बलात्काराच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. कडक कायदे करून व शिक्षा देऊनही हा प्रकार वाढतच चाललाय. प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या त्या मनाने फारच कमी असतात पण प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर असे गुन्हे करणारे लोक पकडले जातात. कारण बऱ्याचदा बलात्कारित स्त्री वाचते, पण जेव्हा तिचा क्रूर छळ करून खून केला जातो तेव्हा जनक्षोभ उसळतो. असे असले तरी या प्रकारात स्त्रीचे व्हायचे ते नुकसान झालेले असते.
बलात्कार करणारे गुन्हेगारही बरेचदा दारूच्या नशेत कृत्य झाले म्हणून पश्चाताप करताना आढळतात. पण वेळ निघून गेलेली असते. बरेचदा न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत गुन्हेगार हे जेल किंवा पोलीस कस्टडीमध्ये बंद असतात तिथेही त्यांना पश्चाताप होत असतो. पण करता काय? म्हणजे परिणाम त्या स्त्रीला, ह्या तरुण मुलांना व दोघांच्या कुटुंबियांना भोगावे लागतात.
थोडक्यात बलात्कार करणे ही वृत्ती कमी करण्यासाठी कायकाय करावे लागेल ते जाणून घ्यावे लागेल, कायद्याने शिक्षा देऊ हे खरे झाले, पण असा गुन्हा करण्यापूर्वी तो आरोपी गुन्हेगार कसे त्याचे सर्वसामान्य जीवन कसे जगत असतो तेही जाणून त्यात काही बलात्काराची करणे दडली आहेत का हे आपण पाहू.
त्याआधी बाटली मग मांस मग बाई अशा माणसाच्या गरजा कशा वाढत जातात व नंतर तो आपोआपच बलात्काराच्या दलदलीत कसा अडकला जातो हे पाहू.
बाटली: काही राज्ये सोडली तर भारतात मद्य सर्वत्र विकले जाते. हिंदू धर्मात मद्य वर्ज नाही त्यामुळे बराचसा समाज दारूच्या विळख्यात येत आहे. काही आठवड्यातून एकदा पिणारे असतात तर काही रोज पिणारेही असतात. किंबहुना आधी आठवड्यातून एकदा पिणारा पुढे रोज पिणारा बेवडा कसा बणून जातो हेच कळत नाही. आणि दारू हे एक व्यसन असल्याने त्याची गरज शरीराला अधिकाधिक हवीहवीशी वाटू लागते.
मद्य पिण्याला भारतात धार्मिक बंधन नाही, कोणत्याही धर्माचा माणूस ते पिऊ शकतो. मद्य पिल्याने एकतर भूक लागते. शिवाय शरीर व तोंड बधिर झाल्याने माणूस त्या अवस्थेत जे समोर येईल ते खायला तयार होतो. विशेष मागणी मांसाहाराला असते. दारूमुळे वास व चव घेण्याची क्षमता कमी झालेली असते तेव्हा माणूस मांसाहाराचा आग्रह करतो, बरेच शाकाहारी लोकही मांसाहाराची चव व वास आवडत नसेल तरीही दारू पिल्यावर ते मिटक्या मारत खातात.
मांस: मांस खाण्याबद्दलही आपल्या समाजात काही खास विधिनिषेध बाळगले जात नाहीत आजकाल सगळेच मांसाहार करतात. मांसाहाराचे काही शास्त्र आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.
काही लोक आपण अमुक जातीचे म्हणजे मांसाहार केलाच पाहिजे असा विचार करणारे असतात.
काहींना जात्याच मांसाहाराची सवय असते. मांसाहारामुळे पुरुषाच्या सेक्स वृत्तीवर परिणाम होतो हे संशोधनाने सिद्ध होत आहे. कसे ते पुढे पाहू,
बाई: ह्याची काही उत्क्रांतीशी संबंधित कारणे आहेत. शाकाहारी प्राण्यांचे जगणे मांसाहारी प्राण्यांपेक्षा सोपे असते. त्यामुळे त्यांची संख्या जास्त असते व निसर्गाला ती अबाधित ठेवायची असते. कोवळे भरपूर गवत नाही मिळाले तरी खुरट्या गवतावर काही प्राणी उत्क्रांत झालेले आपण पाहतो. तसेच मांसाहारी प्राणी हे केवळ शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असल्याने त्यांची संख्या कमी असते व त्यांना ती वाढवायची असते. यासाठी अधिक सेक्स करणे गरजेचे बनून जाते. उत्क्रांतीचा पुढचा नियम बघतीला तर बहुतेक शाकाहारी प्राण्यांना १-१ पिल्लू होते तर मांसाहारी प्राण्यांना एकावेळी ३-५ किंवा अधिक पिल्ले होतात. ह्याचेही कारण मांसाहारी प्राण्याची संख्या वाढवण्याशी निगडित असते.
