श्रीकृष्ण
पंडीत नेहरु
महात्मा गांधी
इंदिरा गांधी
एडोल्फ हिटलर
बाबासाहेब अम्बेडकर
सचिन तेंडुलकर
अमिताभ बच्चन
नरेंद्र मोदी
आहे कि नाही गम्मत. श्रीकृष्णाची जन्मपत्रिका अशीच नेटवर शोध घेताना सापडली आहे. पण त्यातील अचूकता किती किती हे मलाही माहित नाही. विशेष म्हणजे ह्या जन्मपत्रिकेत चंद्र, बुध, शनि आणि मंगळ हे सगळेच उच्चीचे आहेत. शिवाय रवि शुक्र आणि गुरु हे स्वराशीचे आहेत. म्हणजे हि पत्रिका थोडी अतिशयोक्ती वाटू शकते. इतकेच.
ब्राम्हण घरात जन्मलेला सचिन मैदानावर तुफान खेळत आलाय तो खरा तर जन्माने क्षत्रिय वर्णीय आहे. नेहरू, गांधी, आणि मोदी वेगवेगळ्या जातीतून आलेले पण समाजमनावर गारुड करून बसलेले आहेत. एकाकी लढणारा हिटलर खरा क्षत्रिय होता आत्तापर्यंत जगात झालेल्या सर्वात मोठ्या युद्धाचा कर्ता करविता हा तोच हिटलर. इंदिरा गांधींना वंशपरंपरेने सत्ता मिळाली. पण त्यांच्या मनातील धोरणे वेगळी होती आणि परिस्थिती वेगळी उद्भवत गेली. इंदिराजींच्या आर्थिक धोरणांचा विचार वेगळ्याने करायची गरज आहे. नाईलाज म्हणून त्यांनी युद्धे केली आणि जिंकली. पण शत्रूच्या आर्थिक दुरवस्थेचा त्यांनी नेमका फायदा उठवला. महत्वाचे म्हणजे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान ह्यांत फार मोठा आर्थिक असमतोल आहे हे विचारात घेणे महत्वाचे आहे.त्यातून त्यांच्या वैश्यत्वाची प्रचीती येते. बाबासाहेब आंबेडकर हे शुद्र वर्णीय होते म्हणून त्यांना शूद्रांचे खरे दुखः समजले. त्यांनी ज्या हिरहिरीने शूद्रांचे नेतृत्व केले असे दुसरा तिसरा कोणीही करू शकला नसता. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शूद्रांच्या अधोगतीची कारणे शोधून काढली व आपली संपन्न घटना निर्माण केली. "जावे त्याचा वंशा" हे म्हणतात ते अजिबात चुकीचे वाटत नाही. घटना लिहिणे हे निर्माणकर्त्याचे क्लिष्ट काम त्यांनी अगदी अचूक करून ठेवले, त्याला तोड नाही. शुद्र वर्णीयांचे ज्ञान हे ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णीयांच्या इतकेच होते ह्याचा पुरावा आपल्यासमोर आणून ठेवला हि त्यांची अपूर्वाई आहे. ते नुसते मानव गणाचे नव्हते तर महामानव होते. इतकेच आपण म्हणू शकतो. त्यांनी वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून त्यावरून जातीवादाची कारणे त्यांनी प्रभावीपणे आपल्यासमोर मांडली. त्या काळात वैदिकांना असा छेद देणे फारच धाडसाचे काम होते.
आता आपण अमिताभ बच्चन ह्यांचा विचार करू. अभिनय क्षेत्रात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने मोठी छाप पडणारा माणूस! पण थोडा अभिताभचा सुरुवातीचा काळ आठवा. उत्तम दिग्दर्शक मिळाल्याशिवाय एका नटाचे काम हे शुन्य असते हे ते परवाच म्हणाले होते. नंतर त्यांचा राजकीय क्षेत्रात शिरल्याचा इतिहास आठवा, त्यांनी तिथे यशस्वी माघार घेतली. ती घेतली नसती तर ते पंतप्रधान सहज बनू शकले असते. ते मुळात कलाकार पिंडाचे आहेत. त्यांना कलेची उपासना करायला आवडते हे त्यांचे अलीकडचे चित्रपट पाहून स्पष्ट होते. म्हणजे ते शुद्र कसे हे स्पष्ट होते.
थोडक्यात आपण जे जात-जात म्हणतो तसे काहीच नसते. पुढच्या भागात आपण आणखी अशाच पत्रिकांचा अभ्यास करूयात. त्यामुळे ज्योतिष्यशास्त्र म्हणजे नक्की काय हेही आपल्याला स्पष्ट होईल. वरील पत्रिकांचा अभ्यास करताना पत्रिकेतील १२ स्थाने व त्यांचा अर्थ काय हेही खाली दिलेल्या चित्रात स्पष्ट होईल.
