देवघरातील मूर्ती: आपली जी वृत्ती असते त्याप्रमाणे आपले दैवत असते. फार पूर्वी आपला समाज स्त्रीला सन्मान देणारा होता. त्यामुळे स्त्री देवता ही प्रमुख असून तिने पुरुष देवतेवर विजय मिळवला अशी संकल्पना पूर्वी स्पष्ट दिसते. मधल्या काळात स्त्री हे नरकाचे द्वार आहे असा समज पसरला. बरेच देव-देवी समाजावर लादले आणि घुसडले गेले. त्यामुळे आज बरेच लोकांना आपली दैवते कुठली हा संभ्रम निर्माण झाला आहे.
नवनवीन देव निर्माण होण्याची काही तात्कालिक व राजकीय कारणे आहेत. काही ठराविक वेळी रोगाच्या साथी येणे, पशु, प्राणी, पक्षी यांचा उपद्रव होणे यातून काही देवता आपल्यात दाखल झाल्या. एखाद्या समाजावर आधिपत्य करायचे असेल तर त्याची दैवते व अस्मिता नष्ट केल्या जातात ही राजकीय कारणे आहेत. हजारो विचारधारा आणि पंथ आपल्या देशात असल्याने ह्या राजकीय कुरघोड्या सतत चालूच होत्या. इतके असूनही बराच मोठा समज आजही त्यांच्या पुरातन देवीदेवतांना चिकटून आहे हे विशेष आहे. ह्या पुरातन देवता म्हणजेच आपल्या कुलदेवता. आपला समाज इतका लवचिक आहे कि नवनवीन देव स्वीकारताना त्याने आपल्या घरातील देव तितक्याच चिकाटीने सांभाळले आहेत हे विशेष. हे देव आपले कुलदैवत नेमके कुठले हे अचूकपणे दर्शवितात. नवीन देव लादण्यात आले नाहीत, कारण लादणारे परावलंबी होते व इथल्या समाजावर अन्न वस्त्र यासाठी अवलंबून होते. वेगवेगळ्या कथा निर्माण करून आहे त्या दैवतात संभ्रम निर्माण करणे, राजकीय मदतीने चालीरीती नष्ट करणे आणि नवीन देव घुसवणे हे होत गेले. पूर्वी पुरोहित नावाचा वर्ग अस्तित्वात असावा असे वाटत नाही. कारण पूर्वी लोकांना देवांचे व त्यांच्या चालीरीतींचे अचूक ज्ञान व अर्थबोध होता. डावा हात नव्हे उजवा, किवा नारळाची शेंडी देवाकडे अशा निरर्थक कर्मकांडांना महत्व देत ते घुसविण्यात आलेले लगेच लक्षात येत नाही. बरेच लोक त्यांचे कुलदैवत अमुक अमुक गावचे असे काहीतरी सांगत असतात, असे लोक एकतर कोणाच्यातरी बुद्धीभेदाला बळी पडलेले असतात किवा स्वतः बुद्धिभेद करणारे असतात. कुलदैवत हे सर्वत्र एकच आहे, त्याची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहेत. हे यासाठी लक्षात घेणे गरजेचे आहे.
देवघरात टाक पुजण्याचे प्रयोजन: विवाहात नवीन देव करण्याची प्रथा आहे. तसेच मृत्यू इत्यादींचे अशौच आले तर देव नवीन केले जातात. बरेचदा घासून देवांची झीज होते. त्यातील डोळे अलंकार इत्यादी बारकावे नष्ट होतात. कधीकधी तो देव नक्की कुठला आहे इतका संभ्रम निर्माण होतो. देव सदैव सुचीर्भूत असावेत. त्यांचे नित्य कुलधर्म कुलाचार केले गेल्याने ते जागृत राहतात व तत्काळ फलदायी बनतात. झीज झालेले तसेच मृतअशौच आलेले देव हे निष्प्रभ असतात. साधारणतः घरात मृत्यू, विवाह सारखेसारखे होत नाहीत व मधल्या काळात देवांची झीज होते. जेव्हा विवाह मृत्यू इत्यादी होतात तेव्हा दरवेळी आर्थिक स्थिती चांगलीच असते असे नाही. अशावेळी जर बदलायचे झाले तर टाक कमी खर्चात बदलून होतात. तेच जर मोठी मूर्ती असेल तर काम खर्चिक होते. मूर्तीतील बारकावे जसेच्या तसे निर्माण करता येत नाहीत. गणपतीचा मारुती होण्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक टाकांची पूजा करतात.
