बरेचदा अनेक लोक वास्तुशांती, विवाह, नक्षत्र शांती कर्म ह्यावर भरमसाट पैसे खर्च का करायचे असा प्रश्न विचारतात. ह्याची लौकिक कारणे आहेत. ती समजून घेणे आवश्यक आहे.
वास्तुशांती: एक उदाहरण देतो, काही वर्षापूर्वी आमच्या जवळच्या बिल्डींगमध्ये एक नवीन भाडेकरू राहायला आला. त्याच्याबरोबर दोन बायका आणि २ मुले होती. त्यातली त्याची बायको कुठली हे काही कळाले नाही. घरात रात्री-अपरात्री वाद होत असत. मुले रडत असत. पण ते कुटुंब एकतर कुणाशीही बोलत नव्हते शिवाय परप्रांतीय होते त्यामुळे त्यांच्याशी कोणाचेच बोलणे चालणे नव्हते. त्यांचे जवळपास कोणी नातेवाईक नव्हते. असे दिवस चालले होते आणि अचानक त्या घरासमोर मोठी गर्दी झालेली दिसली. चौकशी केली असता त्या घरातील माणसाने आत्महत्या केल्याचे कळले.
घडले ते वाईटच होते. आपल्या आजूबाजूला अनेक नवीन लोक येउन राहतात. त्यांची पार्श्वभूमी आपल्याला माहित नसते. नंतर अशा दुर्घटना घडल्यावर आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो तेव्हा विचित्र माहिती समोर येते. ती खरी असते की खोटे हे लगेच स्पष्ट होत नाही. ह्या सगळ्या प्रकारामागे काहीतरी अनैतिक दडले आहे हे मात्र आपल्याला समजलेले असते. लोक एखादी सदनिका किवा बंगला विकत/भाड्याने घेतात आणि तिचा कुंटणखाना म्हणून वापर करतात. किवा लोकांना आर्थिक गंडा घालायच्या संस्था तिथून चालवतात. असले काहीही उद्योग लोक करू शकतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजातील संवाद कमी होत चालला आहे.
पूर्वी असे होत नसे. एखादा कुविख्यात माणूस व त्याचे घर हे ठरलेले असे. नवीन घर केले कि वास्तुशांतीच्या निमित्ताने गुरुजी बोलावले जात. हे गुरुजी म्हणजे त्या काळातील एक शिकलेला व सद्सदविवेकबुद्धी असलेला (खोटे न बोलणारा) साक्षीदार असे. तो यजमान कोण? त्याची पत्नी कोण? त्याची मुले किती इत्यादी साधारण माहिती न सांगता जाणून घेत असे. पुढे त्या घराच्या मालकीचे काही वाद झाले तर त्यासाठी हा साक्षीदार महत्वाचा होता.
गुरुजीनंतर सगे-सोयरे, आप्त, शेजारी-पाजारी, गावातील समाजाचे लोक वास्तुशांतीला सहभोजन करण्यास बोलावले जात. हेही खरेतर साक्षीदार असत. "पंचमुखी परमेश्वर" अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे पाच लोक जे सांगतात ते सत्य असा त्याचा साधा अर्थ आहे. हे सगळे लोक नुसते साक्षीदार नसून काही तंट्याच्या प्रसंगी समुपदेशक म्हणून मोठी भूमिका निभावत असत.
पूर्वी पोलिस नसत. गाव-पाटील बरीच पोलिसांची कामे करीत असत. हा पाटील चांगला कि वाईट असे याबद्दल वाद आहेत. भ्रष्टाचार आपल्या पाचवीला पुजला आहे. तेव्हाचे सामाजिक पोलिस आणि आत्ताचे पोलिस हे ह्याला अपवाद नाहीत. पण एकंदर प्रतिष्ठा आणि नैतिकता ह्यांना खूप महत्व असल्याने लोक चांगलेच होते असे गणित निघते. पाटील गाव-पाटील जरी असला तरी दोन बायका केल्यावर पहिली बायको घरातूनच त्याला विरोध करीत असणार हे सहज कोणीही सांगू शकेल. असो.
ब्रिटीश काळात पोलिस यंत्रणा आली. ती दंडेलशाहीच्या स्वरुपात आली. तिचे पाटीलकीचे सौम्य समुपदेशकाचे स्वरूप नव्हते. तिथे कायद्याचा बडगा होता. ती अजूनही काहीश्या तश्याच स्वरुपात टिकून आहे. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. अर्थात तो एक स्वतंत्र विषय आहे म्हणून इथेच थांबतो.
