Saturday, 29 August 2015

जन्मपत्रिकेतील चार वर्ण व तीन गण.

आता  आपण जन्मपात्रिकेतील चार वर्ण आणि त्यांचे स्वभाव कसे ते बघूया.
१) ब्राम्हण वर्ण:
_हा कधीही व्यायाम करून शरीरयष्टी बळकट करणार नाही.
_बोलणार अतिशय मोजके. पण ह्याची एखाद्याशी नाळ जुळली कि त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो.
_स्वतःची शारीरिक आणि मानसिक कमजोरी हुशारीने लपवून ठेवणार आणि दुसर्याच्या मर्मावर बरोबर बोट ठेवणार!
_अति उन्ह, थंडी, पाऊस अशात ह्याला लगेच त्रास होतो.
_स्वतःच्या वेळा अगदी पळणार. दुसर्यांच्या वेळेची फारशी तमा बाळगत नाही. 
_स्वच्छता जरी म्हणत असला तरी त्याची फार तमा बाळगत नाही.
_स्वतःच्या खिशातले पैसे कधीच काढणार नाही. गावाबाहेर गेला तर सर्व नातेवाईक ह्यांचे पत्ते नीट जपून ठेवणार.
_विश्वातील सगळे सत हे आपल्याच मुळे अबाधित राहिले आहे असा प्रत्येक ब्राम्हण वर्णीयाचा समज असतो.
_समोर वाघ काय साधे कुत्रे जरी आले तरी हा पळून जातो.
अश्या अनेक गमतीजमती आहेत ह्या ब्राम्हण वर्णाच्या.

२) आता शुद्र वर्णाकडे वळू.
_मुळात शुद्र म्हणजे शू: ह्या शौच, तथा शुचिता आणि पुढे स्वच्छता ह्या शब्दाचे कारण आहे. द्र हा देणारा द्र आहे. शुचिता देतो तो शुद्र. असा मूळ वैदिक अर्थ आहे. _स्वभावाने सगळ्यात आळशी हा शुद्र. त्याला उठवून उठवून कामाला लावावे  लागते. शेवटी जे शिल्लक राहते ते त्याला काम करावे लागते हा यज्ञ संस्थेतील मूळ अर्थ वैदिकांना माहित होता. म्हणून सगळा सोहळा आटोपला कि जागा होऊन साफसफाई करणारा हा वैदिक शुद्र होय.
_नंतर हा अर्थ काही कारणांनी अधिक विस्तृत होत गेला.
_शूद्राला स्वतःचे मत तयार व्हायला थोडा अधिक जास्त काळ लागतो. पण ज्यावेळी त्याचे स्वतःचे मत प्रगल्भ नसते तेव्हा तो जे त्याला पटलेले आहे त्याला पूर्णपणे चिकटून राहतो.
_शूद्राची कष्ट करण्याची क्षमता अफाट असते. तो शारीरिक श्रम किवा मानसिक श्रम अफाट करू शकतो. पण त्याला अजिबात जाणीव करून देऊ नका कि तो कष्ट करतोय ती. एखादे गाणे गुनगुनत तो संपूर्ण घर धुवून काढेल, किवा २४ तास नेटवर मान मोडून एखादा शोध घेत राहील.
_ तुमच्या दारात एखादे कुत्रे, किवा गाढव मरून पडले तर उचलायला दोनच वर्ण पुढे येतात ते म्हणजे शुद्र आणि क्षत्रिय.   

३) आता आपण क्षत्रिय वर्णाकडे वळू, ह्या वर्णातील वैदिकांचा क्षत्रिय आणि शेतकऱ्यांचा क्षेत्रीय ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. वैदिक क्षत्रिय हा क्षत करणारा क्षतिःय, क्षत्रप असा आहे त्याचबरोबर क्षत्रपाळ, म्हणजेच छत्रपाल हा शब्द पुढे आला नंतर त्याचे छत्रपति अशी व्युत्पत्ती झालेली आहे. त्याआधीच ग्रामीण भागातील मोठमोठ्या शेत्या ह्या क्षेत्रीय, शेतकरी लोकांनी पटकावल्या. शिवाय वैदिकांनीही त्यांना गपचूप मान्य करून घेतले. कारण त्यांना क्षत्रिय शुद्र हा सगळा समाज आयता मिळाला होता. त्यांनी आपली जुनी वर्णीय नावे नवीन लोकांना चिकटवली. शेतकरी हे लोक साधे होते त्यांनीही आपल्या आजच्या संस्कृत संशोधकांसारखे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र ह्या शब्दाचे अर्थ जुळवायचा प्रयत्न केला. वैदिकांनी दरवेळी त्यांना जो त्यांच्या धर्माप्रमाणे अर्थ अभिप्रेत होता तोच सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकून घेतोय कोण? ज्याला सगळ्यात मोठा वाटा मिळालाय तो कशाला पुढे येउन आपल्या वाट्यात  वाटेकरी करून घ्यायला तर होणार? विस्तृत जमिनीबरोबर बहुपत्नीत्व ह्यासारखी अनेक सुखे आपोआपच क्षेत्रीय लोकांना प्राप्त झाली. सत्युगात एकपत्नी राम झाला आणि पुढे तोच कृष्ण कसा झाला ह्यातले गूढ हेच आहे.
 वैदिक स्वतःच्या लढवैय्या समाजाची संख्या वाढवण्यात विलक्षण चाणाक्ष होते. पण नाईलाजास्तव त्यांना आता एका अनोळखी लोकांना क्षत्रिय समजून त्यांची संख्या वाढवायला मूक अनुमती द्यावी लागली. वैदिक इथे काहीच करू शकत नव्हते. ते मोठे तत्वज्ञान सांगू शकत होते पण समाजात बदल घडवून आणण्याइतकी त्यांची शक्ती नव्हती. आत्ताही तेच चालू आहे, हे नीट विचार केला तर चटकन लक्षात येते. .....contd

No comments:

Post a Comment