देवघरात टाक पुजण्याचे प्रयोजन: विवाहात नवीन देव करण्याची प्रथा आहे. तसेच मृत्यू इत्यादींचे अशौच आले तर देव नवीन केले जातात. बरेचदा घासून देवांची झीज होते. त्यातील डोळे अलंकार इत्यादी बारकावे नष्ट होतात. कधीकधी तो देव नक्की कुठला आहे इतका संभ्रम निर्माण होतो. देव सदैव सुचीर्भूत असावेत. त्यांचे नित्य कुलधर्म कुलाचार केले गेल्याने ते जागृत राहतात व तत्काळ फलदायी बनतात. झीज झालेले तसेच मृतअशौच आलेले देव हे निष्प्रभ असतात. साधारणतः घरात मृत्यू, विवाह सारखेसारखे होत नाहीत व मधल्या काळात देवांची झीज होते. जेव्हा विवाह मृत्यू इत्यादी होतात तेव्हा दरवेळी आर्थिक स्थिती चांगलीच असते असे नाही. अशावेळी जर बदलायचे झाले तर टाक कमी खर्चात बदलून होतात. तेच जर मोठी मूर्ती असेल तर काम खर्चिक होते. मूर्तीतील बारकावे जसेच्या तसे निर्माण करता येत नाहीत. गणपतीचा मारुती होण्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक टाकांची पूजा करतात.
मुख्य टाक हे आधीच्या भागात पाहिल्याप्रमाणे १) ग्रामदैवत जानाई किवा भैरवनाथ किवा दोघे. २) लक्ष्मीदेवी ३) खंडोबा ४) कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी ५) म्हसोबा- स्वतःची शेतीची/राहण्याची जागा असून त्या जागेत किवा जवळपास म्हसोबाचे ठाणे असेल तर हा घरात आढळतो अन्यथा नाही. ६) देवांचा रक्षक वीर टाक.
भैरवनाथ हा गावाचा रक्षक व कोतवाल आहे. भैरवाचे अनेक अवतार व रूपे आहेत. सर्व एकच असून आपल्या गावातील भैरवनाथाची पूजाअर्चा-कुलाचार केल्याने ते मूळ भैरवनाथाला पोचतात.भैरवनाथाची खास वैशिष्ठ्ये म्हणजे हा एकटा घोड्यावर स्वार असतो. सर्प हा जवळपास हमखास आढळतो.
म्हसोबा हा दैत्य स्वरूपातील महादेव आहे. त्यामुळे अघोरी विधीसाठी त्याचा उपयोग केला जातो. रेडा हा प्राणी एकेकाळी संख्येने भरपूर व खूप उपद्रवमूल्य असलेला प्राणी होता. त्याची शक्ती अमर्याद असते, तसेच त्याला ताब्यात आणणे अशक्य बाब आहे हे लक्षात घेता महिषासुरमर्दन कथा ही तथाकथित काळाशी संबंधित आहे हे लक्षात येते.बरेचदा म्हसोबाला मांस, मद्य इत्यादींचा नैवेद्य करून प्रसन्न केले जाते व अघोरी प्रयोगातून सुटका किवा इतरांवर प्रयोग केले जातात.
वरील नमूद केलेले देव आहेत त्यांचे प्रत्येकाचे महत्व असून त्यांनी एक परस्पर संबंध निर्माण केलेला आहे.
