मोदी सरकार आले आणि नेमका सिंहस्थ कुंभमेळाही आलाय. पण सरकारची डोकेदुखी वेगळ्या कारणाने वाढली आहे. ते कारण म्हणजे पावसाअभावी पडलेला दुष्काळ. त्यामुळे हा सिंहस्थ कुंभमेळा काय प्रकार आहे जाणून घेण्याची आपली सर्वांचीच उत्कंठा ताणली गेली आहे. तो काही योगायोगाचा भाग आहे का म्हणून सध्याच्या सरकारच्या नशिबी आला ? हेही आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.
कुंभमेळा आणि आकाशिय ग्रहांचा संबंध आहे हे बहुतेकांना माहित आहे. जेव्हा गुरु हा ग्रह सिंह राशीला येतो तेव्हा कुंभमेळा साजरा होतो हे सर्वाना माहित आहे. म्हणून त्यासाठी आपण आधी गुरु आणि सिंह राशीची माहिती करून घेऊ. गुरु हा पृथ्वीच्या जवळचा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. भौतिकशास्त्रीय दृष्ट्या आपल्या गुरुत्वाच्या शक्तीने सुर्यमालेला स्थिरता देण्याचे काम गुरूच करतो हे शास्त्राज्ञानी आधीच सिद्ध केले आहे. गुरुचे महत्व ज्योतिष्यशास्त्रातही तितकेच आहे. गुरु हा फार महत्वाचा शुभग्रह मानला गेला आहे. विपुलता, धष्ट-पुष्टता, शुभत्व, नैतिकता, भरभराट, वृद्धी, संचय ह्यांचा कारक गुरु हा आहे.
सिंहस्ठ काळात हा गुरु नेमका सिंह राशीला येतो. सिंह रास हि रवीची स्वतःची रास आहे. तसेच ती अग्नितत्वाची रास आहे. मेष, सिंह आणि धनु ह्या अग्नितत्वाच्या राशी आहेत. पण त्यातले त्यात सिंह हि रवीची असल्याने आधीपासूनच जास्त प्रभावी मानली गेली आहे. शिवाय रवि आपल्या सौरमालेचा राजा, असे असूनही हा एक पापग्रह समजला गेला आहे. त्याला उग्रता, राजकीय कठोरता, उष्णता, शुष्कता, ओसाडपणा, अध्यात्म आणि पर्यायाने येणारे वैराग्य ह्यांचा कारक समजले जाते.
आता थोडक्यात पहा, जेव्हा गुरु हा पिककपाण्याचा व भरभराटीचा कारक असलेला ग्रह जेव्हा सूर्याच्या उग्र राशीला जातो तेव्हा काय होणार? पाउस कमी, उष्णता वाढणार. म्हणजेच थोडक्यात दुष्काळ.
म्हणजे सिंहस्ठ हा काळ दुष्काळासाठी समजला जाणारा काळ होता व आहे. १७७०, १८७६-१८७७, १९७२ चा मोठा दुष्काळ असताना गुरु धनु राशीला होता, १८९७ ते १८९९ चा दुष्काळ असताना गुरु सिंह राशीला होता. दुष्काळ हा आपल्या पाचवीला पुजला आहे आणि होता. पण त्यावर संशोधन करून काहीतरी तारतम्य काढायचे काम गेल्या १०० वर्षांत कोणीही केले नाही. आता मोदी सरकारची ह्या दुष्काळाने मोठी गोची होणार आहे.
आता आपले पूर्वापार साजरे होत आलेले सण कसे ऋतूचक्राप्रमाणे साजरे केले जात हे थोडे पाहू! लग्नसराई फेब्रुवारी ते जूनचा पाऊस सुरु होईपर्यंत आणि मग परत नोव्हेंबरला तुळशीच्या लग्नानंतर अशी नियोजित केलेली आहे. मोठे सण नवरात्रापासून सुरु होतात ते दिवाळीपर्यंत, म्हणजे नेमके शेतीची कामे संपलेली असतात. शेतकरी जरा निवांत झालेला असतो अश्या वेळी. बलिप्रतिपदा तर सर्वांना माहीतच आहे. यमद्वितीया म्हणजे भाऊबीज हा पुराणातील चांद्रसेनीय कायस्थ लोकांचा सण आहे. चित्रगुप्ताने यमाला मदत केली आणि त्याच्या कामातून सवड मिळवून दिली म्हणून तो त्याच्या बहिणीला भेटू शकला अशी ही कथा आहे अशा इतर अनेक कथा आहेत. सुर्यषष्ठी, रथसप्तमी, शिमगा (होलिका) असे आपले असंख्य प्राचीन सण अश्या प्रकारे ऋतूचक्राप्रमाणे ठरवले गेले होते. गणेश चतुर्थी आणि गणपती हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या साजरा करायला सुरुवात केली. त्यापूर्वी ब्राम्हण लोकांना संकष्टी चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे व्रत माहित होते. कारण आपण आधीच पहिले कि गणपती हि बुद्धी-सिद्धीची देवता आहे. तिची उपासना करायचे सामान्य बहुजन वर्गाला करायचे काहीही प्रयोजन नव्हते.