ब्राम्हण घरात जन्मलेला सचिन मैदानावर तुफान खेळत आलाय तो खरा तर जन्माने क्षत्रिय वर्णीय आहे. नेहरू, गांधी, आणि मोदी वेगवेगळ्या जातीतून आलेले पण समाजमनावर गारुड करून बसलेले आहेत. एकाकी लढणारा हिटलर खरा क्षत्रिय होता आत्तापर्यंत जगात झालेल्या सर्वात मोठ्या युद्धाचा कर्ता करविता हा तोच हिटलर. इंदिरा गांधींना वंशपरंपरेने सत्ता मिळाली. पण त्यांच्या मनातील धोरणे वेगळी होती आणि परिस्थिती वेगळी उद्भवत गेली. इंदिराजींच्या आर्थिक धोरणांचा विचार वेगळ्याने करायची गरज आहे. नाईलाज म्हणून त्यांनी युद्धे केली आणि जिंकली. पण शत्रूच्या आर्थिक दुरवस्थेचा त्यांनी नेमका फायदा उठवला. महत्वाचे म्हणजे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान ह्यांत फार मोठा आर्थिक असमतोल आहे हे विचारात घेणे महत्वाचे आहे.त्यातून त्यांच्या वैश्यत्वाची प्रचीती येते. बाबासाहेब आंबेडकर हे शुद्र वर्णीय होते म्हणून त्यांना शूद्रांचे खरे दुखः समजले. त्यांनी ज्या हिरहिरीने शूद्रांचे नेतृत्व केले असे दुसरा तिसरा कोणीही करू शकला नसता. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शूद्रांच्या अधोगतीची कारणे शोधून काढली व आपली संपन्न घटना निर्माण केली. "जावे त्याचा वंशा" हे म्हणतात ते अजिबात चुकीचे वाटत नाही. घटना लिहिणे हे निर्माणकर्त्याचे क्लिष्ट काम त्यांनी अगदी अचूक करून ठेवले, त्याला तोड नाही. शुद्र वर्णीयांचे ज्ञान हे ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णीयांच्या इतकेच होते ह्याचा पुरावा आपल्यासमोर आणून ठेवला हि त्यांची अपूर्वाई आहे. ते नुसते मानव गणाचे नव्हते तर महामानव होते. इतकेच आपण म्हणू शकतो. त्यांनी वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून त्यावरून जातीवादाची कारणे त्यांनी प्रभावीपणे आपल्यासमोर मांडली. त्या काळात वैदिकांना असा छेद देणे फारच धाडसाचे काम होते.
आता आपण अमिताभ बच्चन ह्यांचा विचार करू. अभिनय क्षेत्रात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने मोठी छाप पडणारा माणूस! पण थोडा अभिताभचा सुरुवातीचा काळ आठवा. उत्तम दिग्दर्शक मिळाल्याशिवाय एका नटाचे काम हे शुन्य असते हे ते परवाच म्हणाले होते. नंतर त्यांचा राजकीय क्षेत्रात शिरल्याचा इतिहास आठवा, त्यांनी तिथे यशस्वी माघार घेतली. ती घेतली नसती तर ते पंतप्रधान सहज बनू शकले असते. ते मुळात कलाकार पिंडाचे आहेत. त्यांना कलेची उपासना करायला आवडते हे त्यांचे अलीकडचे चित्रपट पाहून स्पष्ट होते. म्हणजे ते शुद्र कसे हे स्पष्ट होते.
थोडक्यात आपण जे जात-जात म्हणतो तसे काहीच नसते. पुढच्या भागात आपण आणखी अशाच पत्रिकांचा अभ्यास करूयात. त्यामुळे ज्योतिष्यशास्त्र म्हणजे नक्की काय हेही आपल्याला स्पष्ट होईल. वरील पत्रिकांचा अभ्यास करताना पत्रिकेतील १२ स्थाने व त्यांचा अर्थ काय हेही खाली दिलेल्या चित्रात स्पष्ट होईल.
शुभग्रह- चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे आहेत. (खरे शुभ गुरु आणि शुक्र हेच आहेत, बाकीचे चंद्र बुध ज्यांच्या बरोबर असतात तसे वागतात)
अशुभ ग्रह- रवि, मंगळ, शनि, राहू, केतू.
आपण कोण आहोत कसे आहोत हि जिज्ञासा असेल तर अगदी निशुल्क "हिंदू क्यालेन्डर" हे एप डाऊन लोड करा. आपली जन्मपत्रिका काढा आपला वर्ण, गण जाणून घ्या. आपण ज्या वर्णाचे/गणाचे आहात त्याच्या आत्मविश्वासाने जगा. जातिव्यवस्थेचा अंत करा. ती फक्त एक मध्ययुगीन जंगली संकल्पना होती. विशेषतः तरुण मुला-मुलींनी ह्याचा विचार करायला पाहिजे. गुण बघा, जात आणि पैसे बघू नका, लाथ मारून पैसे काढणारा जोडीदार मिळाला तर आयुष्यात काय कमी शिल्लक राहते??