संसाराला लागणाऱ्या साध्यासुध्या बाबींची मागणी व पूर्तता या देवांकडून होते. म्हणजे ही काम्य दैवते आहेत. इच्छा पूर्तता करणारी दैवते आहेत. हे कुळाचे पूर्वापार चालत आलेले देव असल्याने यांना कुलदैवत अशी एकत्रित संज्ञा आहे. त्यातील एक लहान व दुसरे मोठे असे काही नाही. प्रत्येकाचे आपापले महत्व आहे.
तुम्हाला सातबारा घ्यायचा असेल तर लाईटच्या कार्यालयात जाऊन उपयोग नसतो तसे कुटुंब व संसारी मागण्यासाठी ह्याच देवांची मनधरणी करावी लागते.
सर्वात महत्वाचे म्हणजे हे देव अतिशय शीघ्र फळ देणारे असतात. आपल्या अनेक पिढ्यांना तसा अनुभव आलेला असतो म्हणून पूर्वापार आपण त्यांची पूजाअर्चा करीत आलेले असतो.
पुढे आपण देवघरातील इतर देवांकडे वळू,
साती आसरा: आसरा हा शब्द अप्सराचा अपभ्रंश आहे. सात पाण्याजवळ असलेल्या अप्सरा (किवा यक्षिणी) असा सोपा अर्थ इथे अभिप्रेत आहे.
इतिहासात जे जे अज्ञात व अद्भुत आहे त्याला यक्ष मानल्या गेले आहे. यक्ष हे विचित्र असतात. अनेक हात, प्राण्याचे शरीर किवा डोके असे यक्षांचे स्वरूप आहे. व्यावहारिक दृष्ट्या सातीआसरांचे महत्व हे तुमच्या मालकीच्या जागेतील विहिरी व पाण्याचे स्त्रोत यांच्याशी आहे. असे पाण्याचे स्त्रोत बुजवले किवा अडवले तर साती आसरा प्रकोप होतो असे मानले जाते. अशावेळी सती आसरा टाक करून घरात पुजला जातो. मोठे जमीनदार ज्यांच्या मालकीच्या जागेत भरपूर पाणी असलेली विहीर असेल तर साती आसरा टाक घरात हमखास असतो. पुढे जमीन मालकी गेली तरी टाक तसेच राहतात. असा टाक कसलेली उपद्रव करीत नसल्याने पुढे पूजन करीत राहिलेले योग्य असते. सातीआसरा प्रकोप झाला असता तीन शुक्रवारी वाहत्या पाण्यातील ७ खडे आणून त्यांना दहीभात व १ केळे यांचा नैवेद्य केला असता तात्पुरता त्रास टळतो.
विठ्ठल रुक्माई: वैराग्य हि उतारवयातील एक आवश्यक गरज आहे. नेटाने संसार केल्यावर मुलेबाळे स्थिरावली असता जग हे नश्वर आहे व समाधानी मोक्ष ही अंतिम गरज आहे हे जाणवायला लागते. कधीकधी नियतीचा फासा इतका निर्दय व अवकाळी पडतो कि माणूस तरुण वयात माझे माझे करायचे सोडून वैराग्य धारण करतो. अशावेळी वैराग्य हा उत्तम पर्याय असतो. काम-क्रोधादी टाकले कि ९०% प्रश्न मिटलेले असतात. घरातील ज्येष्ठ हे विठुरायाचे भक्त असणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे विठ्ठलरुक्मिणी यांचा देवघरात मानसन्मान ठेवणे क्रमप्राप्त आहे. विठ्ठल-रुक्मिणी ह्या उभ्या जोडमुर्ती अनेक पिढ्यानपिढ्या आपल्या घरात चालत आलेल्या आहेत. कमरेवर हात धरलेली दोघांची मुद्रा आता कर्म पुरे झाले हे दर्शविते. निष्काम कर्मयोग हे तत्व ह्या मुद्रेमागे आहे. कधीकधी संसारात राहून वैराग्य धारण करणे श्रेयस्कर असते.
