मी छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या पत्रिकेने सुरुवात करत आहे.
मुळात शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद अजूनही पूर्ण निवळला नाही. त्यात त्यांच्या जन्मपत्रिकेच्या (१९-२-१६३० च्या सायंकाळी ६-२६) अभ्यासाने आणखी काही वाद तयार होऊ शकतात. मलाही माझ्या बुद्धिवादी दृष्टीकोनातून त्यांची जन्मतारीख आणि वेळ फारशी अचूक वाटत नाही. मुळात पत्रिकेप्रमाणे त्यांचा वर्ण क्षत्रिय नाही, तर तो वैश्य आहे. ते देव किवा मनुष्य गणाचे नसून राक्षस गणाचे होते, हे त्यांच्या जन्म पत्रिकेप्रमाणे स्पष्ट होते. शिव जन्माची वेळ चूक कि अचूक हि शंका येते, त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१) शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीच्या नवसाने आले हि सत्यकथा किवा भाकडकथा असू शकते. कारण शिवाजींचे नाव कृत्तिका नक्षत्र चरण-२ प्रमाणे "ई" नावाने येते.
२) शिवा, सिवा, सेवा हि सर्व चाराणाक्षारे एकतर षा-हस्त नक्षत्र कन्या राशी-वैश्य वर्ण -देव गण असे येते. किंवा अद्याक्षरे सा-सी-सू शततारका नक्षत्र, - कुंभ राशी-शुद्र वर्ण-राक्षस गण असे येते. शेवटी से हे आद्याक्षर पूर्वाभाद्रपदा प्रथम चरण, मनुष्य गण, शुद्र वर्ण असे येते.
३) पण ठेवलेले नाव आणि प्रचलित नाव ह्यामुळे फारच वादग्रस्त मुद्दे तयार होतात त्यामुळे जे काही इतिहास संशोधकांनी सांगितले आहे त्याचा (म्हणजेच वर दिलेल्या शिवाजी महाराजांच्या पत्रिकेचा) अभ्यास करू. मुद्दे पटले नाहीत तर परत विचार करू.
अभ्यास- मुद्दे:
***शिवाजी हे राक्षस गणाचे वैश्य वर्णीय होते. राक्षस गण हा भयंकर महत्वाकांक्षा दर्शवितो. शिवाय ज्यामुळे शिवाजींना हि राक्षसी महत्वाकांक्षा मिळाली ते कृत्तिका नक्षत्र इतके दोषास्पद नाही कि त्याला शांती करावी लागते हेही विचारात घेणे महत्वाचे आहे. म्हणजे ते शांतचित्त होते पण तितकेच महत्वाकांक्षी होते.
*** शिवाजींनी फारच थोड्या वेळी हातात तलवार घेतली हेही ते वैश्य वर्णाचे प्रवर्तक होते असे त्यांच्या वरील पत्रिकेवरून स्पष्ट होते.
*** शिवाजींनी परदेशी खाजीन्यांची लुट करवली. आपल्या अधिकाराने शेतसार्यांत मोठे बदल घडविले ह्यावरून ते वैश्य वर्णीय होते असे वाटते.
*** शिवाजींना किल्ले बांधताना मोठमोठे खजिने सापडले आणि मग त्यांनी स्वराज्य वाढविले हाही भाकड इतिहास असू शकतो. पण शिवाजींना धनाचे आणि सुवर्णाचे महत्व कळले होते हेही ह्या दंतकथातून स्पष्ट होते.
*** सिंह लग्न हे शिवाजींचे खास वैशिष्ट्य. हि अग्नितात्वाची राशी आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मकाळी मोठा दुष्काळ पडला असावा हे सामान्य भाकीत आहे. पण स्वतःच्या मतावर ठाम राहणे हाही सिंह लग्नाचा एक स्वभाव आहे. सिंह लग्न कुणालाही वश होत नाही हेही एक गमतीचे संशोधन आहे.
*** सिंह लग्न हे स्थिर लग्न आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थतीत सुद्धा न डळमळणे हा ह्या राशीचा गुणधर्म आहे. हि रवीची राशी असून १२ राशींपैकी रविला मिळालेली १ राशी आहे. चंद्राला सुद्धा १ रास मिळाली आहे. मंगळाला २ राशी, बुधाला २ राशी, गुरूला २ राशी, शुक्राला २ राशी, शनीला २ राशी आणि शेवटी राहू केतुला वरील ग्रहात विभागून मिळालेली प्रत्येकी एक एक रास आहे. त्यामुळे बाकीच्या राशींच्या मनाणे रवि व चंद्र ह्यांच्या राशी कमी लोकांना मिळतात हे स्पष्ट होते.