अगदी अश्याच प्रकारे सिंहस्थ कुंभमेळा हा ह्या काळात येणाऱ्या अवर्षणाच्या दृष्टीने मुद्दाम धार्मिक कार्यासाठी राखून ठेवलेला होता असे पुढे सहज स्पष्ट होते. शेतकरी मर-मर राबतो. त्याला सुद्धा थोडा बदल हवा असतो. युरोप आणि अमेरिकेत असे बदल घडविण्यासाठी नवीन सण जन्म घेत आहेत. आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत सुद्धा असे सण आणि उत्सव नुसते एका वर्षापुरते नव्हे तर अनेक शतकांचा विचार करून ठरवले गेले होते, त्यातलाच हा वैदिक आणि अवैदिकांनी स्वीकारलेला सण म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा हा होय.
दुष्काळाची चाहूल व त्यांचा इतिहास जर समजून घेतला तर त्याचा सामना करायचे योग्य नियोजन आपण करू शकू.
आता आपले पूर्वापार साजरे होत आलेले सण कसे ऋतूचक्राप्रमाणे साजरे केले जात हे थोडे पाहू! लग्नसराई फेब्रुवारी ते जूनचा पाऊस सुरु होईपर्यंत आणि मग परत नोव्हेंबरला तुळशीच्या लग्नानंतर अशी नियोजित केलेली आहे. मोठे सण नवरात्रापासून सुरु होतात ते दिवाळीपर्यंत, म्हणजे नेमके शेतीची कामे संपलेली असतात. शेतकरी जरा निवांत झालेला असतो अश्या वेळी. बलिप्रतिपदा तर सर्वांना माहीतच आहे. यमद्वितीया म्हणजे भाऊबीज हा पुराणातील चांद्रसेनीय कायस्थ लोकांचा सण आहे. चित्रगुप्ताने यमाला मदत केली आणि त्याच्या कामातून सवड मिळवून दिली म्हणून तो त्याच्या बहिणीला भेटू शकला अशी ही कथा आहे अशा इतर अनेक कथा आहेत. सुर्यषष्ठी, रथसप्तमी, शिमगा (होलिका) असे आपले असंख्य प्राचीन सण अश्या प्रकारे ऋतूचक्राप्रमाणे ठरवले गेले होते. गणेश चतुर्थी आणि गणपती हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या साजरा करायला सुरुवात केली. त्यापूर्वी ब्राम्हण लोकांना संकष्टी चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे व्रत माहित होते. कारण आपण आधीच पहिले कि गणपती हि बुद्धी-सिद्धीची देवता आहे. तिची उपासना करायचे सामान्य बहुजन वर्गाला करायचे काहीही प्रयोजन नव्हते.
अगदी अश्याच प्रकारे सिंहस्थ कुंभमेळा हा ह्या काळात येणाऱ्या अवर्षणाच्या दृष्टीने मुद्दाम धार्मिक कार्यासाठी राखून ठेवलेला होता असे पुढे सहज स्पष्ट होते. शेतकरी मर-मर राबतो. त्याला सुद्धा थोडा बदल हवा असतो. युरोप आणि अमेरिकेत असे बदल घडविण्यासाठी नवीन सण जन्म घेत आहेत. आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत सुद्धा असे सण आणि उत्सव नुसते एका वर्षापुरते नव्हे तर अनेक शतकांचा विचार करून ठरवले गेले होते, त्यातलाच हा वैदिक आणि अवैदिकांनी स्वीकारलेला सण म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा हा होय.
दुष्काळाची चाहूल व त्यांचा इतिहास जर समजून घेतला तर त्याचा सामना करायचे योग्य नियोजन आपण करू शकू.
No comments:
Post a Comment