आधीच्या लेखात आपण वास्तूचे दोष म्हणजे काय ह्याचा अभ्यास केला. आता वास्तूच्या त्याच संदर्भातील अनेक गमतीजमती जाणून घेऊ,
दोषयुक्त वास्तूतील अनुभव: दोषयुक्त वास्तूत एक दडपण सतत मनावर असते. तिथे एकप्रकारची भीती मनात कायम घर करून बसलेली असते. दक्षिणमुखी वास्तू (समोर मोठी इमारत पर्वत इत्यादी नसेल तर) किंवा आपण आधी पाहिलेले वास्तुदोष असलेली एखादी जागा पार लयास गेलेली दिसते. तिथे कुठले दुकान चालत नाही. आहे ती जागा जीर्ण-शीर्ण होऊन जाते. भावाभावात पटत नाही. आजारपणे वाढत जातात. भाडेकरू ठेवला तर तोही टिकत नाही. कर्ज आणि कोर्टकज्जे वाढतात.
याशिवाय जे इतर वास्तुदोष सांगितले जातात ते निव्वळ बकवास आहेत. स्वयंपाकघर आग्नेय दिशेलाच पाहिजे. बेडरूम नैऋत्येला पाहिजे इत्यादी व तसे नसेल तर तुमच्यावर संकटांची मालिका कोसळेल अशी भीती अनेकदा दाखवली जाते पण ते एक थोतांड आहे. तद्दन पैसे कमवायचा मार्ग आहे.
विशेष म्हणजे माणसाच्या प्रवृत्तीनुसार व ग्रहदशेनुसार त्याला वास्तू मिळते. तसेच एखाद्या जागेत काही दोष असतील आणि तिथे तुम्ही राहत असाल तर तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करता. तसे इशारे व संदेश तुम्हाला नेहमी मिळत राहतात.
पशु पक्षी यांचे वास्तुशोध: मूलतः माणूस हा एक प्राणी आहे, त्यामुळे तो स्वतःचे जीवित सुरक्षित ठेवण्याचा कायम आटोकाट प्रयत्न करत असतो. एखादा ससा किंवा हरीण त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या हालचालींचे कायम निरीक्षण करीत असतो, व प्रत्येक पाऊल फार विचारपूर्वक टाकत असतो. पक्षीही आपले घरटे अशा उंचीवर बांधतो की त्याला कसलाच धोका पोहोचू नये. त्याचवेळी आजूबाजूला मांजरी, साप हे त्याच्या अंड्यांना व पिल्लांना धोकादायक असणारे प्राणी नाहीत ना, याची खात्री करूनच घरट्याची जागा ठरवतो.
अशावेळी एक थर्ड सेन्स माणसाचाच काय पशुपक्ष्यांचा सुद्धा कार्यरत असतो. त्याद्वारेच प्राणी आपले रक्षण करून घेत असतात.
दोषयुक्त वास्तूतील विचित्र अनुभव: हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. दुबई शारजाहच्या सीमेवर आमचे घर होते. तिथे दुबई व शारजाह ह्या दोन प्रदेशांच्या राजांची फार पूर्वी अनेक युद्धे झालेली आहेत. त्या सीमेला लागूनच माझे घर होते. माझ्या पत्नीला एक जखमी माणूस पाठमोरा बसून विव्हळत असताना अनेकदा त्या घरात दिसला. मुलाला एकदा रात्री अचानक जाग आली तेव्हा आम्ही नवराबायको बेडरूम मध्ये होतो व तो त्याच्या बेडरूम मध्ये होता तेव्हा त्याला तिथे एक काळी आकृती दिसली ती पाहून त्याचे ओरडायचे अवसान सुद्धा गळून गेले.
