Saturday, 5 September 2015

भाकड कथा आणि सत्य : खंडोबा

काही संकल्पना व त्यांचा अर्थ.

आपल्या देवांचे खरे स्वरूप काय होते हे समजून घेण्यासाठी काही मुलभुत संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. 
त्यासाठी मुळात ब्रम्हा, विष्णू, महेश हे त्रिकुट काय प्रकार आहे आधी समजून घ्यायला लागेल.
१) तर ब्रम्हा म्हणजे मानवाला ज्ञान देऊन मानव जन्म प्राप्त करून देतो म्हणून त्याला ब्राम्हण वर्णाची प्रतिनिधी मानला आहे. त्याची पत्नी सावित्री, सावित्रीचा अर्थ प्रकाश देणारी, म्हणजे ज्ञान देणारी देवता व कन्या सरस्वती. 
२)विष्णू हा वैश्य (वैशस-ण) वस्तूंची देवाणघेवाण करणारा व त्याद्वारे समाज पोसणारा, पालक आहे. त्याची पत्नी लक्ष्मी हि संपत्तीचे प्रतिक मानली जाते. हा वैश्य वर्णाचा प्रतिनिधी
मानला आहे..
२) महेश हा महीचा ईश, म्हणजे पृथ्वी नियंत्रित करणारा, क्षेत्र नियंत्रित करणारा, संहार आणि नियंत्रण करणारा क्षत्रिय वर्णाचा प्रतिनिधी आहे. शक्ती त्याची पत्नी आहे. शक्ती म्हणजे शस्त्र हेही स्पष्ट आहे.
म्हणजे ह्या वरील तीन वर्णात जन्माला आलेले महापुरुष पुढे त्या त्या प्रतिनिधी देवांचे अवतार मानले गेले असा याचा अर्थ होते. त्यायोगाने खंडोबा व वर्णाने (क्षत्रिय) होता म्हणून त्याला शिवाचा अवतार मानण्याचा प्रघात आहे. आता आपण ,
खंडोबाच्या कथेकडे वळूयात. 
 मल्हारी महात्म्य ह्या ग्रंथात खंडोबाची पूर्ण माहिती मिळते त्याचे २२ अध्याय आहेत. खंडोबाच्या लोककथा, वाघ्या मुरलीची गाणी, जेजुरीच्या परिसरातील महत्वाची ठिकाणे आणि खंडोबाची आरती ह्यांच्याशी जुळणारी माहिती मल्हारी महात्म्य ह्या ग्रंथात आढळते त्यामुळे तीच खंडोबाची मूळ कथा आहे असे समजून त्यावर आपण विवेचन करूयात.
हे २२ अध्याय पुढीलप्रमाणे,  
 १ मंगलाचरण, मणिचूर्ण पर्वतावरील सप्तऋषींच्या कुटिरांचे वर्णन, मल्हासुर कुटिरे उद्ध्वस्त करतो. यज्ञात विघ्ने आणतो त्यांच्या स्त्रिया पळवतो. 
_मल्लासुर नावाचा संबंध मल्लराष्ट्राशी जोडला जातो. मल्लराष्ट्रचा अर्थ मला सामान्य पणे (मल्ल) पैलवान लोकांचा प्रदेश असे वाटते. अशा मल्लाला मारायला नक्कीच तुल्यबळ पुरुष आणावा लागला व तो मल्लारी बनला हेही स्पष्टच आहे.
अशोकाच्या शिलालेखात जो ‘रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले. या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले. गोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते.
_आता इथे ऋषी म्हणजे नेमके कोण ? तर दोन पर्याय  उभे राहतात , एकतर ते वैदिक धर्मप्रचारक नुकतेच (नर्मदे खालील)  मध्य व दक्षिण भारतात आश्रम व्यवस्थेचा स्वरुपात येउन राहायला  लागले होते. त्यांची वैदिक संस्था  उत्तर भारतात बलवान होती.  दुसरा पर्याय म्हणजे ते इथलेच शांत जीवन जगणारे लोक होते व ते आश्रम करून राहत होते. पण हि शक्यता चुकीची वाटते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खंडोबाचा मोठा भक्त वर्ग हा पशुपालक धनगर समाजाचा आहे. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांचा विचार केला तर पशुपालनाचा टप्पा शेतीच्या आधी येतो. खंडोबाची विविध रूपे, त्याचे श्वान, अश्व, पत्नी, तिच्या कथा यावरून  त्या काळातील पशुपालक लोकांचे महत्व अधोरेखित होते. पण पुढचा प्रश्न असा येतो कि पशुपालक लोक भटके होते, ते पशूंच्या चाऱ्यासाठी फिरत होते म्हणजे ते एका ठिकाणी कुटीरे आणि आश्रम तयार करून राहत नव्हते. म्हणजे दुसरी शक्यता चुकीची वाटते म्हणून हे ऋषी हे वैदिक असावेत असेच स्पष्ट होते. 

