पितृदोष, कालसर्प दोष हे एकमेकांशी निगडित दोष आहेत त्यांची चर्चा आपण करूया,
त्याआधी पितृदोष, किंवा पूर्वजन्मातील केलेली पापपुण्ये म्हणजे नक्की काय भानगड आहे ते समजून घेऊ.
पितृदोष: सामान्यतः कुंडलीतील १२ व्या स्थानावरून पितृदोष सांगितला जातो, १२ व्या स्थानात जर पुरुष ग्रह (रवी, मंगळ, गुरु) अथवा स्त्री ग्रह (चंद्र, शुक्र) असे ग्रह असतील तर त्याप्रमाणे सपिंड (वडिलांकडील रक्ताच्या नात्याचे पूर्वज) पुरुष अथवा स्त्री यांचा पितृदोष आहे असे सांगितले जाते. जर ग्रह त्या त्या राशीचे स्वगृह अथवा उच्च असतील तर हे पूर्वज त्याच गुणधर्माचे असतात, उदाहरणार्थ सिंह/मेष राशीचा रवी हा एक प्रतिष्ठित व राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्ती हा आपला पूर्वज असतो. तर मेष/वृश्चिक/मकर राशीचा मंगळ हा थोडा रागीट, स्वतःच्या बळाचा वापर करणारा पूर्वज दर्शवितो. धनु/मीन अथवा कर्क राशीचा गुरु हा पापभिरू, देवभक्त असा पूर्वज दर्शवितो. ह्यात रवी, मंगळ आणि गुरु हे सर्व सांसारिक सुखे भोगून मृत झालेले पूर्वज असतात. हेच ग्रह जर शतृगृही अथवा निचीचे असतील तर तेच पूर्वज त्या त्या क्षेत्रात कुचकामी ठरलेले असतात.
त्याचप्रमाणे १२ व्या स्थानात जर स्त्री ग्रह असतील व जर ते स्वगृह व उच्चीचे असतील तर स्त्री पूर्वज ह्या शालीन, सौभाग्यवती अशा असतात. तसेच निचीचे चंद्र शुक्र हे आजारी, दरिद्री, विधवा असे स्त्री पूर्वज दर्शवितात.
याहीपुढे बुध, शनी, राहू केतू (हे नंपुसक) ग्रह जर १२ व्या स्थानात असतील तर तो पुरुष विधुर अथवा ब्रह्मचारी अथवा विधवांचा दर्शक असतो.
असो हे झाले ठोकताळे, हे सगळे विज्ञानाच्या कसोटीवर घासून-पुसून पाहिले तर काय हाती लागते?
एकदा का पित्रे मेली की सगळे संपते, त्यांचे नश्वर देह घेऊन आपण अंत्यविधी उरकतो, त्यानंतर ती पित्रे वेगवेगळ्या प्रेतयोनीत वर्षभर भटकत असतात. वार्षिक श्राद्धे व वर्षश्राद्ध केल्याने ती या चक्रा तून बाहेर पडतात. जर ही श्राद्धे केली नाहीत तर पितृदोष उत्पन्न होतो असे समजले जाते.
पण इथे बऱ्याच शंका मनात उपस्थित होतात. जसे एखाद्याचा जन्म झाल्यावर जर श्राद्धे केली नाहीत तर तो दोष पत्रिकेत कसा दिसत नाही. जन्माच्या आधीचेच का दिसते?
मुळात ज्योतिष्यशास्त्र ह्या विषयात पाप-पुण्य, आत्मा, इहलोक, परलोक इतकेच काय परमेश्वर ह्याचाही कारक म्हणून कोठेही उल्लेख नाही.