माझे कुटुंब शालेय सुट्टी असल्याने पुण्यात गेलेले होते, तेव्हा तर फारच विचित्र अनुभव आलेले मी त्याच घरात पाहिले. दरवाजाच्या पीपहोल मधून बघितले तर ५-६ महिला धुणे धूत की सुकवत होत्या. ४-५ मुले कॉरिडॉर मध्ये पळापळी करत होती. एकदोनदा दरवाजा वाजल्याचा भास झाला तेव्हा पीप होल मधून पहिले तर एक कुरूप वाकडा तिकडा माणूस दरवाज्यात उभा होता. मनाचा हिय्या करून दार उघडले तर बाहेर कोणीच नाही. दुबईमध्ये असे कॉमन कॉरिडॉर मध्ये धुणे धुने, सुकवणे अजिबात चालत नाही. नंतर आत मध्ये येऊन बसलो तर काचेच्या दरवाज्यात एक स्त्री व पुरुष वाद घालत असताना दिसले. नंतर जवळ जाऊन बघितले तर काचेच्या पलीकडे एक माणूस खुर्ची टाकून माझ्याकडे बघत असलेला दिसला. नंतर मी देवीच्या फोटोजवळ झोपायला गेलो. तर थोड्याच वेळात एक मांजर तिथे आली. तिचे डोळे एखाद्या बॅटरीसारखे चमकत होते, माझा फ्लॅट सर्व दरवाजे खिडक्या बंद असताना ही मांजर कुठून आली हे कळायला तयार नव्हते. नंतर भिंतीवर उंदीर पळू लागले. तिथे ५६ डिग्री तापमानात उंदीर अजिबात जगू शकत नाहीत. तरीही मी अट्टाहास करून झोपी गेलो तर अचानक माझ्या खांद्याला कोणीतरी हिसडा दिला. उठून बघतोय तर माझ्या अगदी जवळ पाठ उघडी असलेला एक तरुण बसला होता. मी तात्काळ उठून लाईट चालू केले. त्यावेळी तो गायब झाला होता. असे १-२ दिवस झाले. मग मी माझ्या गुजराती मित्राला माझ्याकडे बोलावून घेतले. विशेष म्हणजे मला जे दिसत होते ते त्याला अजिबात दिसत नव्हते. शिवाय मी जे त्याला दाखवायचा प्रयत्न करत होतो ते तो विशेष काळजीने पाहतच नव्हता. त्याने मला सांगितले की " सब वेहम हैं" मी गप्प बसलो. सगळे हे घडायचे ते रात्रीच घडायचे, आणि नेमकी अमावास्या लागून आलेली. तर हा गमतीशीर किस्सा !
अरबी लोक हे गडगंज श्रीमंत असल्याने त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्त्रिया, पुरुष पशु-पक्षी ह्यांना अतिशय भयंकर वागणूक देतात. चक्क ५ ते २० मजल्यावरून घरकाम करणाऱ्या स्त्रीला फेकून देण्याचे अनेक प्रकार इथे घडले आहेत.
असो तर पुढे हा असला विचित्र अनुभव घेतल्यानंतर मी घाबरून भारतात आलो. २ आठवडे सुट्टीही मिळाली. आता परत त्या वास्तूत राहायचे नाही, राहिलेले २ महिने हॉटेलात काढू असा विचार करून मी तिथे पोचलो कारण घरातील सामान व माझा ताबा तसाच होता. शिवाय हॉटेलचा खर्च बघता तेच घर मला सोईस्कर होते म्हणून तिथे पोचलो. बिल्डिंग मॅनेजर भेटला. त्याने मला सांगितले की तुम्ही इथे राहू शकत नाही, कारण तिथे वार्षिक काँट्रॅकट असते. मी त्याला म्हणालो माझ्या घरातील सामान तरी मला घेऊ देत. त्यावर त्याने होकार दिला. मी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा एक भकासपणा जाणवत होता. शक्य तेव्हढे सामान हलवले, देशी पाठवले, विकले. पण मी हॉटेलात राहिलो. त्या मॅनेजरला काय सुबुद्धी झाली कोणास ठाऊक नाहीतर मला परत त्याच घरात तेच अनुभव घेत बसावे लागले असते. किंवा आणखी काहीतरी भयंकर घडले असते माझ्यासोबत!!
