Sunday, 2 August 2015

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था
कोणत्याही धर्माचा व त्यातील गुणावगुण ह्यांचा अभ्यास नुसताच इतिहासावरून होत नसतो, त्यासाठी तो धर्म जिथे स्थापला गेला, वाढला त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची जीवनपद्धती, उत्पन्नाची साधने, भौगोलिक स्थान हेही विचारात घेणे महत्वाचे असते.
१) हिंदू धर्माचा अभ्यास करताना नुसतेच वैदिक व इतर असा विचार करणे चूक आहे, त्यासाठी हिंदू धर्माची इतर धर्मांशी तुलना केली तर फारच महत्वपूर्ण माहिती हाती लागते.
अ) हिंदू धर्म जिथे वाढला तिथे शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. तसेच नागरिकीकरण झालेले होते. त्यामुळे शेतीवर आधारित समाजरचना अस्तित्वात आली. शेती करणारा, त्या मालाची विक्री (देवाण घेवाण) करणारा व थोडेफार रक्षण करणारा समाज येथे तयार झाला. भारताचा उत्तर, वायव्य भाग दुर्गम असल्याने अंतर्गत भागावर सहसा सतत अक्रमने झाली नाहीत (चंगेज खान हा भारतात न घुसता मध्य पूर्वेत गेला होता त्याआधी खलिफा क्र. १ अनेकदा सिंध पर्यंत येउन माघारी गेला होता कारण त्याच्या सैनिकांनी त्याला सांगितले कि पुढे मोठे वाळवं
आहे तिथे आपल्याला लुटायला काहीच नाही. ).
ब) याउलट इस्लाम, ख्रिश्चन आदि
धर्म हे टोळीवाल्यांच्या प्रदेशात वाढले. त्यांचे थोडेफार पशुपालन होते. त्यांचे प्रमुख उद्योग पशुपालन त्यामुळे पशूंना लागणारा चारा ह्यासाठी भटकणे, अक्रमणे करून लुट मिळवणे हेच होते. त्यात त्यांना वर्ग जाती व वर्ण तयार करणे अशक्य होते. कारण समाज वर्गात विभाजित झाला तर लढाईला संख्याबळ कमी पडत असे. पूर्वी लढल्या संख्याबळावर लढल्या जायच्या हे  वेगळे सांगायची गरज नाही.
क) हिंदू धर्मात रक्षण करणारा वर्ग पूर्वी अस्तित्वातच नसावा कारण त्याची गरज नव्हती. जो रक्षक समाज होता तो फक्त अंतर्गत नियमन करणारा पोलीस सदृश राजा होता.
ड) ग्रामीण भागात जातीय/वर्णीय व्यवस्था अजून टिकून आहे त्याचे कारण तिथे शेती अजून टिकून आहे. वाढत्या शहरीकरणात वर्ण/जातीव्यवस्था गळून पडत आहे हे त्याचेच पुढचे कारण.

No comments:

Post a Comment