ग्रह हेच अंतिम कर्ते-करविते आहेत. पाप-पुण्य, इहलोक, परलोक हे लोकांनी नीतिमान जीवन जगण्यासाठी घातलेली भीती असावे असे वाटते, पण त्याचे दर्शन जन्मपत्रिकेत होत नाही. ज्योतिष्यशास्त्र व अध्यात्माचा संबंध हा पूर्णतः बादरायण संबंध आहे. ज्योतिष्यशास्त्रात ग्रह परिस्थितीसापेक्ष मानवी जीवनाचा अभ्यास केला जातो तर अध्यात्मात माणूस आयुष्यात काहीही झाले तरी ईश्वरनिष्ठ व पुण्य करणारा असाच अपेक्षित असतो. ह्या संकल्पना काळसापेक्ष बदलत आहेत.
निदान आधुनिक ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यासकांनी ज्योतिष्यशास्त्र आणि अध्यात्म ह्यांची गल्लत व गुंता करू नये हीच अपेक्षा हे सांगण्यामागे आहे.
तर वरील विषयाच्या अनुषंगाने १२ व्या स्थानात काय काय येते ते आधी पाहू, परदेशगमन (किंवा देशातून हाकलपट्टी) खर्च, कर्ज, नुकसान, तुरुंगवास, पायाची पावले, आजार, संन्यास, उपभोग, व्यसन, आत्महत्या व निद्रा या संबंधी बाबींचे स्थान आहे.
आपल्या पूर्वपिढीचा आपल्या जीवनावर जो परिणाम होतो, तो थोडक्यात १२ व्या स्थानातून समजतो.
ज्याच्या पूर्वजांनी घर, इमारती बांधल्या आहेत, मोठा व्यवसाय किंवा भांडवल जमा करून ठेवले आहे त्याला पर्याय नसल्याने परदेशी जावे लागणे, खर्च, कर्ज, नुकसान हे संभवतच नाही. थोडक्यात अशा व्यक्तीच्या १२ व्या स्थानात कुठलेच ग्रह नसतात. पुढे आजार, पायाची पावले (ह्याची दुर्दशा हे ढोर मेहनतीचे प्रतीक आहे तसेच काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे पायाचे गंभीर आजार होतात) हे बऱ्याचदा अनुवांशिक प्रकारचे असतात. तसेच संन्यास, उपभोग, व्यसन, आत्महत्या व निद्रा हे व्यक्तीच्या मानसिक स्थितीशी संबंधित आहेत. तीही पुढे पर्यायाने अनुवांशिकतेकडे निर्देश करते.
थोडक्यात १२ व्या स्थानावरून आपल्या पूर्वजांचे ज्ञान होते पण ते अध्यात्मिक बाबतीत होत नाही तर त्यांचे आनुवंशिक गुण-दोष, आर्थिक स्थिती, चांगल्या-वाईट प्रवृत्ती (इतरांना लुटणे किंवा दानधर्म करणे इत्यादी) ह्यांच्या बाबतीत होते. तसेच १२ व्या स्थानावरून वडिलांचे भाऊ, आजोबा, त्यांचे भाऊ यांचाही अभ्यास होतो हे आणखी एक विशेष! कारण दशमस्थान हे पितृस्थान (म्हणजे पित्याचे) स्थान आहे त्यापासून तिसरे स्थान हे पित्याच्या भावांचे स्थान असते.
एखाद्या व्यक्तीच्या अध्यात्मिक वृत्तीचा अभ्यास हा ९ व्या स्थानावरून होतो, त्यात भाग्य, धर्म, अध्यात्मिक प्रगती, तीर्थयात्रा, वहिनी, मेव्हणे, मेव्हण्या, तत्वज्ञान, बुद्धिमत्ता, गुरु नावलौकिक, योग, साक्षात्कार, पायाच्या मांड्या, द्विभार्या योग ह्यांचा अभ्यास होतो. त्यात पितरांचा असा स्पष्ट उल्लेख येत नाही. तसेच अध्यात्मिक विचार म्हणजे ते आत्म्याला न मानणारे विचारही असू शकतात. अध्यात्म हा शब्द अधि: व आत्म असा बनला आहे, म्हणजे स्वतःला जाणून घेणे इतकाच त्याचा अर्थ आहे.