सात्विक आहार, एकादशीला उपोषण, गळ्यात माळ हे विठ्ठल भक्तीचे महत्वाचे उपक्रम आहेत. आळंदी ते पंढरपूर आषाढीवारी हा उन्हपावसात शरीराचे कष्ट सोसून निर्वाणाचे भय दूर करणारा व मोक्षमार्ग दर्शविणारा आहे.
गणपती: शिवाचा पुत्र, उंदीर वाहन असलेला, हत्तीचे शीर व मानवाचे शरीर असलेला हा यक्ष (अद्भुत) रूपातील देव आहे. हत्ती हा बुद्धिमान प्राणी असून त्याचा मानवाबरोबर असलेला सहयोग बराच जुना आहे. मंदिर घरे बांधताना मोठमोठाले दगड हलविणे, जंगले कापणे यासाठी हत्ती मदत करीत आला आहे. दुसरीकडे उंदीर हा शेतीसाठी अतिशय उपद्रवी प्राणी असून त्यावर अंकुश ठेवणारा गणपती देव न बनला तरच नवल!
गणपती उपासना ही चतुर्थीला केली जाते. मोदक नैवेद्य गणपतीला प्रिय आहे. परंपरागत पितळेची गणपतीची मूर्ती घरात आढळते. तिचा फोटो खाली दिलेला आहे.
भाद्रपद महिन्यात पिक उत्तम आलेले असते पण दुसरीकडे उंदरांचा सुळसुळात वाढलेला असतो. प्लेगसारखा आजार हा उंदरांच्यामुळे उद्भवतो. हे उंदीर सर्वांसाठी व शेतकर्यासाठी विघ्नकर्ते ठरतात. त्यांचा नायनाट करणारा विघ्नहर्ता गणेश म्हणून आपण ह्याकाळात पुजतो. गणेश चतुर्थीव्रत हे मातीचा गणपती करून त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे व्रत आहे. गणेशमूर्ती ही सौम्य असावी. नेत्र शांत असावेत. गणपतीला अभ्यासात, स्पर्धा परीक्षेत यश येण्यासाठी, नवीन कार्य आरंभ करण्यापूर्वी साकडे घातले जाते.
गणपती हा प्रभावी देव आहे. नवसाला पावणारा म्हणून विघ्नहर्ता असे याचे नाव आहे. सर्व तत्वज्ञ गणेशाला आपल्या बाजूला ओढायचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ अथर्वशीर्षातील खालील श्लोक पहा.
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ६ ||
अर्थ: तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहेस. भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत.
हे अतिशयोक्तीपूर्ण किवा स्तुतीपर स्तोत्र आहे त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर गणपती म्हणजेच ब्रम्हा किवा विष्णू किवा रुद्र आहे का असा गोंधळ उडतो. पुढे इंद्र, अग्नी वायू हाही घोळ होतो. पण शब्दशः अर्थ घेणे चुकीचे आहे. कारण ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, वायू, अग्नी इत्यादी देवता पूर्णतः वेगळा गुणधर्म असलेल्या आहेत. इथे फक्त पराकोटीची स्तुती केल्याने सर्व देव व शक्ती म्हणजेच गणपती आहेत असे म्हटले आहे. हे बर्याचश्या मंत्रात आढळते. त्यामुळे देवाचे नक्की मूळ व पूजेचा उद्देश काय यात मात्र आपला गोंधळ उडतो.
दुसरीकडे काही तत्वज्ञ गणेशाला सिंधू संस्कृतीतील देव मानतात. भाजलेल्या मातीचा २ इंच x २ इंच आकाराचा मुखवटा लोक तोंडाला लाऊन नृत्यादी करीत असा दावा करीत असतात. पण २ इंच हा आकार फारच लहान आहे. हा गणपती कि हत्ती हेही स्पष्ट होऊ शकत नाही.