तर थोडक्यात वास्तुशांती हा एक समाजाशी संवाद स्थापन करायचा सोहळा आहे. हा संवाद गरिबाने कसा स्थापन करायचा? गरीब माणूस हा संवाद स्थापन करू शकत नाही याला आपली भ्रष्ट समाजव्यवस्था कारणीभूत आहे. गुरुजी वास्तुशान्तीचे भरमसाठ पैसे आकारतात. आहेर देणे-घेणे होते. प्रतिष्ठा जपण्यासाठी मोठे जेवण, हॉल, कार्याक्रम हे केले जाते तो पैसाही असाच कुठूनतरी आलेला असतो. पण गरीब माणूस हे सगळे टाळून साधा कार्यक्रम करू शकतो. साधे कलश पूजन करून गुरुजींना टाळू शकतो. अगदी जवळच्या १०-१५ नातेवाईक व शेजारी ह्यांना बोलावून हा सोहळा करू शकतो. जेणेकरून एक सामाजिक सुसंवाद प्रस्थापित होऊ शकतो. तुम्ही कर्म करीत राहिला तर आर्थिक प्रश्न येत नाहीत. अशावेळी आप्त, शेजारी ह्यांना आर्थिक संकटात पैसे मागायला जायची गरज राहत नाही. पण अनेक कौटुंबिक आणि तत्सम प्रश्न एकमेकांच्या मदतीने तुम्ही सोडवू शकता, आपले स्वरूप स्वच्छ ठेवण्यास ह्याच आप्त शेजार्यांचा अंकुश तुमच्यावर राहतो. वेळप्रसंगी वाद चव्हाट्यावर न येता घरातल्या घरात सोडवले जातात.
विवाह: विवाहाचे पारंपारिक, वैदिक तसेच देव, गंधर्व, पिशाच्च, राक्षस असे अनेक प्रकार आहेत, सामान्यतः आपण पारंपारिक विवाहाचा विचार करू. "विवाहसंस्थेचा इतिहास" हे श्री. राजवाडे यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात पूर्वी विवाहसंस्था कशी असू शकेल ह्याचे काही अंदाज बांधले आहेत, त्यात पूर्वीच्या काळी यज्ञाभोवती अनेक पुरुष व स्त्रिया मुक्तपणे मैथुन करीत इत्यादी अंदाज आहेत, पण हे अंदाजच आहेत असे वाटते. कारण पती-पत्नी व विवाहसंस्था ही मानवाइतकीच जुनी व मानवाचे जनुकीय वैशिष्ठ्य असलेली संस्था आहे असे वाटते. क्रौंच पक्षी आपले जीवन एकाच जोडीदाराबरोबर जगतो, इतकेच काय जोडीदार मेल्यावर तोही जीव सोडतो, असा जनुकीय इतिहास इतर अनेक प्राण्यांत आढळतो. माणूसही याच प्रकारचा प्राणी आहे. अनेक जोडीदार यांच्याबरोबर जीवन व्यतीत केल्याने काही समस्या तयार होतात हे ह्या प्राण्यांना इतिहासाने वारंवार शिकवले व ते इतके पक्के बनले कि तो त्यांचा जनुकीय विशेष बनला.
रामायण हे क्रौंच पक्षाची मानवाशी तुलना करताना बनले हेही बर्याच जणांना माहित असेलच. तर विवाह करताना बरेच सोपस्कार पार पाडावे लागतात. दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल, प्रेम असेल तर कशाला हे सोपस्कार? असा प्रश्न मनात येतोच. पण प्रेम, विश्वास ह्या प्रगल्भ कल्पना सगळ्याच लग्नाळू उमेदवारांच्या ठिकाणी नसतात. अनेकदा लाडात वाढलेल्या मुलीचे लग्न लावले जाते, तिच्या गावीही नसते कि ती दुसऱ्या एका वातावरणात जाणार आहे! तेच प्रेम दुसऱ्या घरी मिळेल कि जबाबदाऱ्या अंगावर पडतील हे तिला ठाऊक नसते, मग नवीन घरी गेल्यावर ती तिथे रुळत नाही. ज्यांनी तिचे लाड केले त्यांची तिला आठवण येते. यातून तिला प्रगल्भ व्हायला १०-२० वर्षेही लागू शकतात.
दुसरीकडे पुरुष वर्गाच्या अनेक तऱ्हा असतात. काही विचित्र प्रथा असतात. काहींच्या पूर्वजांनी चार बायका केल्या म्हणून हेही किमान दोन बायका करणार म्हणून नाचत असतात. काही पुरुष हे बायकोवर कमालीचे अधिकार गाजवणारे असतात. ती माझी बायको आहे म्हणजे तिने इतर कोणाशीच बोलायचे नाही. तिचे नातेवाईक आत्ता कशाला हवेत? अर्थात हेही परस्पर सापेक्ष असते. काही मुली पतीला देव मानण्याचा अतिरेक करू शकतात पण पती वेगळ्याच प्रकारचा असू शकतो आणि या उलटही असू शकते.