आता आपण विरोधी मुद्द्यांचा विचार करू.
^^^ औरंगझेबाच्या दरबारात झालेल्या अपमानाची जी उस्फुर्त प्रतिक्रिया शिवाजीराजांनी दिली ती त्यांच्या वरील पत्रिकेच्या अगदी विरोधी आहे. सहनशक्तीची हि परीक्षा आपल्या अनेक राजे राजवाड्यांची पूर्वी झालेली आहे. त्यात शिवाजींचा आत्मसंयम कमी होता हे हेही शक्य आहे. पण दुसरीकडे ते वरील पत्रिकेत मंगळीक नाहीत. (मंगळ १-४-७-८ किवा १२ व्या स्थानात असणे) त्यामुळे त्यांची त्यावेळी प्रतिक्रिया कशी उमटली हेही महत्वाचे आहे.
त्यासाठी आपण आधी मंगळीक शब्दाचा अर्थ समजावून घेऊ. पूर्वी मंगळीक एक शाप आणि आशीर्वाद अश्या दोन्ही स्वरुपात होता.
@ मंगळीक म्हणजे ज्यांचे विवाह ठरायला फार अडचणी येतात असे स्त्री- पुरुष. कारण मंगळीक माणसाला संसार सुख नसते. आपला जोडीदार लवकर मरतो असा एक अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी संसार करण्यापेक्षा देशसेवा, समाजसेवा, लष्करी नोकरी करून देशासाठी शहीद व्हावे अशी विभागणी आधीच करून ठेवली गेली होती. मंगळीक लोकांना सार्वजनिक जीवनात त्यांच्या अपुऱ्या सहनशक्तीमुळे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागतात. पोटी संतती जन्माला येताना नेमके कापपापी करायची वेळ मंगळीक लोकांवरच येते.
@ दुसरा अर्थ गरोदरपनात पत्नीला त्रास होतो. संतती जन्मताना पत्नी दगावते. असेही दाखले मिळतात. पुरुष तापट स्वभावाचे असून अनेक अनर्थ स्वतःवर ओढवून घेतात. पत्नी मंगळीक असेल तर पती स्वतःवर संकटे ओढवून घेतो.
@ महत्वाचे म्हणजे मंगळीक व्यक्तीला एकतर दुसर्या मंगळीक (किवा प्रतिकारक) व्यक्तीबरोबर संसार करणे किवा देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेणे हेच मंगळीक असण्याचे पर्याय उपलब्ध असतात . शिवाजी संयमी होते पण ते मंगळीक नव्हते इतकेच मी वरील पत्रिकेप्रमाणे म्हणू शकतो.
@ आता पुढचा प्रवाद माझ्या डोक्यात येतो तो असा, कि छत्रपतींची जन्मवेळ अचूक आहे का हा! ते जर मंगळीक असतील तर त्यांचा जन्म एकतर सायं. ६ वाजून २६ मी. च्या पूर्वी सव्वा दोन गुणिले २ असे साडे चार तास आधी झालेला असू शकतो. तरच ते मंगळीक असू शकतात ती पत्रिका आपण पाहू. (१९-२-१६३० च्या सायंकाळी ४-१५)
ही नेमकी मंगळीक पत्रिका आहे, त्यातले प्रमुख महत्वाचे मुद्दे आपण पाहू,
१) लग्नी बुध(शत्रू) राशीचा मंगळ म्हणजे सहकार न करणारे बांधव आणि एत्तदेशीय. त्यामुळे हतबलता आलेली असणे, पण हे खरे नाही.
२) पंचमात उच्चीचा शनि, संभाजी सारखा अलौकिक पुत्र जन्माला घातला, राजारामही तितकाच तुल्यबळ पण तो महाराजांच्या ह्या पत्रिकेत स्पष्ट दिसत नाही.
३) दशमात शुक्र म्हणजे आईने मोठे केले हे दिसतेच माता हीच पिता असे दिसते. पित्याच्या दुसर्या पत्नीचा प्रभाव त्रास दर्शविते. पण तसेही नाही.