आता थोडे ग्रह दशेबद्दल बोलू , विंशोत्तरी दशा ही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी तशीच पुढे चालू असते असे सांगण्यात येते. पण जर आत्म्याचा विचार केला तर तो एक वर्ष प्रेतयोनीत राहतो किंवा जर धर्मश्राद्धे केलीच नाहीत तर तो तसाच प्रेतयोनीत अडकून पडतो असे सांगितले जाते. जर असे असेल तर मग तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्मानुसार दुसरा जन्म घेतो ह्या विधानाला अर्थ राहत नाही. म्हणजे पुढचा जन्म कुठला मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मानुसार ठरत नसून त्याचा मुलाबाळांच्या हातात ते असते असा अर्थ होतो. कारण त्यांनी श्राद्ध केले नाही तर त्या व्यक्तीने जन्मात कितीही पुण्य केले तरी ती व्यक्ती प्रेतयोनीत अडकून पडणार असा दुसरा अर्थ निघतो.
तर सांगायचा मुद्दा हाच असे काही नसून श्राद्धे इत्यादी पूर्वजांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. आपणही अनेक कृत्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो. मेलेल्या व्यक्तीच्या संबंधी मृत्यूची कारणे, त्यांचे जीवन, ह्यांच्या आठवणी काढतो व त्यातून धडा घेऊन आपले जीवन अधिक चांगल्या प्रकारे कसे जगता येईल याचा प्रयत्न करतो. इतकेच.
कालसर्प योग: हा योग बरेचदा राहू केतूच्या एकाच बाजूला सगळे ग्रह असल्यावर सांगितला जातो. खरेतर ह्याला कर्तरी योग म्हणायला हवे. कर्तरी म्हणजे कात्री. राहू-केतूच्या कात्रीत सगळे ग्रह सापडले म्हणून हा कात्री योग. पण मग पुढे प्रश्न येतो की ही कात्री तयार करणारे राहू-केतू १२ व्या स्थानात आहेत का? मग हा पितृदोष कसा? जर हा पितृदोष नसेल तर नदीवर श्राद्ध का घालावे लागते?
मग पुढे सांगितले जाते की पूर्वजन्माच्या पापांमुळे हा दोष लागतो. पण पूर्वजन्म कुंडलीतील कुठल्या स्थानावरून ठरतो? पूर्वजन्म दर्शविणारे एकही स्थान कुंडलीत नसते. असल्यास दाखवून द्यावे.
तर अशा प्रकारे बऱ्याचदा ज्योतिषशास्त्र व आपले तथाकथित अध्यात्म ह्यांची घालघुसड केली गेली व जात असते. त्यासाठी वेगवेगळ्या शांती, कर्मकांड हे सांगितले जाते. ते करून खरेच हे दोष दूर होतात का?
त्यापेक्षा आपल्या पूर्वजांची जीवनपद्धती, त्यांनी केलेली चांगली-वाईट कामे, त्यांच्या सवई, त्यांची व्यसने, त्यांची त्या-त्या परिस्थितीतील मानसिकता कशी तयार झाली ह्याचा अभ्यास करून आपण त्यांच्या गुणांचे अनुकरण करणे आणि दुर्गुण, शारीरिक व मानसिक कमतरतांवर मात करत आपले जीवन अधिक सुखकर बनवावे हे योग्य वाटते हेच पितृस्थानाचे म्हणजे १२व्या स्थानाचे महत्व आहे असे म्हणता येईल.
पण इथे बऱ्याच शंका मनात उपस्थित होतात. जसे एखाद्याचा जन्म झाल्यावर जर श्राद्धे केली नाहीत तर तो दोष पत्रिकेत कसा दिसत नाही. जन्माच्या आधीचेच का दिसते?
मुळात ज्योतिष्यशास्त्र ह्या विषयात पाप-पुण्य, आत्मा, इहलोक, परलोक इतकेच काय परमेश्वर ह्याचाही कारक म्हणून कोठेही उल्लेख नाही.