ऋषी इंद्राकडे जातात. इंद्रदरबाराचे वर्णन, इंद्राची मदत करण्याबाबत असमर्थता, वैकुंठात जाऊन विष्णूची मदत घेण्याचा सल्ला. 
३ वैकुंठाचे वर्णन, ऋषी विष्णूची स्तुती करतात व मदतीची याचना करतात.विष्णू ऋषींसोबत कैलास पर्वतावर येतात.
४ कैलास पर्वताचे वर्णन, कैलासाची शोभा बघून ऋषी व विष्णू यांना झालेला आनंद.
५ शंकराच्या महालाचे वर्णन.
६ शंकर-पार्वती यांच्या दिव्य रूपाचे वर्णन.
म्हणजे याचा अर्थ ह्या ऋषींच्या काही प्रतिनिधींनी उत्तरेतील आपल्या  बलवान वैदिक संस्थेकडे मदत मागितली.  काही जवळच्या वैदिकांनी मदत करण्यास असमर्थता दर्शविली. त्यात काही तांत्रिक कारणांचा (दूरवर जाऊन युद्ध करणे, युद्धाचे उद्दिष्ट) इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.  बहुतेक ह्या वैदिक टोळ्या ज्या मदत करण्यास असमर्थ होत्या त्या ब्राम्हण किवा वैश्य प्रधान टोळ्या असाव्यात त्यांनाच इंद्र आणि विष्णू म्हटले गेले आहे. शेवटी ऋषींचे प्रतिनिधी कैलासा जवळील बलवान क्षत्रिय (शिव) टोळीकडे गेले. तेथील ऋषींनी आपल्या गटातील (जन्माने नव्हे कारण वैदिक जन्माधारित वर्ण व्यवस्था मानत नव्हते) जन्मकुंडलीप्रमाणे पूर्ण संस्कारित बलदंड क्षत्रिय वर्णी तरुणास आमंत्रित निवडले बहुतेक तो सपत्निक असावा. तो उत्तम सेनानी, संघटक, लढवैय्या असावा. तोच हा खंडोबा. 
 ७ ऋषी शंकराची स्तुती करतात, शंकर ऋषीगणांस अभयदान देतो, धृतमरीचा जन्म.
धृतमरी हि एक अन्यायाने शीघ्रकोपी  होणारी क्षत्रियांची उपटोळी होती ती क्षत्रिय वर्ण व पत्रिकेत मंगळ असणारे लोक ह्यांचा हा गट होता . मणी -मल्लांच्या अन्यायाच्या कथा  ऐकून हि टोळी प्रक्षुब्ध  बनली आणि युद्धोत्सुक झाली असा खरा अर्थ अभिप्रेत होतो.
८ शंकर मार्तंडभैरव अवतार घेतो, देवसैन्याचे वर्णन, युद्धास निघतात.
इथे बरेच प्रवाद आहेत, एक मत असे आहे कि, अचानक कडेपठार ह्या ठिकाणी लिंगरुपात खंडोबा (शिव) उत्पन्न झाले. त्यांचे शरीर गरम व लाल झाले होते. (ह्याचा खरा अर्थ कि एखादा सशक्त तरुण कुठूनतरी आत्मज्ञान घेऊन तिथे आला होता) व तो ध्यानस्वरुपात (लिंगरुपात) बसला होता. तेव्हा काही धनगर मुलांनी त्याला पहिले व त्याच्या अंगावर हळद व तूप ओतून शांत केले. 
दुसरे मत असे आहे कि, खंडोबा (शिव) आपल्या पूर्ण सेनेसह (शिवगण), पार्वती, नंदी, गणपती, कार्तिकेय ह्यांच्यासह माणीचूल पर्वतावर अवतारित झाले. पण हे पुढे आपोआपच खोटे ठरते. कारणे पुढीप्रमाणे,
_ खंडोबा अवतारात नंदी नसून पांढरा घोडा आहे, उत्तरेतून इतक्या त्वरेने यायला घोडा हेच उपयुक्त साधन वाटते. नंदी म्हणजे जुळवाजुळव केलेली वाटते. वाघ्या कुत्र्याचे हि तसेच म्हणावे लागेल. कारण कुत्रा हा प्राणी मानसशास्त्रीयदृष्ट्या मानवाच्या अतिशय जवळचा समजला जातो त्यामुळे तो खंडोबाने मनीचूल पर्वतावर प्राप्त केला असे होणे साहजिक आहे. 
_पार्वतीचा अवतार असलेली म्हाळसा हि खंडोबाला महाराष्ट्रात नेवाश्याला येउन मिळाली असा समज आहे. मग जी त्याचा बरोबर आली होती ती कोण? त्यामुळे खंडोबा हा सहपरिवार सापत्न जेजुरीला आला नाही हेच सिद्ध होते. 