वाचकांनो कृपया तुमच्या प्रतिक्रिया द्या.
श्रीरामाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करण्यासाठी http://serveveda.org/?p=87 इथे भेट द्या. श्रीरामाच्या पत्रिकेचा कालखंड अचुकपणे शोधण्याचा दावा i-serve ह्या संस्थेने केला आहे. श्रीरामाच्या पत्रिकेत सर्वच ग्रह उच्चीचे आहेत. शिवाय बाकीचे राहिलेले स्वराशीचे बलवान आहेत. पण एक सत्य त्या पत्रिकेत दिसते कि श्रीराम हे देव गणाचे शुद्र वर्णीय होते. म्हणूनच कैकेयीने त्यांना राजेपद नाकारले का? किवा तेथील वैदिकांना हि बाब खटकली म्हणून त्यांनी रामाला वनवासात पाठवले? भरताची पत्रिका माझ्याकडे नाही. पण कारणे मोठी विचार करण्यासारखी आहेत. श्रीकृष्ण आणि राम उच्च ग्रहयुक्त पण अनुक्रमे वैश्य आणि शुद्र म्हणून जन्माला आले. त्यांना वैश्य आणि शूद्रांचे पुनरुत्थान करायचे होते का? रामाने शबरीची उष्टी बोरे का खाल्ली? गाई-गुरे पाळणारा श्रीकृष्ण आणि वनवासाला जाणारा, पत्नीला त्यागणारा राम ह्यावरून हेच स्पष्ट होते. याशिवाय वैदिक कालखंड आणि त्यात वर्णन केलेली ग्रहस्थिती नक्षत्र कशी अचूक जुळतात हेही मोठे उद्बोधक रहस्य इथे http://serveveda.org/?p=141 पहा. हा संशोधनाचा नवा आयाम आहे. बघूया पुढे काय होते ते!!
अशुभ ग्रह- रवि, मंगळ, शनि, राहू, केतू.
आपण कोण आहोत कसे आहोत हि जिज्ञासा असेल तर अगदी निशुल्क "हिंदू क्यालेन्डर" हे एप डाऊन लोड करा. आपली जन्मपत्रिका काढा आपला वर्ण, गण जाणून घ्या. आपण ज्या वर्णाचे/गणाचे आहात त्याच्या आत्मविश्वासाने जगा. जातिव्यवस्थेचा अंत करा. ती फक्त एक मध्ययुगीन जंगली संकल्पना होती. विशेषतः तरुण मुला-मुलींनी ह्याचा विचार करायला पाहिजे. गुण बघा, जात आणि पैसे बघू नका, लाथ मारून पैसे काढणारा जोडीदार मिळाला तर आयुष्यात काय कमी शिल्लक राहते??
वाचकांनो कृपया तुमच्या प्रतिक्रिया द्या.
श्रीरामाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करण्यासाठी http://serveveda.org/?p=87 इथे भेट द्या. श्रीरामाच्या पत्रिकेचा कालखंड अचुकपणे शोधण्याचा दावा i-serve ह्या संस्थेने केला आहे. श्रीरामाच्या पत्रिकेत सर्वच ग्रह उच्चीचे आहेत. शिवाय बाकीचे राहिलेले स्वराशीचे बलवान आहेत. पण एक सत्य त्या पत्रिकेत दिसते कि श्रीराम हे देव गणाचे शुद्र वर्णीय होते. म्हणूनच कैकेयीने त्यांना राजेपद नाकारले का? किवा तेथील वैदिकांना हि बाब खटकली म्हणून त्यांनी रामाला वनवासात पाठवले? भरताची पत्रिका माझ्याकडे नाही. पण कारणे मोठी विचार करण्यासारखी आहेत. श्रीकृष्ण आणि राम उच्च ग्रहयुक्त पण अनुक्रमे वैश्य आणि शुद्र म्हणून जन्माला आले. त्यांना वैश्य आणि शूद्रांचे पुनरुत्थान करायचे होते का? रामाने शबरीची उष्टी बोरे का खाल्ली? गाई-गुरे पाळणारा श्रीकृष्ण आणि वनवासाला जाणारा, पत्नीला त्यागणारा राम ह्यावरून हेच स्पष्ट होते. याशिवाय वैदिक कालखंड आणि त्यात वर्णन केलेली ग्रहस्थिती नक्षत्र कशी अचूक जुळतात हेही मोठे उद्बोधक रहस्य इथे http://serveveda.org/?p=141 पहा. हा संशोधनाचा नवा आयाम आहे. बघूया पुढे काय होते ते!!
No comments:
Post a Comment