Thursday, 5 November 2015

जातीसंस्थाविरोधी ज्योतिषशास्त्र

जातीसंस्था शब्दाचा अर्थ जन्माधारित जातीसंस्था असाच आहे, हे मी आधीच सांगून लेखाची सुरुवात करतोय.
बरेच विद्वान ऋग्वेदाचे अर्थ/अन्वयार्थ काढून हिरहिरीने वैदिक लोक हे जन्माधारित वर्णव्यवस्थेचे कारक आहेत हे सांगत असतात. हे सगळे विद्वान एकतर पाश्चिमात्य इतिहास संशोधक किवा डॉ. आंबेडकरांचे साहित्य वापरून सगळे दाखले देत असतात. स्वतःचे असे त्यांचे काहीच नाही हे अगदी स्पष्ट होते. क्षत्रिय शब्द हा खेतीय/खतिय ह्या प्राकृत शब्दावरून आला हे वाचून हसू आल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्या खतीय शब्दाला काहीच अर्थ नाही, उलट क्षत्रिय शब्दाला क्षत: त्रायते इति क्षत्रिय हि साधी बाळबोध उत्पती आहे, पण त्यात खेत आणि खेती आली कुठून? उलट जे क्षत्रिय होते त्यांना शेती दिली गेली हे वास्तव आहे. क्षत्रिय वर्णाशिवाय कुठलाही समाज हा पंगु आहे, इतकेच काय गुनाधारित वर्ण आणि कर्म विभाजनाशिवाय समाज प्रगती आणि स्वरक्षण करू शकत नाही. साधी गोगलगायसुद्धा संकटकाळात पोटात पाय घालून घेते. आधी शेती करणारा हिंदू समाज ह्या गोगल गाइपेक्षा स्वरक्षणासाठी अधिक पंगु होता. मध्ययुगात इस ७०० ते १७०० ह्याकाळातही आपला समाज पंगूच होता हे इतिहास वाचून सिद्ध होते. असे का त्याची मुलभुत कारणे ह्यांचा विचार आपण करूया,
१) शेती उघड्या जमिनीवर असल्याने युद्धप्रसंगी तिचे रक्षण करणे अवघड नव्हे अशक्य होते. 
२) शेती करणारा समाज विस्तृत प्रदेशात पसरलेला असल्याने तो विखुरला होता, सीमावर्ती भागात एकत्र होणे शेतीच्या दृष्टीने अशक्य होते. 
३) पाण्याची धरणे, नद्या अडवून शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले जात होते. 
४) शेती व्यवसायात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नव्हते.
५) शेतिअधरित मानव हा अधिकाधिक शाकाहारी बनत चालला होता त्यामुळे हिंसा हा प्रकार शेती समाजाला निषिद्ध होता, 
अशी अनेक कारणे आहेत. 
पशुपालक मानव हा हिंसा करणारा असणार हे नक्की. नंतर हजारो शेती करण्याच्या नादात तो हिंसा विसरून गेला. इतकेच वेदपूर्व काळातील पुरावे पाहून सांगू शकतो. ऋग्वेदात सर्वात प्रथम वर्णांचा उल्लेख आढळतो. पण तो वेगळ्या शब्दांनी व्यक्त केला आहे. विशेषतः तिथे क्षत्रियाला राजन्य शब्द आलेला आहे. तसे पहिले तर राजन हा एक आदरवाचक शब्द आहे इतकेच. पण तूर्तास आपण राजन ह्या रजोगुणी म्हणून राजन्य म्हणूया. 
नंतर ऋग्वेदातच पुरुषसुक्त आलेले आहे, त्यात समाजरुपी पुरूषाचे अनुक्रमे शीर हे ब्राम्हण, हात हे क्षत्रिय, पोट हे वैश्य तर पाय हे शुद्र असे वर्णन आलेले आहे. पण ह्यात कुठेही हे चार वर्ण जन्माधारित आहेत असे म्हटलेले नाही. तर तो इतिहास्कारांचा काढीव अर्थ आहे. पुढे पुरुषसुक्त हे ऋग्वेदात नंतर घुसडले गेले असा तर्क विद्वान काढतात. ह्याचे कारण म्हणे चार वर्णांचा शब्दशः अर्थ पूर्वी ऋग्वेदात कुठेही येत नाही म्हणून. हेही आपण मान्य करूया. 
म्हणजे जन्माधारित वर्णवाद वाढवण्यासाठी पुरुषसुक्त बनवले गेले असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. आता आपण थोडे पुढे जाऊ, ज्योतिष्यशास्त्र भारतीय लोकांना पूर्वी माहीतच नव्हते असे विद्वान समजतात. ते अलेक्झांडर ह्याच्या आक्रमणानंतर ग्रीकांनी भारतात आणले असे विद्वान मानतात. ज्योतिष्यशास्त्राचे जनक वराहमिहिर ह्यांचा काळ इस ५०० ते ६०० असा सांगितला जातो. म्हणजे पुरुषसुक्त समजा ह्याच काळात जरी घुसडले गेले असे मानले तरी न ज्योतिष्यशास्त्र जन्माधारित वर्णांचा पुरस्कार करते न पुरुषसुक्त. 
ज्योतिष्यशास्त्राप्रमाणे दर २ तासाच्या अंतराने जन्माला आलेल्या व्यक्तीचा वर्ण वेगळा असतो. तो सर्वस्वी आकाशातील ग्रह तारे व नक्षत्र ह्यांच्यातील चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतो. म्हणजे ज्योतिष्य शास्त्र जन्माधारित वर्ण व्यवस्थेला मोठा सुरुंग लावणारे आहे. तसेच पुरुषसुक्त फक्त एका सर्वांग आणि मजबूत समाज संस्थेचे वर्णनमात्र आहे.

आता विचार करा कि ह्या समाजात सर्वात वरचे स्थान प्राप्त झालेल्या ब्राम्हणांना पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य ह्यांचा उदो उदो करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा होता का? पण तरीही त्यांनी तो मूर्खपणा केलाच. इतकेच नव्हे तर बरेच ज्ञान शोधणारे आपले पूर्वज हे नुसते ब्राम्हण नव्हते. तेसुद्धा त्याकाळातील पुरोगामी होते. बहुजनांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पुरातन जन्माधारित प्रथा चालूच ठेवल्या. शेवटी पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य सांगणारे हारले आणि नाईलाजास्तव त्यांनीही जन्माधारित जाती-वर्ण ह्यांना होकार दिला, अजूनही आपल्या समाजात गुनाधारित कर्म व्यवस्था येत नाही तोवर आपला समाज पंगूच राहणार आहे. बाकी सगळ्या वल्गना आहेत.


No comments:

Post a Comment