Monday, 4 July 2016

जातीयता: उत्तम बियाणे उमदे पीक?

जातीयतेची मुळे शोधताना बरेचदा आपण भरकटत जातो. सुरुवात वैदिक वर्णवादावरून होते, त्यात ब्राम्हण सर्वोच्च नंतर क्षत्रिय मग बाकीचे बलुते सांभाळणारे व सर्वात शेवटी दलित असा उतरता क्रम सर्वत्र दिसतो. 
पण अलीकडे विद्वान म्हणतात त्याप्रमाणे चार वर्ण हे वैदिक धर्माची देण आहेत तर जातीय विभागणी ही कृषक संस्कृतीची उपज आहे.  वैदिक वर्णवाद हा क्षत्रिय व वैश्य हे कलियुगात संपुष्टात आल्याची घोषणा (संदर्भ: परशुराम व नंद घराणे) केल्याने दोनच वर्ण म्हणजे ब्राम्हण आणि शूद्र  हेच आता शिल्लक आहेत असे म्हटले जाते. तूर्तास हे म्हणणे एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या आहेत हे विसरून सत्य आहे असे समजून पुढे जाऊ. कारण कृषक, बौद्ध, जैन ह्या धर्मांच्या स्पर्धेत वैदिक धर्म हा संख्येने फार लहान होता व त्यातील क्षत्रिय व वैश्य हे पूर्वी बाद केले गेले म्हणजे त्यांचा सध्याच्या जातीयतेवरील प्रभाव हा संख्येच्या दृष्टीने नगण्य आहे हे सिद्ध होते. 
आता कृषक संस्थेकडे वळू. कृषक हे शेती करणारे लोक. ही सर्वात जुनी संस्कृती आहे हे सिंधू नदीतील उत्खननातून सिद्ध होत आहे. त्यांची शस्त्रे-अस्त्रे, रथ, घोडे यांचे अजिबात पुरावे मिळालेले नाहीत, ह्याउलट उत्तम जातीचे बैल, धान्याची आगारे, वृक्ष-वेली, नागरी जीवन (जसे स्नानगृहे, रस्ते, इमारती, बाजारपेठ) ह्यांचे अगणित पुरावे मिळाले आहेत. ह्या कृषक समाजात क्षत्रिय ह्या वर्णाची गरजच नव्हती. कारण युद्धाचे प्रसंग येण्याचे कारणच नव्हते. सगळेजण आपापले शेती करून त्याचे उत्पन्न मिळवून आनंदाने जीवन जगत होते. विशेष म्हणजे मोठी सांस्कृतिक वाढ याच काळात होत गेली. लिपीचा शोध, व्यापाराची नाणी,  अनेक मुर्त्या, उत्तम घरबांधणी, हे सांस्कृतिक कळसाला पोचले होते. 
पण भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश हा फार पूर्वीपासून बाहेरील लोकांना सामावून घेत आलेला आहे. सिंधूचे लोक हे धनधान्य दृष्टीने मुबलक असे होते त्यामुळे कदाचित त्यांनी युद्धे करणे टाळले, व नवीन येणाऱ्या येणाऱ्या लोकांना आपल्यात सामावून घेतले  किंवा आक्रमकांना योग्य मोबदला देऊन परत मार्गी लावून दिले. कारण युद्धाचे कुठलेच पुरावे सिंधू इतिहासात सापडत नाहीत. स्त्री-पुरुष  ध्यानमग्न अवस्थेत असलेले दिसतात. फारतर रेडा किंवा मगर यांच्याशी दोन हात करताना दिसतात. बहुतेक सिंधू लोक हे वैदिकांनी कथन केलेले वैश्य लोक असावेत. हे भूकंप व पुरात नष्ट झाले. म्हणून कलियुगात वैश्य वर्ण शिल्लक नाही असे जे म्हटले जाते त्यात काहीतरी तथ्य असावे असे वाटते. असो. 
पुढे वैदिक लोक भारतात  वायव्येकडून आले. ते इराणियन अवेस्तन लोकांपासून काही ऐहिक कारणांमुळे विभक्त झाले होते. इराणियन वैदिक इराणमध्ये पश्चिमेला जात  राहिले.  त्यांच्यात देव-असुर वाद होता. इराणी हे सूर्यपूजक (अ-सूर= सूर्य) व सूर्यापासून उत्पन्न होणाऱ्या (उष्णता) अग्नीचे उपासक होते. तर देव हे पंचमहाभूते, सूर्य, चंद्र असे अनेक देव पूजत होते. त्यांच्यात गोधन, चराऊ जमिनी, स्त्रिया ह्यावरून वाद होते म्हणून हे दोन गट पृथक झाले असे म्हणता येईल. 
जो गट भारतात आला त्याने आपल्या वैदिक संस्कृतीचा प्रचार आरंभ केला. त्यांचे वर्ण त्यांना माहीत होते. वर्णातील क्षत्रिय वर्णाची खरी गरज रणभूमीवर होती. 
त्याआधी भारतदेशात सुमारे १ लाख ते ३० हजार वर्षांपासून मानवाची  स्थित्यंतरे होत होती. हे लोक इथलेच झाले होते. भारतातील निसर्ग हा बेभरवशाचा आहे. त्यामुळे पशुपालन तेही कमी गवतावर जगू शकणाऱ्या शेळ्या-मेंढ्या ह्याचे पालन सुरू झाले. बरा पाऊस असलेल्या ठिकाणी शेती सुरू झाली. सिंधू संस्कृती देशभर मोडकी-तोडकी का होईना पण पसरली. ह्यावेळी कृषक आणि बाकीचे बलुते हे एकमेकांना जेष्ठ-कनिष्ठ समजत नव्हते. कारण एकमेकांना एकमेकांची गरज होती. ते समाधानाने आपले काम करीत होते. 
पुढे राजेमहाराजे ह्यांची आपआपसात लहान लहान युद्धे व्हायला सुरुवात झाली. रामायण-महाभारत हे अशाच दर्जाचे युद्ध असावे. सर्वात प्रथम अलेक्झांडरने आक्रमण केले. शक हून ह्यांची आक्रमणे झाली. नेमकी इथेच क्षत्रिय समाजाची गरज भासू लागली. दक्षिण व मध्य भारतात उष्णतामान अधिक असल्याने इथले लोक कृष प्रकृतीचे असतात. याउलट पंजाब व उत्तर भारतात तगडे पैलवान लोक असतात. 
समोरासमोरील युद्धास सैनिक निर्माण करायचे म्हणजे ते तगडे, मजबूत असणे गरजेचे आहे. उत्तर भारतात नव्याने येणारे लोक हे असे उंचपुरे, तगडे असत. त्यांना ह्या युद्धखोर वातावरणात अधिक महत्व प्राप्त होऊ लागले.  शक-हून असे अनेक वंश उत्तर भारतात स्थायिक झाले. नंतर ते इथलेच म्हणून राहू लागले. पुढे परकीय आक्रमणाच्या काळात ते महाराष्ट्रात व इतर राज्यात राज्यात स्थलांतरित झाले. मराठा ९६ कुळे ह्यांचा विचार केला तर त्यांचे मूळ राजस्थानात राजस्थानात सापडते. 
तोपर्यंत वैदिक लोक हे समाजात आणि विशेषतः राजदरबारी व्यवस्थित पसरले होते. राजाला उत्तम सैन्याची गरज नेहमीच असते. तेव्हा हे खास लढाईसाठी उत्तम असलेले वंश राजाला सैनिकात घेण्यासाठी सांगण्याचे काम वैदिकांनी केले. इथपर्यंत त्यांनी ह्या सैनिकांना क्षत्रियवर्ण ही पदवी दिलेली नव्हती. फक्त राजाचे राज्य क्षेमकुशल चालावे म्हणून एक सल्ला दिला होता. 
जसजरे हे बाहेरून येणारे सैनिक इथे स्थायिक होऊ लागले तसे त्यांचे वैवाहिक संबंध देखील क्षेत्रीय लोकांशी होऊ लागले. मुलींचाच तुटवडा भासत असेल तर त्यांना तो संकर करणे भागच होते. 
तर अशाप्रकारे परकीय आणि एत्तद्देशीय ह्यांची सरमिसळ होत गेली. पण जे सैनिक म्हणून इथे आले, त्यांचे वंशज सैनिकी पेशाचेच काम करीत राहिले. तो हा मोठा वर्ग आहे ज्याला आपण आत्ताचे राजपूत, मराठे इत्यादी लढवैय्ये म्हणून मान्यता देत आलो. 
तर अशा प्रकारे मूळची कृषक व वैदिक संस्कृती ह्यांची सरमिसळ होऊन जाती बनल्या. 