४) पण ह्या पत्रिकेत केंद्रात शुक्राशिवाय कुठलाही शुभग्रह नाही. त्यामुळे शिवाजीना जी नशिबाची साथ मिळाली ती फक्त देवीच्या व (फारतर) पित्याच्या दुसर्या पत्नीचा कृपेने मिळाली का असा प्रश्न येतो. दशमात शुक्र उच्चीचा आणि अंशात्मक आहे हे इथे महत्वाचे.
५) व्ययस्थानात दोन महत्वाचे (राहू -चंद्र) हे ग्रह सुद्धा मोठे प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात. त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला पण तोही अल्पकाळ निघाला. इतका लहान काळातील कारावास तो ह्या राहू चंद्रामुळे भोगावा लागला हे सत्य वाटत नाही. म्हणजे शिवाजी मंगळीक नव्हते. पण स्वाभिमानी क्षत्रिय होते असे पुढचे अनुमान निघते.
आता आपण थोड्या आधीच्या वेळेचा विचार करू, हि वेळ (१९-२-१६३०) सकाळची ९. १५ ची आहे. तिची वैशिष्ठ्ये पहा,
१) मेष रास लढाऊ वृत्ती दाखवते, क्षत्रिय वर्ण आणि राक्षस गण म्हणजे क्षत्रिय कुलवन्तस हे अगदी शोभून दिसते.
२) लग्नी मीन राशी (उच्चीचा) शुक्र स्त्री दैवताचा वरदहस्त डोक्यावर दिसतो. आणि तोही प्रथम स्थानात त्यामुळे अदभूत प्रसंगांनी जीवन भरलेले आहे. केंद्रातील हा प्रभावी ग्रह आहे.
३) तृतीय (भातृस्थानात) राहू आहे. म्हणजे भावंडे जवळचे नातेवाईक मदत करणार नाहीत.
४) चतुर्थ स्थानात मंगळ आहे. हे मातृस्थान आहे. त्यामुळे आईने शिवाजींच्या मनात बंडाचे विचार तयार केले असे म्हणता येईल. पण मातेशी पटत नाही. जमीन (राज्य) मित्र ह्यांचे सुख मिळत नाही. शिवाय ह्यामुळे शिवाजी मंगळीक होतात. त्याचा विचार आपण वर केलाच आहे.
५) अष्टमात उच्चीचा शनि, अनपेक्षित धनलाभ, गुप्तधन, पण थोडे आयुष्य.
६) व्ययस्थानात बुध, गुरु आणि रवि सगळे शनीच्या राशीला म्हणजे निर्बल. कायम अज्ञातवासात जीवन कंठावे लागले. त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला पण तोही अल्पकाळ निघाला. इतका लहान काळातील कारावास तो ह्या गुरूमुळे भोगावा लागला हे सत्य वाटत नाही.
पण त्यांची जन्मतारीख पक्की नसली तरी वेळ चुकणे अशक्य आहे. विशेषत: जेव्हा जिजाऊ राज्याभिषेकाच्या वेळी होत्या तेव्हा त्यांना अंदाजे का होईना जन्मवेळ माहित होती त्यामुळे जन्मवेळ चुकीची असणे अशक्य वाटते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या पत्रिकेचा उहापोह नक्कीच झाला असणार.
तर अशा प्रकारे आपण पहिले कि शिवाजी महाराजांची जन्मतारिख जरी पक्की समजली तरी नुसत्या जन्मवेळेने किती वेगवेगळ्या पत्रिका निघतात. शिवाय तारीख बरोबर आहे का हा पुढचा प्रश्न आहेच. पण त्या तारखेदरम्यान आकाशातील ग्रह खरेच प्रभावी होते, उच्चीचा शनी, शुक्र हे त्यातील महत्वाचे होत, म्हणून हीच तारीख (किवा अलीकडे पलीकडे १५ दिवस) त्यांची जन्मतारीख असावी असे समजून आपण पुढे जाऊया. थोडे मागे जाऊन दिनांक १८-२-१६३० ची सायंकाळी ६-२६ ची पत्रिका काढली तर?
