Monday, 11 April 2016

तुम्ही लोक जंगली जीवन जगता म्हणून आम्ही तुम्हाला सुधारण्यास आलोय!

इस्लामचा प्रचार ह्या प्रमुख तत्वावर केला जातो कि इस्लामचा जीवन जगायचा मार्ग सर्वात उत्तम, सर्वांना न्याय देणारा, समानता प्रस्थापित करणारा आधुनिक मार्ग आहे. 
जरी इस्लामी शासनकर्त्यांनी तलवारीच्या जोरावर लुट केली व इथे राज्य केले तरी ती एत्तादेशियांच्या भल्यासाठीच केली असे सांगितले जाते. 
प्रमुख प्रवाद खालीलप्रमाणे आहेत,
१) आपण अनेक देवांची पूजा करतो, हे चूक आहे, ईश्वर एक आहे हा आधुनिक विचार आहे. आपण ईश्वराची मानव स्वरुपात कल्पना करतो हेही चूक व जुनाट आहे. ज्या ईश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली तो मानव स्वरुपात कसा काय असू शकतो? ईश्वराचे मानवी स्वरूप हे  कपोलकल्पित मिथक आहे. 
२) आपण हुंडा घेतो. त्यांचे पुरुष हुंडा देतात!
३) युद्धानंतर स्त्रिया सती जात हे चुकीचे आहे. विधवा ह्या आपल्यात अशुभ समजल्या जातात. पण इस्लाममध्ये त्यांना असे वाईट स्टेटस नाही. त्यांच्याशी पुनर्विवाह करावा अशी आज्ञा आहे. 
४) चोरी, बलात्कार, अनेक व्यक्ती बरोबर लैंगिक संबंध ठेवणे, विवाहबाह्य संबंध ह्यांना कठोर शासन आहे. तसे आपल्या धर्मात नाही.
 असे एक ना अनेक मुद्दे आहेत. खरेच संपूर्ण विश्वाला सुधरवून टाकण्याची महत्वाकांक्षा ही किती सुंदर कल्पना आहे ना! जसे एकनाथांनी त्यांना चावणाऱ्या विंचवाला वाचवण्यासाठी त्याचे असंख्य चावे सहन केले पण त्याला वाचवणे थांबवले नाही. तशातलाच हा प्रकार आहे. आपण विंचू आहोत का? आपल्याला सुधरवण्यासाठी कोणीतरी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे का? 
कि जे आपल्याला सुधरावायाला आले ते आपल्याबरोबर राहून स्वतः सुधारून गेले? एका प्रगल्भ लोकशाहीत ज्याची आपण २०० वर्षापूर्वी कल्पना करू शकत नव्हतो ती आज आपण उपभोगतो आहोत हेही नसे थोडके. जिथे त्यांचा धर्म स्थापन झाला त्या वातावरणाप्रमाणे त्याची तत्वे होती. त्यापेक्षा अधिक प्रगत संस्कृती, धर्मतत्वे जगात व संपूर्ण विश्वात अस्तित्वातच  नाहीत हे समजणे असे काही त्यांचे झाले आहे का? 
तसेच आपल्या जाती, भेदभाव, भ्रष्टाचार इत्यादी कुप्रथा कौतुकास्पद नाहीत हेही समजून घेणे इथे अभिप्रेत आहे.
असे प्रश्न मनात येतात तेव्हा वाचकांच्या प्रतिक्रिया येण्यासाठी ही चर्चा उपस्थित केली आहे.

No comments:

Post a Comment