण झाली. जिथे पर्जन्याचे महत्व वादातीत आहे. पाऊस प्रकट होण्यास पर्वतांचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणून पर्वत ह्या संकल्पनेचे पूजन करण्यास शिवलिंग हे स्वरूप वापरले गेले असावे. शिवलिंग व त्याबरोबर असलेली शाळुंका (खालील भाग) हे पर्वत व त्याचे टोक अशा स्वरुपात दिसतात. 
पर्वत त्यातील गुहा ह्याच तात्कालिक मानवाला स्वताच्या जीवितासाठी अधिक जवळच्या होत्या. हा असा पर्वत व गुहा यांच्या आश्रयाला राहणारा सर्वात जुना मानवाचा पूर्वज होता. शिकार व शाकाहार हे सर्वात प्राचीन आद्य व्यवहार होते. 
विचारांची सुरुवात
प्रत्येक प्रदेशात आपल्या परमेश्वराच्या वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्यात. त्यात शिव हे आदिदैवत आहे. आदिम आदिवासी सुद्धा शिवाला आदिदैवत मानतात. वेद्पुर्वी अनेक हजार वर्षे हा काळ बराच अंधारात राहिलेला काळ आहे. त्याकाळात प्रगल्भ अशी संस्कृती अस्तित्वात होती. शिवाने दिलेले ज्ञान हे आगम ग्रंथ ह्या स्वरुपात वेदांच्या पूर्वी अस्तित्वात होते. त्या ज्ञानापैकी एक असे वेद असावेत. जैन आणि श्रमण धर्म यांचीही पाळेमुळे आगम ग्रंथात आढळतात.
इसवी सन १९२०-३०च्या दशकात सिंधु नदीच्या खोऱ्यात म्हणजे हल्लीच्या पाकिस्तानांतील मोहोंजोदरो आणि हरप्पा येथे आणि भारत व पाकिस्तानात इतरत्रही  दहा ठिकाणी उत्खनन करून इतिहास संशोधकांनी ज्या 'सिंधुसंस्कृतीचा' शोध लावला ती संस्कृती कोणाची व कशी होती ते आपण आता पाहू या. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 'हिंदू धर्माची समीक्षा' या त्यांच्या ग्रंथात 'वेदपूर्व भारतीयांचा धर्म' या शीर्षकाखाली दिलेली सिंधुसंस्कृतीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अनार्यांचे स्थान सिंधुसंस्कृती?
'वैदिक आर्याच्या पूर्वी हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या सुसंस्कृत समाजांचा हा धर्म होय. या धर्मात व इजिप्त-इराकमधील पुरातन धर्मात तसेच आशिया मायनर व भूमध्य समुद्रीय संस्कृतीमध्ये आणि तेथील मानववंशामध्येसुद्धा फार मोठे साम्य आढळते. त्यांच्यात समुद्रमार्गे दळणवळणही होते. ही आर्यपूर्व संस्कृती होय. इजिप्त, क्रीट व मेसापोटेमिया येथील संस्कृतीमध्ये स्त्री व पुरुष वाचक  शिव, विष्णू, काली यांच्याशी साधर्म्य असलेल्या देवता होत्या. तसेच त्या संस्कृतीमध्ये नागपूजा, लिंगपूजा, चंद्रपूजा, ग्रहपूजा, पितृपूजा व मातृपूजासुद्धा आहेत. नाईल, युफ्रेडिस, तेग्रिस आणि सिंधु नद्यांच्या तीरावर वाढलेल्या या प्राचीन संस्कृतीचा वारसा हिंदू समाजाकडे अजूनही चालू आहे. हीच वेदपूर्व भारतीय संस्कृती होय.
शास्त्रीजींनी इतरत्र असेही म्हटलेले आहे की, 'आजच्या हिंदू धर्मात आर्य संस्कृतीपेक्षा, आर्येतर किंवा अनार्य संस्कृतीचा सहभाग जास्त आहे.'.
भारतात आर्याचे आगमन होण्यापूर्वी आणि वर उल्लेखिलेल्या भूमध्य समुद्रीय लोकांचेसुद्धा भारतात स्थिरस्थावर होण्यापूर्वी, नेग्रिटो, प्रोटो, ऑस्ट्रेलाईड, मंगोलाईड, मुंड, मुखमेर वगैरे दुसरे अनेक वंश वेगवेगळ्या वेळी भारतात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले होते आणि त्यांच्याही संस्कृतींचे विपुल अंश सध्याच्या हिंदू संस्कृतीत अंतर्भूत आहेत. तरीही मानववंश विस्तार आफ्रिकेतून इतर भागात झाला का हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कारण अगदी म्यानमार व ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी फार जुने मानवी जीवाश्म सापडत आहेत. वर वर्णिलेली सिंधुसंस्कृती केव्हा आणि कशी नष्ट झाली ते आपण पुढे पाहू.