अन्नपूर्णा: वास्तविक ग्रामदेवता व लक्ष्मी ह्या धनधान्य व प्रदान करणाऱ्या देवी आहेत, त्यांच्याबरोबर बरेच घरात अन्नपूर्णा देवी आलेली आहे. अन्नपूर्णा देवीचा टाक असतो तसेच धातूची मूर्तीसुद्धा असते.
गणपती हा प्रभावी देव आहे. नवसाला पावणारा म्हणून विघ्नहर्ता असे याचे नाव आहे. सर्व तत्वज्ञ गणेशाला आपल्या बाजूला ओढायचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ अथर्वशीर्षातील खालील श्लोक पहा.
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ६ ||
अर्थ: तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहेस. भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत.
हे अतिशयोक्तीपूर्ण किवा स्तुतीपर स्तोत्र आहे त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर गणपती म्हणजेच ब्रम्हा किवा विष्णू किवा रुद्र आहे का असा गोंधळ उडतो. पुढे इंद्र, अग्नी वायू हाही घोळ होतो. पण शब्दशः अर्थ घेणे चुकीचे आहे. कारण ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, वायू, अग्नी इत्यादी देवता पूर्णतः वेगळा गुणधर्म असलेल्या आहेत. इथे फक्त पराकोटीची स्तुती केल्याने सर्व देव व शक्ती म्हणजेच गणपती आहेत असे म्हटले आहे. हे बर्याचश्या मंत्रात आढळते. त्यामुळे देवाचे नक्की मूळ व पूजेचा उद्देश काय यात मात्र आपला गोंधळ उडतो.
दुसरीकडे काही तत्वज्ञ गणेशाला सिंधू संस्कृतीतील देव मानतात. भाजलेल्या मातीचा २ इंच x २ इंच आकाराचा मुखवटा लोक तोंडाला लाऊन नृत्यादी करीत असा दावा करीत असतात. पण २ इंच हा आकार फारच लहान आहे. हा गणपती कि हत्ती हेही स्पष्ट होऊ शकत नाही.
अन्नपूर्णा: वास्तविक ग्रामदेवता व लक्ष्मी ह्या धनधान्य व प्रदान करणाऱ्या देवी आहेत, त्यांच्याबरोबर बरेच घरात अन्नपूर्णा देवी आलेली आहे. अन्नपूर्णा देवीचा टाक असतो तसेच धातूची मूर्तीसुद्धा असते.
योगेश्वरी (जानाई) ही कृषीजीवनाशी संबंधित देवी आहे. पण शहरात शेती न करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी पर्याय हवा म्हणून अन्नपूर्णा ही देवघरात पुजली जाते. दक्षिणेकडील राज्ये विशेषतः केरळ, तमिळनाडूत ही पूजा केली जाते. केरळ राज्यात अतिवृष्टी होते तर तमिळ राज्यात अनावृष्टी होते. दोन्हीही ठिकाणी शेती फार अनुकूल नाही. त्यामुळे जानाई (योगेश्वरी) च्या जागी अन्नपूर्णा आलेली आहे.
सांस्कृतिक देवाणघेवाणीत तसेच राजकीय बदल होत असताना संपूर्ण समाज एकाच देवीदेवतेचे पूजन करीत असेल तर त्यांना एकत्र आणणे सोपे असते. त्यामुळे विविध देव पुढे आपल्याकडे येत गेले. श्रद्धा एकटावल्या गेल्या तसेच विभाजित झाल्या. हे आणखी कोणते देव होते यांची आपण पुढे माहिती घेऊ.
सांस्कृतिक देवाणघेवाणीत तसेच राजकीय बदल होत असताना संपूर्ण समाज एकाच देवीदेवतेचे पूजन करीत असेल तर त्यांना एकत्र आणणे सोपे असते. त्यामुळे विविध देव पुढे आपल्याकडे येत गेले. श्रद्धा एकटावल्या गेल्या तसेच विभाजित झाल्या. हे आणखी कोणते देव होते यांची आपण पुढे माहिती घेऊ.
No comments:
Post a Comment