शाकाहारी प्राणी सतत चरत असतो तरी त्याला भूक लागते. याउलट मांसाहारी प्राणी ४-८ दिवसातून एखादी शिकार करतात व आराम करत राहतात. कारण तितके दिवस लागणारी ऊर्जा (उष्णता) त्यांना मांसाहारातून मिळते. हाच नियम थंड हवामानातील लोकांना लावला तर त्यांनी रोज मांसाहार केला तरी त्यांची ती ऊर्जा बर्न होते. पण आपल्यासारख्या उष्ण हवामानात मांसाहाराने अतिरिक्त ऊर्जा निर्माण होते हे स्पष्ट होते.
बलात्कार: तर वरील चक्रात मांसाहाराने सेक्सची भावना वाढते असे आपण पाहिले. नियमित मद्य आणि मांस घेणाऱ्या लोकांच्यात ती आधीच वाढलेली असते. डोक्यात धुंदी असते. काटा किर्रर्र असतो. शिवाय इंद्रिये सुद्धा प्रेम, प्रणय करायच्या भानगडीत पडत नाहीत. अशावेळी एखादी एकाकी असहाय मुलगी दिसली की पुरुषांच्या ताबा सुटतो. मेंदू अर्धवट शुद्धीत काम करत असतो. ह्याच वेळी एखाद्या मुलीने दिलेला दगा, किंवा धडा इत्यादी मनात आठवला की हे बलात्कारी पुरुष क्रौर्याची सीमा गाठतात. आणि वाट्टोळे होऊन जाते. मुलीचे तर होतेच होते पण ह्यांनाही पुढे पोलिसात नेल्यावर उतरलेली असते तेव्हा आपण काय केले हे आठवत नसते व पश्चाताप होत असतो.
आपण म्हणतो की युरोप अमेरिकेत तर लोक भरपूर दारू ढोसतात आणि मांसाहार करतात. पण त्यांचा प्रदेश थंड असल्याने तेवढे मांस पचवले जाते. त्यातून अतिरिक्त ऊर्जा निर्माण होत नाही. तसेच वाळवंटी प्रदेशातही (विशेषतः मुस्लिम राष्ट्रात) लोक भरपूर मांसाहार करतात. पण तिथे पहा ह्या साखळीतील मद्य त्यांनी काढून टाकलेले आहे. तिथे धार्मिक नियमानुसार मुस्लिम व्यक्तीने मद्य पिणे अवैध व बेकायदेशीर आहे, तसे आढळल्यास शरिया कोर्टात शिक्षा दिली जाते. बार मध्ये जाताना एक कार्ड (ज्यावर धर्म लिहिला आहे) ते दाखवावे लागते. शिवाय ते मांसाहार जास्त अंतराने करतात. असो.
इतकेच काय इतर प्रकारच्या अनेक गुन्ह्यातील लोक हे मद्य पिलेले असतात, त्यावरून ह्या दुष्परिणामांची माहिती कळू शकते. तर अशा गुन्ह्यांना कडक कायदे आणि त्वरित शिक्षा तर झालीच पाहिजे.
पण मुळात ज्यामुळे असे गुन्हे घडतात त्याची कारणे शोधणेही महत्वाचे आहे. बेरोजगारी मुले विवाह करण्याची ऐपत नसणे, मुलींची संख्या कमी असणे, भडक चित्रपट अशी इतरही अनेक कारणे आहेतच. त्यात वरील कारणे महत्वाची आहेत. मूलभूत कारणे दूर केली तर समाजाची नीतिमत्ता अधिक सुधृड होईल ना.
दारू पिण्याबद्दल किंवा मांस खाण्याबद्दल माझा विरोध नाही. त्याचा अतिरेक करणे हे घातक आहे इतकेच म्हणायचे आहे.
No comments:
Post a Comment