दुसरा अनुभव मला हडपसर येथे असलेल्या आमच्या फॅक्टरीत आला. ही वास्तू पूर्ण दक्षिणमुखी आहे, पूर्वी तीथे स्मशानभूमी होती. नंतर जनावरे गाडायची जागा बनली. तिथे तळमजल्यावर जिथे जिना सुरू होतो त्या जिन्याखाली एक जागा आहे. आमचा एक व्यापारी तिथे बरे वाटते म्हणून झोपला, आणि मध्यरात्री तो हलूच शकत नव्हता. तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्याला अजिबात हलता येऊ नये असे होत होते पण डोक्यात भयंकर भीती आणि पळून जायची त्याची इच्छा होती. असे त्याला वाटत होते. त्याच जागेवर मीही लहान असताना मातीत खेळत असे, तेव्हाही असेच अनुभव मला आलेले. तिथून हलायचे मनच होत नसे, भूक तहान विसरून मी तिथे चिकटलेला असायचो. शेवटी फटके मिळाले तरीही ती जागा मी सोडत नसे.
एकदा एक मांत्रिकाला आम्ही बोलावले, त्याने त्या जिन्याखालील जागेपासून बिल्डिंगच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या टाकीपर्यंत माग काढला. नंतर तो मशीन रूम मध्ये गेला. तिथे खोदले असता एक कबर मिळाली जी मशीनच्या अगदी खाली होती आणि म्हणूनच मशीन नीट चालत नाही असे त्या मांत्रिकाने सांगितले. ती एका स्त्रीची कबर होती. नंतर आम्ही तिथे दर अमावास्येला कोंबड आणि इतर पदार्थ यांचा नैवेद्य करत होतो. मग मशीन ठीक काम करायला लागले.
जन्मकुंडलीत केंद्रात शुभग्रह असतील, तसेच मनुष्यगण असेल तर हे भुतांचे आणि वास्तुदोषांचे भास अनुभवायला मिळतात. मी त्यातीलच एक आहे म्हणून मला हे अनुभवता आले. असे अनेक पुण्यात्मे आहेत की ज्यांच्या जन्मकुंडलीत काही शुभग्रह त्यांना अशा शापित जागांचा सुगावा लागून देतात. इतकेच नाही तर एखाद्याला भूत-बाधा झाली असेल तर त्यावरही प्रभावी उपाय करता येतात. हे कसे साध्य होते हे एक अज्ञात गूढ आहे. मानसोपचारतज्ञ एकीकडे काम करतात तर बुवा-बाबा दुसरीकडे भुते काढतात. संत, महान योगी, हे अशा प्रकारचे लोक असू शकतात, शिवाय फसवे लोकही असतातच!
यावरून एकच स्पष्ट होते ही भूतबाधा ही एक मानसिक स्थिती असते. त्या त्या परिस्थितीत ती तुम्हाला काहीतरी सांगत असते.
थोड्याच दिवसात आधुनिक विज्ञान ह्या भूतबाधा, दोषयुक्त वास्तूंची उकल करण्यात यशस्वी होईल असे वाटते.
याशिवाय जे इतर वास्तुदोष सांगितले जातात ते निव्वळ बकवास आहेत. स्वयंपाकघर आग्नेय दिशेलाच पाहिजे. बेडरूम नैऋत्येला पाहिजे इत्यादी व तसे नसेल तर तुमच्यावर संकटांची मालिका कोसळेल अशी भीती अनेकदा दाखवली जाते पण ते एक थोतांड आहे. तद्दन पैसे कमवायचा मार्ग आहे.
विशेष म्हणजे माणसाच्या प्रवृत्तीनुसार व ग्रहदशेनुसार त्याला वास्तू मिळते. तसेच एखाद्या जागेत काही दोष असतील आणि तिथे तुम्ही राहत असाल तर तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करता. तसे इशारे व संदेश तुम्हाला नेहमी मिळत राहतात.
पशु पक्षी यांचे वास्तुशोध: मूलतः माणूस हा एक प्राणी आहे, त्यामुळे तो स्वतःचे जीवित सुरक्षित ठेवण्याचा कायम आटोकाट प्रयत्न करत असतो. एखादा ससा किंवा हरीण त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या हालचालींचे कायम निरीक्षण करीत असतो, व प्रत्येक पाऊल फार विचारपूर्वक टाकत असतो. पक्षीही आपले घरटे अशा उंचीवर बांधतो की त्याला कसलाच धोका पोहोचू नये. त्याचवेळी आजूबाजूला मांजरी, साप हे त्याच्या अंड्यांना व पिल्लांना धोकादायक असणारे प्राणी नाहीत ना, याची खात्री करूनच घरट्याची जागा ठरवतो.