_ तिसरे आणि सगळ्यात महत्वाचे हे स्पष्ट होते कि खंडोबा हा उत्तम नेतृत्व गुण असलेला तरुण आपल्या थोडक्या सेनेसह जेजुरीत अवतरला. त्याने इथल्याच लोकांचे संघटन उत्तमप्रकारे केले. शिवाय  खंडोबाचा जन्म व बालपण ह्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. विवाह आणि तत्सम कथा भरपूर आहेत पण जन्माची एकही कथा नाही तिथे अवतार ह्या अविश्वसनीय गोष्टीकडे सगळेच साहित्यिक घुसतात. अवताराचा खरा अर्थ मी लावलाय तोच जास्त सत्याचा जवळ जाणारा आहे. कारण खंडोबाच्या जन्माच्या विषयी फक्त "चंपाषष्ठी दिवशी अवतार धारीशी" इतकेच कळते. पण अशाप्रकारे अचानक अवतार घेण्याच्या भाकडकथेपेक्षा खंडोबाचे अवतृत (म्हणजे घोड्यावरून जमिनीवर उतरणे) हेच जास्त खरे वाटते.
९ मल्लासूरास देवसेनेच्या आक्रमणाची खबर मिळते, दैत्यगणांची युद्धतयारी.
१० युद्धाचे वर्णन.
११ कार्तिकेय व खंडगदृष्याचे युद्ध, कार्तिकेयाचा विजय.
१२ गणपती व उल्कामुखाचे युद्ध,गणपतीचा विजय; नंदी व कुटिलोमाचे युद्ध नंदीचा विजय.
कार्तिकेय आणि गणपती हे पूर्वीच्या क्षत्रिय युद्ध करणाऱ्या टोळ्यांचे महत्वाचे सल्लागार होते . त्यांनी नाना योजना  आणि युक्त्या करून शत्रूला नामोहरम केले .
१३ मणिदैत्य व खंडोबाचे युद्ध, मणीचा वध.
१४ विष्णू मल्लासूरास समजावण्याचा प्रयत्न करतात, मल्लासूर सल्ला धुडकावून युद्धास जातो.
१५ धृतमरी आणि मल्लासूराचे युद्ध, धृतमरीचा पराभव.
१६ मल्लासुराचे व खंडोबाचे युद्ध, मल्लासूराचा पराभव.
१७ मल्लासुराकडून खंडोबाची स्तुती, खंडोबा मल्लासुरास वर देतो.
१८ ऋषींच्या विनंतीनुसार मणिमल्लांच्या वधस्थळी दोन लिंगे प्रकट होतात, देवगण त्यास्थळी तीर्थयात्रेसाठी येतात.
१९ प्रेमपुरी यात्रेचे महत्त्व, .
२० प्रेमपुरी स्थळाचे वर्णन.
२१ खंडोबाच्या पूजेचे माहात्म्य.
२२ ग्रंथ वाचून मिळणारे फळ.
इथे  कथेत  किती सत्य आहे आणि असत्य आहे  हे आपण बाजूला ठेऊ , आणि मानवाच्या सांस्कृतिक टप्प्यांचा विचार करू,
१) सगळ्यात प्रथम अवतार हि कल्पना वादग्रस्त ठरते.
२) खंडोबाच्या कथेत वैदिकांनी अनेक ढवळाढवळ केले असा लोक आरोप करतात. तत्कालिक  वैदिकांना माता पिता ह्यांच्या नावापेक्षा गुणाने सक्षम असलेला समाज अपेक्षित होता. आज आपल्या देशाच्या सीमेवर जे सैनिक जातात त्यात आपल्या आई-बाप व त्यांचे घराणे मोठे म्हणून जाणारे सैनिक किती आहेत?. जातीव्यवस्था आणि निरपेक्ष वैदिक व्यवस्था ह्यातील हाच फरक आहे.
३) वैदिक निरपेक्ष धर्म सुधारक होते, त्यांनी नासदीय सुक्तात स्पष्ट सांगितले आहे कि परमेश्वर जो सगळी सृष्टी नियंत करतो तो कोण आहे? (हे आम्हालाही माहित नाही) तो हे कुठून करतो, का, कसे करतो कुठे लपून बसला आहे , तोच हा प्रचंड अंधक्कार आणि प्रकाश आहे का? असे नुसतेच त्यांचे प्रश्न!! 
वैदिक अवैदिक लढा असा पूर्वापार चालू आहे. आई-बापाच्या नावाशिवाय कर्मावर माणसाचे गुण ठरवणारे हे मूळ वैदिक होते, त्यांनी जन्माप्रमाणे जातीसंस्था ह्यावर विजय मिळवण्यासाठी मोठी ग्रंथ निर्मिती केली. तिला आपण जातीयवादी म्हणून हिणवत गेलो. पण खरे जातीयवादी आपण अवैदिक लोकच आहोत. आपल्या पुत्राप्रेमाच्या, सम्पतीच्या हव्यासापायी आपण आपले पुत्र पोत्रदि ह्यांना आपले सगळे अधिकार देत गेलो. मुला/मुलीच्या गुणांप्रमाणे त्यांनी  


















































No comments:

Post a Comment