आता जनुकीय संशोधने केली जातात, त्यावेळी जनुकांची भरपूर सरमिसळ झाली आहे असे सांगितले जाते. एकाच घरात एक मुलगा ६फूट उंचीचा असतो तर दुसरा ४ फूट. एक पैलवान तर एक अगदी अशक्त. असे एक ना अनेक नमुने पाहायला मिळतात. कारण पूर्वीचे वंश यांची सरमिसळ होण्याची प्रक्रिया सुमारे १०००० वर्षे चालू आहे. त्यामुळे मी एक अमुक वंशाचा आहे हे सांगणारा हवा आली तर उडून जाईल इतका हलका असू शकतो. 
वैदिक वर्णवादी ज्यात पूर्वी शूद्र शब्दच नव्हता तो कार्यविभाजनाशी संबंधित होता, त्यात ज्योतिष्यशास्त्राचे नियम लावून वर्ण ठरविला जात होता, पण पुढे एवढ्या मोठ्या कृषक संस्कृतीला सामावून घेताना वर्णवादाचा नियम प्रत्येकाला लावत बसने अशक्य होते म्हणून तो सरसकट वंशपरत्वे लावत गेले आणि जातिसंस्था मूळ धरू लागल्या. शिवाय नुसते तगडे, आणि बलवान असून राज्यकारभार करता येतो किंवा न्याय निवाडा करता येतोच असे नाही. तेव्हा हे जे लोक होते त्यांना फक्त सैनिक म्हणून वापरले गेले. राजा हा माध्यम होता आणि त्याला सल्ला देणारे वैदिक ब्राम्हण होते अशी ती राज्यपद्धती होती. 
यातून पुढे ब्राम्हण (हा आपल्या ठराविक कर्मे करण्याच्या कोशात अडकलेला), सैनिक, शेतकरी व सेवा देणारे बलुतेदार असे वर्ग निर्माण झाले. बलुतेदार किंवा दलित ह्यात काही वंशश्रेष्ठत्व, म्हणजे शक्ती, मोठे शरीर नव्हते म्हणून त्यांनी वर चाललेल्या उलाढालींकडे साफ दुर्लक्ष केले व आपले काम करीत राहिले.
अतिशय धावत्या क्रमाने जातीसंस्थेच्या उगमाचा उहापोह करायचा प्रयत्न इथे केला आहे, त्यात अनेक तर्क आहेत पण ते सुसंगत आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहे.











 

No comments:

Post a Comment