ग्रह हेच अंतिम कर्ते-करविते आहेत. पाप-पुण्य, इहलोक, परलोक हे लोकांनी नीतिमान जीवन जगण्यासाठी घातलेली भीती असावे असे वाटते, पण त्याचे दर्शन जन्मपत्रिकेत होत नाही. ज्योतिष्यशास्त्र व अध्यात्माचा संबंध हा पूर्णतः बादरायण संबंध आहे. ज्योतिष्यशास्त्रात ग्रह परिस्थितीसापेक्ष मानवी जीवनाचा अभ्यास केला जातो तर अध्यात्मात माणूस आयुष्यात काहीही झाले तरी ईश्वरनिष्ठ व पुण्य करणारा असाच अपेक्षित असतो. ह्या संकल्पना काळसापेक्ष बदलत आहेत.
निदान आधुनिक ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यासकांनी ज्योतिष्यशास्त्र आणि अध्यात्म ह्यांची गल्लत व गुंता करू नये हीच अपेक्षा हे सांगण्यामागे आहे.
तर वरील विषयाच्या अनुषंगाने १२ व्या स्थानात काय काय येते ते आधी पाहू, परदेशगमन (किंवा देशातून हाकलपट्टी) खर्च, कर्ज, नुकसान, तुरुंगवास, पायाची पावले, आजार, संन्यास, उपभोग, व्यसन, आत्महत्या व निद्रा या संबंधी बाबींचे स्थान आहे.
आपल्या पूर्वपिढीचा आपल्या जीवनावर जो परिणाम होतो, तो थोडक्यात १२ व्या स्थानातून समजतो.
ज्याच्या पूर्वजांनी घर, इमारती बांधल्या आहेत, मोठा व्यवसाय किंवा भांडवल जमा करून ठेवले आहे त्याला पर्याय नसल्याने परदेशी जावे लागणे, खर्च, कर्ज, नुकसान हे संभवतच नाही. थोडक्यात अशा व्यक्तीच्या १२ व्या स्थानात कुठलेच ग्रह नसतात. पुढे आजार, पायाची पावले (ह्याची दुर्दशा हे ढोर मेहनतीचे प्रतीक आहे तसेच काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे पायाचे गंभीर आजार होतात) हे बऱ्याचदा अनुवांशिक प्रकारचे असतात. तसेच संन्यास, उपभोग, व्यसन, आत्महत्या व निद्रा हे व्यक्तीच्या मानसिक स्थितीशी संबंधित आहेत. तीही पुढे पर्यायाने अनुवांशिकतेकडे निर्देश करते.
थोडक्यात १२ व्या स्थानावरून आपल्या पूर्वजांचे ज्ञान होते पण ते अध्यात्मिक बाबतीत होत नाही तर त्यांचे आनुवंशिक गुण-दोष, आर्थिक स्थिती, चांगल्या-वाईट प्रवृत्ती (इतरांना लुटणे किंवा दानधर्म करणे इत्यादी) ह्यांच्या बाबतीत होते. तसेच १२ व्या स्थानावरून वडिलांचे भाऊ, आजोबा, त्यांचे भाऊ यांचाही अभ्यास होतो हे आणखी एक विशेष! कारण दशमस्थान हे पितृस्थान (म्हणजे पित्याचे) स्थान आहे त्यापासून तिसरे स्थान हे पित्याच्या भावांचे स्थान असते.
