शंकर पार्वती हे राजन्य (क्षत्रिय) जोडपे होते, पिता बर्याच काळाने (परमुलुखात लढायला गेल्याने) घराकडे परतला, तो इतके दिवस बाहेर राहूनही त्याची पत्नी, तिचे बाळंतपण आणि जन्मलेला पुत्र हे अगदी सुरक्षित राहिले कारण ते एका बलवान क्षत्रिय समाजाच्या आश्रयाला राहत होते. पिता इतके काळ दूर असल्याने पुत्राचा जन्म मळापासून झाला असा तर्क बनला असावा. तोवर पार्वतीने आपल्या पुत्राला मोठे केले. कालांतराने पिता परत आला. तेव्हा
एका अनोळखी पुत्राने त्यांची वाट अडवली, त्यांच्यात अतिभयंकर वाद झाला.
इतका कि पित्याने पुत्राला मरणप्राय शाब्दिक यातना दिल्या. (महाभारतात
धर्मराजाच्या एका चुकीसाठी अर्जुनाला त्याचा वध करणे भाग होते, पण पर्याय
म्हणून श्रीकृष्णाने अर्जुन ला धर्मराजाची निर्भात्सना करायले
सांगितले, म्हणजे निर्भत्सना करणे वध करन्या इतकेच वाईट कृत्य समजले जायचे)
तिथे पार्वती आली आणि हा आपला स्वतःचा पुत्र असल्याचे रहस्य सांगितले,
तेव्हा मात्र पिता पुत्राचे वादविवाद कौशल्य पाहून खुश झाला व ह्या मुलाला
मी भरपूर ज्ञान देईल असे कबूल केले. गणपतीची जन्मकुंडली नक्कीच त्याचा वडिलांनी पहिली असेल आणि महाज्ञानी बनेल असे भाकीत वर्तवले. अश्या प्रकारे प्रचंड ज्ञानामुळे त्याचे डोके
हत्तीसारखे मोठे असेल असा त्याचा मूळ अर्थ होता पण त्याच्या अपभ्रंशाने
गणपतीला सोंड लावली गेली. काळाच्या ओघात हा अपभ्रंश होत असतो. तो
बोलीभाषेतच जास्त झालाय.
पुढे गणपतीने आपल्या चाणाक्ष बुद्धीने मोठमोठी युद्धे लढली व अन्यायकारक शत्रूला पाणी पाजले, म्हणून त्याची दखल समाजाला घ्यावीच लागली. तेव्हा तो बुद्धीची देवता बनला. त्याने उंदरांचा वापर करून शत्रूला नामोहरम केले, म्हणून तो मूषक-अधिपती बनला. हत्तींचा मोठ्या बुद्धीने वापर करून शत्रूला हरवले असा दुसरा अर्थ त्याचा सोंडेतून अभिप्रेत होतो. आत्ताही आपल्याला जगताना काही महापुरुषांना वजा करून जगता येत नाही. तसाच एकेकाळी गणेश हा महापुरुष होता त्याला विसरून समाजाला पुढे जाणे अशक्य होते. गणपतीने फार पूर्वी एक संस्कृती बनवली आणि तेव्हापासून लोक गणपतीचे व्रत/पूजा करू लागले. पुढे इतिहासात अपभ्रंश येत गेले. काही लोक प्रवाद करतात कि पूर्वी आदिवासी लोक हत्तीचे तोंड लाऊन त्यांच्या देवकाचा उत्सव करीत असत. पण मुळात असे विचित्र रूप धारण करायची त्या आदिवासींना गरज काय होती? त्यांच्या अख्याईका इतक्या निरर्थक नसतात हेही तितकेच खरे आहे. तर खरे कारण इतकेच कि गणपती हीच त्याच मागची प्रेरणा होती. सिंधू संस्कृतीच्या अवशेषात सापडलेला गणेश ह्यावरून गणेशाचा काळ बराच सिंधूपूर्व आहे हे दिसते. गणपती शिवपुत्र कसा हेही वरील कथेत स्पष्ट होते. आत्ताचे गजानन रूप आहे ते मोठे मोहक आणि मंगलकारक आहे हेही तितकेच खरे.
ब्रम्हदेवाला चार डोकी असल्याचे आपण चित्रात व अनेक शिल्पात पाहत आलोय. वास्तविक अर्थ चार डोक्यांच्या इतकी बुद्धिमत्ता असलेला असा श्रेष्ठ असाच त्याचा अर्थ होतो. हीच बाब अनेक वैदिक आणि अवैदिक देवतांना लागू होते.
ब्रम्हदेवाला चार डोकी असल्याचे आपण चित्रात व अनेक शिल्पात पाहत आलोय. वास्तविक अर्थ चार डोक्यांच्या इतकी बुद्धिमत्ता असलेला असा श्रेष्ठ असाच त्याचा अर्थ होतो. हीच बाब अनेक वैदिक आणि अवैदिक देवतांना लागू होते.
No comments:
Post a Comment