एकत्र कुटुंब असेल तर पती-पत्नीत सुसंवाद असत नाही. तसेच नोकरीच्या वेळा, झालेली मुले ह्यामुळे पती -पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत व एकमेकांकडे होणारे दुर्लक्ष अनेक गैरसमज निर्माण करते.
अशी एक ना अनेक कारणे पुढे पती-पत्नीतील दुराव्याचे आणि संघर्षाचे कारण बनतात. म्हणजे लग्न केले कि सगळे झाले असे नाही तर पुढे असे अनेक प्रसंग निभावून नेणे गरजेचे असते. अशा वादाच्या प्रसंगी सर्वात प्रथम मदतीला येतात ते आपले सगे-सोयरे! वाद अधिक विकोपाला गेले कि मग कायदा, कोर्ट आणि पोलिस. जेव्हा कोर्टात पती-पत्नी जातात तेव्हा आपले म्हणणे मांडतात. हे ते एकमेकांसमोर घरीही मांडू शकले असते पण तेव्हा त्यांना वेळ नसतो तो आत्ता मिळतो नव्हे तर काढावा लागतो!
तर थोडक्यात अशा प्रसंगी अशा जोडप्यांना समुपदेशन देणारे कोणीतरी हवे असते. त्यांची बाजू ऐकणारे कोणीतरी हवे असते. ते कामच समाज करीत असतो. त्यालाच विवाह निभावून नेणे म्हणतात. आपली विवाहसंस्था ही अतिशय नैसर्गिक अशा तत्वावर बनलेली पुरातन संस्था आहे, तिचे पावित्र्य आपण जपले पाहिजे. म्हणून विवाह करताना आजूबाजूच्या समाजाला बोलावणे, समारंभ करणे गरजेचे असते.
शांती: शांती करणे गरजेचे असलेले लोक थोडे आक्रमक असतात. जरी शांती केली तरीही थोडे ना थोडे गुण हे शिल्लक राहतातच. असे लोक अनेक प्रकारे इतरांना उपद्रवी ठरू शकतात. शिवाय ते स्वतःला त्रास करवून घेतात. गुन्हेगारी विश्वातील लोकांचा अभ्यास केला तर शांतीची गरज असताना शांती न केलेले अनेक सापडतात. नुसते शांती करवून घेणे हा उपाय नाही तर अशी शांती आवश्यक असलेल्या लोकांना काही विधायक कार्याला लावणे महत्वाचे असते. त्यांच्या काही वैचारिक समस्या, चुकलेली जडण-घडण जाणून घेणे महत्वाचे असते तेव्हाच त्यावर समाज आणि आपण योग्य उपाय करू शकतो. आणि असे मानसिक उपचार केले तर ती व्यक्ती सुधारू शकते हे शास्त्र आता सिद्ध होऊ लागले आहे हेही एक नवलच आहे.
विवाह: विवाहाचे पारंपारिक, वैदिक तसेच देव, गंधर्व, पिशाच्च, राक्षस असे अनेक प्रकार आहेत, सामान्यतः आपण पारंपारिक विवाहाचा विचार करू. "विवाहसंस्थेचा इतिहास" हे श्री. राजवाडे यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात पूर्वी विवाहसंस्था कशी असू शकेल ह्याचे काही अंदाज बांधले आहेत, त्यात पूर्वीच्या काळी यज्ञाभोवती अनेक पुरुष व स्त्रिया मुक्तपणे मैथुन करीत इत्यादी अंदाज आहेत, पण हे अंदाजच आहेत असे वाटते. कारण पती-पत्नी व विवाहसंस्था ही मानवाइतकीच जुनी व मानवाचे जनुकीय वैशिष्ठ्य असलेली संस्था आहे असे वाटते. क्रौंच पक्षी आपले जीवन एकाच जोडीदाराबरोबर जगतो, इतकेच काय जोडीदार मेल्यावर तोही जीव सोडतो, असा जनुकीय इतिहास इतर अनेक प्राण्यांत आढळतो. माणूसही याच प्रकारचा प्राणी आहे. अनेक जोडीदार यांच्याबरोबर जीवन व्यतीत केल्याने काही समस्या तयार होतात हे ह्या प्राण्यांना इतिहासाने वारंवार शिकवले व ते इतके पक्के बनले कि तो त्यांचा जनुकीय विशेष बनला.