एखाद्या व्यक्तीच्या अध्यात्मिक वृत्तीचा अभ्यास हा ९ व्या स्थानावरून होतो, त्यात भाग्य, धर्म, अध्यात्मिक प्रगती, तीर्थयात्रा, वहिनी, मेव्हणे, मेव्हण्या, तत्वज्ञान, बुद्धिमत्ता, गुरु नावलौकिक, योग, साक्षात्कार, पायाच्या मांड्या, द्विभार्या योग ह्यांचा अभ्यास होतो. त्यात पितरांचा असा स्पष्ट उल्लेख येत नाही. तसेच अध्यात्मिक विचार म्हणजे ते आत्म्याला न मानणारे विचारही असू शकतात. अध्यात्म हा शब्द अधि: व आत्म असा बनला आहे, म्हणजे स्वतःला जाणून घेणे इतकाच त्याचा अर्थ आहे.
आता थोडे ग्रह दशेबद्दल बोलू , विंशोत्तरी दशा ही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी तशीच पुढे चालू असते असे सांगण्यात येते. पण जर आत्म्याचा विचार केला तर तो एक वर्ष प्रेतयोनीत राहतो किंवा जर धर्मश्राद्धे केलीच नाहीत तर तो तसाच प्रेतयोनीत अडकून पडतो असे सांगितले जाते. जर असे असेल तर मग तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्मानुसार दुसरा जन्म घेतो ह्या विधानाला अर्थ राहत नाही. म्हणजे पुढचा जन्म कुठला मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मानुसार ठरत नसून त्याचा मुलाबाळांच्या हातात ते असते असा अर्थ होतो. कारण त्यांनी श्राद्ध केले नाही तर त्या व्यक्तीने जन्मात कितीही पुण्य केले तरी ती व्यक्ती प्रेतयोनीत अडकून पडणार असा दुसरा अर्थ निघतो.
तर सांगायचा मुद्दा हाच असे काही नसून श्राद्धे इत्यादी पूर्वजांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. आपणही अनेक कृत्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो. मेलेल्या व्यक्तीच्या संबंधी मृत्यूची कारणे, त्यांचे जीवन, ह्यांच्या आठवणी काढतो व त्यातून धडा घेऊन आपले जीवन अधिक चांगल्या प्रकारे कसे जगता येईल याचा प्रयत्न करतो. इतकेच.
कालसर्प योग: हा योग बरेचदा राहू केतूच्या एकाच बाजूला सगळे ग्रह असल्यावर सांगितला जातो. खरेतर ह्याला कर्तरी योग म्हणायला हवे. कर्तरी म्हणजे कात्री. राहू-केतूच्या कात्रीत सगळे ग्रह सापडले म्हणून हा कात्री योग. पण मग पुढे प्रश्न येतो की ही कात्री तयार करणारे राहू-केतू १२ व्या स्थानात आहेत का? मग हा पितृदोष कसा? जर हा पितृदोष नसेल तर नदीवर श्राद्ध का घालावे लागते?
मग पुढे सांगितले जाते की पूर्वजन्माच्या पापांमुळे हा दोष लागतो. पण पूर्वजन्म कुंडलीतील कुठल्या स्थानावरून ठरतो? पूर्वजन्म दर्शविणारे एकही स्थान कुंडलीत नसते. असल्यास दाखवून द्यावे.
तर अशा प्रकारे बऱ्याचदा ज्योतिषशास्त्र व आपले तथाकथित अध्यात्म ह्यांची घालघुसड केली गेली व जात असते. त्यासाठी वेगवेगळ्या शांती, कर्मकांड हे सांगितले जाते. ते करून खरेच हे दोष दूर होतात का?
त्यापेक्षा आपल्या पूर्वजांची जीवनपद्धती, त्यांनी केलेली चांगली-वाईट कामे, त्यांच्या सवई, त्यांची व्यसने, त्यांची त्या-त्या परिस्थितीतील मानसिकता कशी तयार झाली ह्याचा अभ्यास करून आपण त्यांच्या गुणांचे अनुकरण करणे आणि दुर्गुण, शारीरिक व मानसिक कमतरतांवर मात करत आपले जीवन अधिक सुखकर बनवावे हे योग्य वाटते हेच पितृस्थानाचे म्हणजे १२व्या स्थानाचे महत्व आहे असे म्हणता येईल.
No comments:
Post a Comment