अशावेळी एक थर्ड सेन्स माणसाचाच काय पशुपक्ष्यांचा सुद्धा कार्यरत असतो. त्याद्वारेच प्राणी आपले रक्षण करून घेत असतात.
दोषयुक्त वास्तूतील विचित्र अनुभव: हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. दुबई शारजाहच्या सीमेवर आमचे घर होते. तिथे दुबई व शारजाह ह्या दोन प्रदेशांच्या राजांची फार पूर्वी अनेक युद्धे झालेली आहेत. त्या सीमेला लागूनच माझे घर होते. माझ्या पत्नीला एक जखमी माणूस पाठमोरा बसून विव्हळत असताना अनेकदा त्या घरात दिसला. मुलाला एकदा रात्री अचानक जाग आली तेव्हा आम्ही नवराबायको बेडरूम मध्ये होतो व तो त्याच्या बेडरूम मध्ये होता तेव्हा त्याला तिथे एक काळी आकृती दिसली ती पाहून त्याचे ओरडायचे अवसान सुद्धा गळून गेले.
माझे कुटुंब शालेय सुट्टी असल्याने पुण्यात गेलेले होते, तेव्हा तर फारच विचित्र अनुभव आलेले मी त्याच घरात पाहिले. दरवाजाच्या पीपहोल मधून बघितले तर ५-६ महिला धुणे धूत की सुकवत होत्या. ४-५ मुले कॉरिडॉर मध्ये पळापळी करत होती. एकदोनदा दरवाजा वाजल्याचा भास झाला तेव्हा पीप होल मधून पहिले तर एक कुरूप वाकडा तिकडा माणूस दरवाज्यात उभा होता. मनाचा हिय्या करून दार उघडले तर बाहेर कोणीच नाही. दुबईमध्ये असे कॉमन कॉरिडॉर मध्ये धुणे धुने, सुकवणे अजिबात चालत नाही. नंतर आत मध्ये येऊन बसलो तर काचेच्या दरवाज्यात एक स्त्री व पुरुष वाद घालत असताना दिसले. नंतर जवळ जाऊन बघितले तर काचेच्या पलीकडे एक माणूस खुर्ची टाकून माझ्याकडे बघत असलेला दिसला. नंतर मी देवीच्या फोटोजवळ झोपायला गेलो. तर थोड्याच वेळात एक मांजर तिथे आली. तिचे डोळे एखाद्या बॅटरीसारखे चमकत होते, माझा फ्लॅट सर्व दरवाजे खिडक्या बंद असताना ही मांजर कुठून आली हे कळायला तयार नव्हते. नंतर भिंतीवर उंदीर पळू लागले. तिथे ५६ डिग्री तापमानात उंदीर अजिबात जगू शकत नाहीत. तरीही मी अट्टाहास करून झोपी गेलो तर अचानक माझ्या खांद्याला कोणीतरी हिसडा दिला. उठून बघतोय तर माझ्या अगदी जवळ पाठ उघडी असलेला एक तरुण बसला होता. मी तात्काळ उठून लाईट चालू केले. त्यावेळी तो गायब झाला होता. असे १-२ दिवस झाले. मग मी माझ्या गुजराती मित्राला माझ्याकडे बोलावून घेतले. विशेष म्हणजे मला जे दिसत होते ते त्याला अजिबात दिसत नव्हते. शिवाय मी जे त्याला दाखवायचा प्रयत्न करत होतो ते तो विशेष काळजीने पाहतच नव्हता. त्याने मला सांगितले की " सब वेहम हैं" मी गप्प बसलो. सगळे हे घडायचे ते रात्रीच घडायचे, आणि नेमकी अमावास्या लागून आलेली. तर हा गमतीशीर किस्सा !
अरबी लोक हे गडगंज श्रीमंत असल्याने त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्त्रिया, पुरुष पशु-पक्षी ह्यांना अतिशय भयंकर वागणूक देतात. चक्क ५ ते २० मजल्यावरून घरकाम करणाऱ्या स्त्रीला फेकून देण्याचे अनेक प्रकार इथे घडले आहेत.