रामायण हे क्रौंच पक्षाची मानवाशी तुलना करताना बनले हेही बर्याच जणांना माहित असेलच. तर विवाह करताना बरेच सोपस्कार पार पाडावे लागतात. दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल, प्रेम असेल तर कशाला हे सोपस्कार? असा प्रश्न मनात येतोच. पण प्रेम, विश्वास ह्या प्रगल्भ कल्पना सगळ्याच लग्नाळू उमेदवारांच्या ठिकाणी नसतात. अनेकदा लाडात वाढलेल्या मुलीचे लग्न लावले जाते, तिच्या गावीही नसते कि ती दुसऱ्या एका वातावरणात जाणार आहे! तेच प्रेम दुसऱ्या घरी मिळेल कि जबाबदाऱ्या अंगावर पडतील हे तिला ठाऊक नसते, मग नवीन घरी गेल्यावर ती तिथे रुळत नाही. ज्यांनी तिचे लाड केले त्यांची तिला आठवण येते. यातून तिला प्रगल्भ व्हायला १०-२० वर्षेही लागू शकतात.
दुसरीकडे पुरुष वर्गाच्या अनेक तऱ्हा असतात. काही विचित्र प्रथा असतात. काहींच्या पूर्वजांनी चार बायका केल्या म्हणून हेही किमान दोन बायका करणार म्हणून नाचत असतात. काही पुरुष हे बायकोवर कमालीचे अधिकार गाजवणारे असतात. ती माझी बायको आहे म्हणजे तिने इतर कोणाशीच बोलायचे नाही. तिचे नातेवाईक आत्ता कशाला हवेत? अर्थात हेही परस्पर सापेक्ष असते. काही मुली पतीला देव मानण्याचा अतिरेक करू शकतात पण पती वेगळ्याच प्रकारचा असू शकतो आणि या उलटही असू शकते.
एकत्र कुटुंब असेल तर पती-पत्नीत सुसंवाद असत नाही. तसेच नोकरीच्या वेळा, झालेली मुले ह्यामुळे पती -पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत व एकमेकांकडे होणारे दुर्लक्ष अनेक गैरसमज निर्माण करते.
अशी एक ना अनेक कारणे पुढे पती-पत्नीतील दुराव्याचे आणि संघर्षाचे कारण बनतात. म्हणजे लग्न केले कि सगळे झाले असे नाही तर पुढे असे अनेक प्रसंग निभावून नेणे गरजेचे असते. अशा वादाच्या प्रसंगी सर्वात प्रथम मदतीला येतात ते आपले सगे-सोयरे! वाद अधिक विकोपाला गेले कि मग कायदा, कोर्ट आणि पोलिस. जेव्हा कोर्टात पती-पत्नी जातात तेव्हा आपले म्हणणे मांडतात. हे ते एकमेकांसमोर घरीही मांडू शकले असते पण तेव्हा त्यांना वेळ नसतो तो आत्ता मिळतो नव्हे तर काढावा लागतो!
तर थोडक्यात अशा प्रसंगी अशा जोडप्यांना समुपदेशन देणारे कोणीतरी हवे असते. त्यांची बाजू ऐकणारे कोणीतरी हवे असते. ते कामच समाज करीत असतो. त्यालाच विवाह निभावून नेणे म्हणतात. आपली विवाहसंस्था ही अतिशय नैसर्गिक अशा तत्वावर बनलेली पुरातन संस्था आहे, तिचे पावित्र्य आपण जपले पाहिजे. म्हणून विवाह करताना आजूबाजूच्या समाजाला बोलावणे, समारंभ करणे गरजेचे असते.
शांती: शांती करणे गरजेचे असलेले लोक थोडे आक्रमक असतात. जरी शांती केली तरीही थोडे ना थोडे गुण हे शिल्लक राहतातच. असे लोक अनेक प्रकारे इतरांना उपद्रवी ठरू शकतात. शिवाय ते स्वतःला त्रास करवून घेतात. गुन्हेगारी विश्वातील लोकांचा अभ्यास केला तर शांतीची गरज असताना शांती न केलेले अनेक सापडतात. नुसते शांती करवून घेणे हा उपाय नाही तर अशी शांती आवश्यक असलेल्या लोकांना काही विधायक कार्याला लावणे महत्वाचे असते. त्यांच्या काही वैचारिक समस्या, चुकलेली जडण-घडण जाणून घेणे महत्वाचे असते तेव्हाच त्यावर समाज आणि आपण योग्य उपाय करू शकतो. आणि असे मानसिक उपचार केले तर ती व्यक्ती सुधारू शकते हे शास्त्र आता सिद्ध होऊ लागले आहे हेही एक नवलच आहे.
No comments:
Post a Comment