Sunday, 2 August 2015

पुरोगाम्यांचा सूळसूळाट?

पुरोगाम्यांचा सूळसूळाट
 लेखाचा विषय जरा कटू शब्दाने वर्णीत केला आहे पण मुळात पुरोगामी ह्या शब्दाबद्दल काही फार राग नाही, पण कधी कधी असे वाटते कि तथाकथित पुरोगामी लोक आपल्या समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास एका विचित्र अलिप्त टोकावरून करत असतात. त्यांनी आपल्या देशाचा खालीलप्रमाणे अभ्यास, करणे गरजेचे आहे
  • भौगोलिक स्थान,
  • कटू-गोड इतिहास,
  • लोकांच्या उपजीविकेची साधने,
  • इथे जन्मलेले धर्म व विचार
कॉंग्रेसचे विचार पुरोगामी होते असे वाटून भारतीय जनतेने त्यांना ६० वर्ष वंशपरंपरागत सत्ता भोगायला दिली. सुरुवातीला ते पुरोगामी विचार मोठे रोचक वाटत होते, पण नंतर नंतर त्यातला फोलपणा स्पष्ट होत गेला. आणि मे २०१४ ला ऐतिहासिक सत्तापालट होऊन कोन्ग्रेस हा पुरोगामी पक्ष विरोधी नेतेपदाची दावेदारीही सांगू शकला नाही. हजारो वर्षे पुरोगामी विचारांचा लढा देणाऱ्या आपल्या देशाने हा विचार का केला? का नाकारले ह्या पुरोगामी पक्षाला? ह्या लेखात पुरोगामी नावाखाली सध्या काय चालू आहे, काय आहे, ह्याचा उहापोह केला आहे.
  
१) सध्याचे पुरोगामित्व हे भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाला अधोगामी ठरवत चाललेले पुरोगामित्व आहे. बरेचसे पुरोगामी देशाचे व समाजाचे  वाट्टोळे हे वैदिक ह्यांनीच केले हे पटविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात.  पुरोगामी विचारतात कि समजा सगळे मुस्लिम भारतातून निघून गेले तर आपले सगळे प्रश्न संपतील का? त्यांना एक प्रश्न विचारायला हवा कि, वैदिक शिल्लकच नाहीत, ते संपुष्टात आल्याने समाज फार बदललाय का? समाजाचे सगळे प्रश्न सुटलेत का? ज्यांनी आत्तापर्यंत ज्ञान आपल्या ताब्यात ठेवले ते ते तथाकथित वैदिक तर परदेशात पळून गेलेत. थोडेफार राहिलेत तेही पळून जायच्या मार्गावर आहेत. मग उच्चवर्णीय राहतात कोण? तर राहतात क्षत्रिय, (म्हणजे मराठे) त्यांना फक्त लढायला लावले गेले. लढायला लावणारे जसे वैदिक होते तसेच वैश्य व शुद्रही होते, कारण लढणे हि सामाजिक जबाबदारी होती. शुद्र आणि वैश्य आम्ही लढायला जबाबदार नाही असे म्हणून हात काढून घेते झाले नसतील हे हे सत्य असू शकते. 

दहशतवादाचे उद्दातीकरण
इतिहासाचे दाखले देताना पुरोगामी नेहमी वेद, त्यातील हिंसा, वैदिक वान्ग्मायाचा भंपकपणा ह्यावर हिरहिरीने लिहितात पण पण इतर धर्मातील हिंसा व त्यातील दाखले ह्याबद्दल नेहमीच आदराने बोलतात. त्यांच्या ह्या लूटमारीत किती पुरुष मेले, किती बायकानची अब्रू लुटली गेली, किती गुलाम देशातून बंदी बनवून नेले गेले ह्याचा आकडा हे पुरोगामी शोधत नाहीत. 
पुरोगामी संकल्पना
पुरोगमी म्हणजे आपल्या जुनाट संस्कृतीला नावे ठेवणे असे झाले आहे. त्यापेक्षा आपले पूर्वज कशा प्रतिकूल परिस्थितीत राहत होते. प्रतिकूल जीवन असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण संकल्पना जन्माला घातल्या. ह्यांचा पूर्ण अभ्यास न करता विचार करणे म्हणजे पुरोगामी असे पुरोगामित्वाचे स्वरूप झालेले आहे. त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी ह्यातील सीमारेषा आपली चिकित्सावृत्ती आणि प्रतिगामी लोकांचे जीवन जाणून घेण्यावरून अवलंबून आहे. आत्ता आपण एक रात्र वीजपुरवठा बंद झाल्यास नुसते उकाड्याने अस्वस्थ होण्याशिवाय अनेक प्रश्नांना आपण तोंड देतो. आत्ताची पिढी रात्री भटकण्याला पुरोगामी समजते. पण हे इतिहासात किती अवघड होते? आत्ताही काहींना ते सोपे असले तरी काही अपवाद वगळता सर्वांना ते चमत्कारिक वाटते!

No comments:

Post a Comment