मेष राशी, मनुष्य गण, क्षत्रिय वर्ण व पत्रिका जवळपास वरील क्रमांक १ प्रमाणेच. हि पत्रिका फारच प्रभावी होती. उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, इथे रास बदलते, वृषभ वरून मेष होते. असा ओढून ताणून जन्मपत्रिका काढण्याचा व शिवाजींना क्षत्रिय बनवायचा मी प्रयत्न करतोय असे अनेकांचे मत बनू शकते. पण मी पूर्णपणे ज्योतिष्यशास्त्र ह्या विषयाच्या अनुषंगाने शिवाजींच्या चरित्राचा विचार करतोय. विशेष म्हणजे असा दृष्टीकोन ठेऊन कोणीही ते पूर्वी केलेले नाही. अनेक ऐतिहासिक पुरावे, पत्रे दिली गेलीत पण, त्यात इतिहासाचा किती अपभ्रंश झालाय हे कळायला दिलेले पुरावे अपुरेच आहेत. निदान महान वैदिकांनी (ज्यांना जन्माधारित वर्ण व्यवस्था अजिबात मान्य नव्हती) त्यांनी तरी शिवाजींच्या जन्मपत्रिकेचा उहापोह राज्याभिषेक प्रसंगी करायला हवा होता. तसे केल्याचे कुठेच दिसत नाही. म्हणजे ज्योतिष्यशास्त्र लयास गेले होते आणि जातीव्यवस्था किडीसारखी पसरली होती. पण नंतर अचानक पेशवाईत यज्ञ आणि ज्योतिष्याचा सूळसूळाट सुरु झाला ते कसे? असो.
म्हणजे शेवटी पत्रिकेत एक दिवसाचा घोळ आहे कि काय? हा घोळ वाटला म्हणून किवा १९-२-१६३० च्या सायंकाळी ६-२६ प्रमाणे ते वैश्य वर्णीय होते म्हणून वैदिकांनी त्यांना राज्याभिषेक नाकारला असेल तर ठीक, पण ते (जन्माधारित) जातीने क्षत्रिय नव्हते म्हणून जर तो नाकारला असेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच!!
जय भवानी जय शिवाजी ।
*** सिंह लग्न हे शिवाजींचे खास वैशिष्ट्य. हि अग्नितात्वाची राशी आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मकाळी मोठा दुष्काळ पडला असावा हे सामान्य भाकीत आहे. पण स्वतःच्या मतावर ठाम राहणे हाही सिंह लग्नाचा एक स्वभाव आहे. सिंह लग्न कुणालाही वश होत नाही हेही एक गमतीचे संशोधन आहे.
*** सिंह लग्न हे स्थिर लग्न आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थतीत सुद्धा न डळमळणे हा ह्या राशीचा गुणधर्म आहे. हि रवीची राशी असून १२ राशींपैकी रविला मिळालेली १ राशी आहे. चंद्राला सुद्धा १ रास मिळाली आहे. मंगळाला २ राशी, बुधाला २ राशी, गुरूला २ राशी, शुक्राला २ राशी, शनीला २ राशी आणि शेवटी राहू केतुला वरील ग्रहात विभागून मिळालेली प्रत्येकी एक एक रास आहे. त्यामुळे बाकीच्या राशींच्या मनाणे रवि व चंद्र ह्यांच्या राशी कमी लोकांना मिळतात हे स्पष्ट होते.
आता आपण विरोधी मुद्द्यांचा विचार करू.
^^^ औरंगझेबाच्या दरबारात झालेल्या अपमानाची जी उस्फुर्त प्रतिक्रिया शिवाजीराजांनी दिली ती त्यांच्या वरील पत्रिकेच्या अगदी विरोधी आहे. सहनशक्तीची हि परीक्षा आपल्या अनेक राजे राजवाड्यांची पूर्वी झालेली आहे. त्यात शिवाजींचा आत्मसंयम कमी होता हे हेही शक्य आहे. पण दुसरीकडे ते वरील पत्रिकेत मंगळीक नाहीत. (मंगळ १-४-७-८ किवा १२ व्या स्थानात असणे) त्यामुळे त्यांची त्यावेळी प्रतिक्रिया कशी उमटली हेही महत्वाचे आहे.
त्यासाठी आपण आधी मंगळीक शब्दाचा अर्थ समजावून घेऊ. पूर्वी मंगळीक एक शाप आणि आशीर्वाद अश्या दोन्ही स्वरुपात होता.
@ मंगळीक म्हणजे ज्यांचे विवाह ठरायला फार अडचणी येतात असे स्त्री- पुरुष. कारण मंगळीक माणसाला संसार सुख नसते. आपला जोडीदार लवकर मरतो असा एक अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी संसार करण्यापेक्षा देशसेवा, समाजसेवा, लष्करी नोकरी करून देशासाठी शहीद व्हावे अशी विभागणी आधीच करून ठेवली गेली होती. मंगळीक लोकांना सार्वजनिक जीवनात त्यांच्या अपुऱ्या सहनशक्तीमुळे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागतात. पोटी संतती जन्माला येताना नेमके कापपापी करायची वेळ मंगळीक लोकांवरच येते.