असो तर पुढे हा असला विचित्र अनुभव घेतल्यानंतर मी घाबरून भारतात आलो. २ आठवडे सुट्टीही मिळाली. आता परत त्या वास्तूत राहायचे नाही, राहिलेले २ महिने हॉटेलात काढू असा विचार करून मी तिथे पोचलो कारण घरातील सामान व माझा ताबा तसाच होता. शिवाय हॉटेलचा खर्च बघता तेच घर मला सोईस्कर होते म्हणून तिथे पोचलो. बिल्डिंग मॅनेजर भेटला. त्याने मला सांगितले की तुम्ही इथे राहू शकत नाही, कारण तिथे वार्षिक काँट्रॅकट असते. मी त्याला म्हणालो माझ्या घरातील सामान तरी मला घेऊ देत. त्यावर त्याने होकार दिला. मी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा एक भकासपणा जाणवत होता. शक्य तेव्हढे सामान हलवले, देशी पाठवले, विकले. पण मी हॉटेलात राहिलो. त्या मॅनेजरला काय सुबुद्धी झाली कोणास ठाऊक नाहीतर मला परत त्याच घरात तेच अनुभव घेत बसावे लागले असते. किंवा आणखी काहीतरी भयंकर घडले असते माझ्यासोबत!!
दुसरा अनुभव मला हडपसर येथे असलेल्या आमच्या फॅक्टरीत आला. ही वास्तू पूर्ण दक्षिणमुखी आहे, पूर्वी तीथे स्मशानभूमी होती. नंतर जनावरे गाडायची जागा बनली. तिथे तळमजल्यावर जिथे जिना सुरू होतो त्या जिन्याखाली एक जागा आहे. आमचा एक व्यापारी तिथे बरे वाटते म्हणून झोपला, आणि मध्यरात्री तो हलूच शकत नव्हता. तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्याला अजिबात हलता येऊ नये असे होत होते पण डोक्यात भयंकर भीती आणि पळून जायची त्याची इच्छा होती. असे त्याला वाटत होते. त्याच जागेवर मीही लहान असताना मातीत खेळत असे, तेव्हाही असेच अनुभव मला आलेले. तिथून हलायचे मनच होत नसे, भूक तहान विसरून मी तिथे चिकटलेला असायचो. शेवटी फटके मिळाले तरीही ती जागा मी सोडत नसे.
एकदा एक मांत्रिकाला आम्ही बोलावले, त्याने त्या जिन्याखालील जागेपासून बिल्डिंगच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या टाकीपर्यंत माग काढला. नंतर तो मशीन रूम मध्ये गेला. तिथे खोदले असता एक कबर मिळाली जी मशीनच्या अगदी खाली होती आणि म्हणूनच मशीन नीट चालत नाही असे त्या मांत्रिकाने सांगितले. ती एका स्त्रीची कबर होती. नंतर आम्ही तिथे दर अमावास्येला कोंबड आणि इतर पदार्थ यांचा नैवेद्य करत होतो. मग मशीन ठीक काम करायला लागले.
जन्मकुंडलीत केंद्रात शुभग्रह असतील, तसेच मनुष्यगण असेल तर हे भुतांचे आणि वास्तुदोषांचे भास अनुभवायला मिळतात. मी त्यातीलच एक आहे म्हणून मला हे अनुभवता आले. असे अनेक पुण्यात्मे आहेत की ज्यांच्या जन्मकुंडलीत काही शुभग्रह त्यांना अशा शापित जागांचा सुगावा लागून देतात. इतकेच नाही तर एखाद्याला भूत-बाधा झाली असेल तर त्यावरही प्रभावी उपाय करता येतात. हे कसे साध्य होते हे एक अज्ञात गूढ आहे. मानसोपचारतज्ञ एकीकडे काम करतात तर बुवा-बाबा दुसरीकडे भुते काढतात. संत, महान योगी, हे अशा प्रकारचे लोक असू शकतात, शिवाय फसवे लोकही असतातच!
यावरून एकच स्पष्ट होते ही भूतबाधा ही एक मानसिक स्थिती असते. त्या त्या परिस्थितीत ती तुम्हाला काहीतरी सांगत असते.
थोड्याच दिवसात आधुनिक विज्ञान ह्या भूतबाधा, दोषयुक्त वास्तूंची उकल करण्यात यशस्वी होईल असे वाटते.
No comments:
Post a Comment