@ दुसरा अर्थ गरोदरपनात पत्नीला त्रास होतो. संतती जन्मताना पत्नी दगावते. असेही दाखले मिळतात. पुरुष तापट स्वभावाचे असून अनेक अनर्थ स्वतःवर ओढवून घेतात. पत्नी मंगळीक असेल तर पती स्वतःवर संकटे ओढवून घेतो.
@ महत्वाचे म्हणजे मंगळीक व्यक्तीला एकतर दुसर्या मंगळीक (किवा प्रतिकारक) व्यक्तीबरोबर संसार करणे किवा देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेणे हेच मंगळीक असण्याचे पर्याय उपलब्ध असतात . शिवाजी संयमी होते पण ते मंगळीक नव्हते इतकेच मी वरील पत्रिकेप्रमाणे म्हणू शकतो.
@ आता पुढचा प्रवाद माझ्या डोक्यात येतो तो असा, कि छत्रपतींची जन्मवेळ अचूक आहे का हा! ते जर मंगळीक असतील तर त्यांचा जन्म एकतर सायं. ६ वाजून २६ मी. च्या पूर्वी सव्वा दोन गुणिले २ असे साडे चार तास आधी झालेला असू शकतो. तरच ते मंगळीक असू शकतात ती पत्रिका आपण पाहू. (१९-२-१६३० च्या सायंकाळी ४-१५)
ही नेमकी मंगळीक पत्रिका आहे, त्यातले प्रमुख महत्वाचे मुद्दे आपण पाहू,
१) लग्नी बुध(शत्रू) राशीचा मंगळ म्हणजे सहकार न करणारे बांधव आणि एत्तदेशीय. त्यामुळे हतबलता आलेली असणे, पण हे खरे नाही.
२) पंचमात उच्चीचा शनि, संभाजी सारखा अलौकिक पुत्र जन्माला घातला, राजारामही तितकाच तुल्यबळ पण तो महाराजांच्या ह्या पत्रिकेत स्पष्ट दिसत नाही.
३) दशमात शुक्र म्हणजे आईने मोठे केले हे दिसतेच माता हीच पिता असे दिसते. पित्याच्या दुसर्या पत्नीचा प्रभाव त्रास दर्शविते. पण तसेही नाही.
४) पण ह्या पत्रिकेत केंद्रात शुक्राशिवाय कुठलाही शुभग्रह नाही. त्यामुळे शिवाजीना जी नशिबाची साथ मिळाली ती फक्त देवीच्या व (फारतर) पित्याच्या दुसर्या पत्नीचा कृपेने मिळाली का असा प्रश्न येतो. दशमात शुक्र उच्चीचा आणि अंशात्मक आहे हे इथे महत्वाचे.
५) व्ययस्थानात दोन महत्वाचे (राहू -चंद्र) हे ग्रह सुद्धा मोठे प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात. त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला पण तोही अल्पकाळ निघाला. इतका लहान काळातील कारावास तो ह्या राहू चंद्रामुळे भोगावा लागला हे सत्य वाटत नाही. म्हणजे शिवाजी मंगळीक नव्हते. पण स्वाभिमानी क्षत्रिय होते असे पुढचे अनुमान निघते.
आता आपण थोड्या आधीच्या वेळेचा विचार करू, हि वेळ (१९-२-१६३०) सकाळची ९. १५ ची आहे. तिची वैशिष्ठ्ये पहा,
१) मेष रास लढाऊ वृत्ती दाखवते, क्षत्रिय वर्ण आणि राक्षस गण म्हणजे क्षत्रिय कुलवन्तस हे अगदी शोभून दिसते.
२) लग्नी मीन राशी (उच्चीचा) शुक्र स्त्री दैवताचा वरदहस्त डोक्यावर दिसतो. आणि तोही प्रथम स्थानात त्यामुळे अदभूत प्रसंगांनी जीवन भरलेले आहे. केंद्रातील हा प्रभावी ग्रह आहे.
३) तृतीय (भातृस्थानात) राहू आहे. म्हणजे भावंडे जवळचे नातेवाईक मदत करणार नाहीत.
४) चतुर्थ स्थानात मंगळ आहे. हे मातृस्थान आहे. त्यामुळे आईने शिवाजींच्या मनात बंडाचे विचार तयार केले असे म्हणता येईल. पण मातेशी पटत नाही. जमीन (राज्य) मित्र ह्यांचे सुख मिळत नाही. शिवाय ह्यामुळे शिवाजी मंगळीक होतात. त्याचा विचार आपण वर केलाच आहे.
५) अष्टमात उच्चीचा शनि, अनपेक्षित धनलाभ, गुप्तधन, पण थोडे आयुष्य.
६) व्ययस्थानात बुध, गुरु आणि रवि सगळे शनीच्या राशीला म्हणजे निर्बल. कायम अज्ञातवासात जीवन कंठावे लागले. त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला पण तोही अल्पकाळ निघाला. इतका लहान काळातील कारावास तो ह्या गुरूमुळे भोगावा लागला हे सत्य वाटत नाही.
पण त्यांची जन्मतारीख पक्की नसली तरी वेळ चुकणे अशक्य आहे. विशेषत: जेव्हा जिजाऊ राज्याभिषेकाच्या वेळी होत्या तेव्हा त्यांना अंदाजे का होईना जन्मवेळ माहित होती त्यामुळे जन्मवेळ चुकीची असणे अशक्य वाटते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या पत्रिकेचा उहापोह नक्कीच झाला असणार.
(१९-२-१६३०) सकाळची ९. १५ पत्रिका)
तर अशा प्रकारे आपण पहिले कि शिवाजी महाराजांची जन्मतारिख जरी पक्की समजली तरी नुसत्या जन्मवेळेने किती वेगवेगळ्या पत्रिका निघतात. शिवाय तारीख बरोबर आहे का हा पुढचा प्रश्न आहेच. पण त्या तारखेदरम्यान आकाशातील ग्रह खरेच प्रभावी होते, उच्चीचा शनी, शुक्र हे त्यातील महत्वाचे होत, म्हणून हीच तारीख (किवा अलीकडे पलीकडे १५ दिवस) त्यांची जन्मतारीख असावी असे समजून आपण पुढे जाऊया. थोडे मागे जाऊन दिनांक १८-२-१६३० ची सायंकाळी ६-२६ ची पत्रिका काढली तर?
मेष राशी, मनुष्य गण, क्षत्रिय वर्ण व पत्रिका जवळपास वरील क्रमांक १ प्रमाणेच. हि पत्रिका फारच प्रभावी होती. उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, इथे रास बदलते, वृषभ वरून मेष होते. असा ओढून ताणून जन्मपत्रिका काढण्याचा व शिवाजींना क्षत्रिय बनवायचा मी प्रयत्न करतोय असे अनेकांचे मत बनू शकते. पण मी पूर्णपणे ज्योतिष्यशास्त्र ह्या विषयाच्या अनुषंगाने शिवाजींच्या चरित्राचा विचार करतोय. विशेष म्हणजे असा दृष्टीकोन ठेऊन कोणीही ते पूर्वी केलेले नाही. अनेक ऐतिहासिक पुरावे, पत्रे दिली गेलीत पण, त्यात इतिहासाचा किती अपभ्रंश झालाय हे कळायला दिलेले पुरावे अपुरेच आहेत. निदान महान वैदिकांनी (ज्यांना जन्माधारित वर्ण व्यवस्था अजिबात मान्य नव्हती) त्यांनी तरी शिवाजींच्या जन्मपत्रिकेचा उहापोह राज्याभिषेक प्रसंगी करायला हवा होता. तसे केल्याचे कुठेच दिसत नाही. म्हणजे ज्योतिष्यशास्त्र लयास गेले होते आणि जातीव्यवस्था किडीसारखी पसरली होती. पण नंतर अचानक पेशवाईत यज्ञ आणि ज्योतिष्याचा सूळसूळाट सुरु झाला ते कसे? असो.
म्हणजे शेवटी पत्रिकेत एक दिवसाचा घोळ आहे कि काय? हा घोळ वाटला म्हणून किवा १९-२-१६३० च्या सायंकाळी ६-२६ प्रमाणे ते वैश्य वर्णीय होते म्हणून वैदिकांनी त्यांना राज्याभिषेक नाकारला असेल तर ठीक, पण ते (जन्माधारित) जातीने क्षत्रिय नव्हते म्हणून जर तो नाकारला असेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच!!
जय भवानी जय शिवाजी ।
No comments:
Post a Comment