Friday, 11 August 2017

जात व आडनावे

जातीवरून आडनाव शोधणारे लोक जागोजागी आढळतात. पण जातीचा आणि आडनावाचा तसा काहीही संबंध नाही. याचा रंजक इतिहास आपण थोडक्यात पाहणार आहोत. 
यासाठी आपल्याला इतिहासात फार मागे जावे लागेल. आद्य माणूस हा सर्वात पूर्वी पशुपालन करीत होता व भटके जीवन जगत होता. पशूंच्या मदतीने जंगले नष्ट करून मानवाने शेतीसाठी योग्य जमीन बनवायला सुरुवात केली. त्यावेळी मनुष्यवस्ती अतिशय तुरळक होती हे नक्की. पुढे लहान खेडी आणि गावे निर्माण झाली. पण मनुष्य मोठे अंतर कापून दुसऱ्या वसाहतीवर आक्रमण करू शकेल अशी प्रवासाची साधने त्याच्याकडे नव्हती. मोठे अंतर कापून केलेले सर्वात प्रथम आक्रमण हे ग्रीक राजा अलेक्झांडर याचे नोंदले गेले आहे. त्याच्या आधी १००० व नंतरच्या १२०० वर्षात अशा मोठ्या कुठल्याही आक्रमणाची नोंद इतिहासात नाही. 
असे आक्रमण का होते याचाही विचार इथे करणे गरजेचे आहे. आक्रमणाची दोन प्रमुख कारणे दिसतात

१) साम्राज्यविस्तार 
2) जीवनावश्यक वस्तू यांची लुट.

वरवर साम्राज्यविस्तार हे कारण जरी दिसत असले तरी मूळ उद्देश जीवनावश्यक वस्तू, स्त्रिया, पशू यांची लुट हेच आक्रमण करण्याचे कारण दिसते. मानवांची संख्या वाढत गेली कि जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण होतो आणि आक्रमण करावे लागते.
असा आक्रमण करण्याचा प्रसंग २२०० वर्षाच्या प्रदीर्घ काळात फक्त एकदाच आला हे लक्षात घेण्यासारखे आहे. याचा अर्थ इतर सर्व काळात लोक आपापल्या जागी आहे त्या साधनसंपत्तीत सुखात जगत होते.

आता आपण रामायण महाभारत काळाकडे वळू. हा काळ नक्की कुठला हेही ठामपणे कुठेही सिद्ध होत नाही. हा बहुतेक शांततेचा काळ होता इतकेच आपण समजून पुढे जाऊ. रामायण काळात स्वतः राजा राम हा सूर्यवंशी राजा होता. तर श्रीकृष्ण हा यदुवंशी होता. रामाच्या सुर्यवंशाचे पुरावे पुढे सापडत नसले तरी श्रीकृष्णाच्या यदुवंशाचे पुढे आडनाव यादव व आत्ताचे नाव जाधव सर्वत्र आढळते.
श्रीकृष्णाने आपल्या यदुवंशीय लोकांचे नगर वसवले असे काहीसे इतिहासात सापडते. हे जर उलट तपासले तर असे लक्षात येईल कि एकाच वंशाचे लोक (एकच आई वडील असलेले) एका गावात स्थाईक झाले व त्या वंशाचे नाव त्यांनी सर्वांनी धारण केले. मग अशा अनेक लोकांचे नगर बनले इत्यादी. म्हणजे श्रीकृष्णाने अशा यादवांच्या गावांना एकत्र आणून नगर स्थापन केले असा अर्थ होतो.  नगरात गावात एकाच आडनावाचे लोक वेगवेगळे व्यवसाय करीत होते हेही पुढे ओघाने येतेच. वेगवेगळे व्यवसाय असल्याने त्यांच्या जाती सारख्या नव्हत्या.

रामायण व महाभारत हे ग्रंथ आपले श्रद्धास्थान आहे. पण नक्की ही युद्धे इतकी जोरदार लढली गेली का? त्यासाठी युद्धातील सैनिकांच्या संख्येचा विचार करू. श्रीकृष्णाचे "फार मोठे" यादव सैन्य कौरवांच्या बाजूने लढले. आज अगदी उत्तरप्रदेश बिहारचा विचार केला तरी यादव आडनावाची टक्केवारी एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के इतकीही नाही. म्हणजे त्याकाळी हीच संख्या काही हजारात असेल इतकेच अनुमान निघू शकते. लोकसंख्या गेल्या शतकात झपाट्याने वाढली. महाभारत हे युध्द कुटुंबातील वादसदृश टोळीयुद्ध होते इतकेच. इतर आडनावाचे वंशाचे फार लोक त्यात सहभागी नव्हते.सहभागी होते ते फक्त कौरव व पांडव.
आता त्यावेळी वापरल्या गेलेल्या शस्त्रांचा विचार करू. धनुष्यबाण हे शस्त्र फारतर १० मीटर इतक्या लांबीवर मारा करू शकते. बाणाने मुंडके उडवणे हे शास्त्रीय दृष्ट्या तपासले तर हास्यास्पद आहे हे सहज लक्षात येईल. त्याने माणूस फक्त जखमी होऊ शकतो. चक्र हे अस्त्र फारतर एकदा फेकून मारल्याने जखमी करू शकते पण ते उडत जाऊन परत येऊ शकते हे शक्य शास्त्रीयदृष्ट्या तपासले तर शक्य नाही. पण तेच चक्र शत्रूच्या हाती लागले तर त्याचा उलटा प्रहर सहन करावा लागू शकतो. 
भाला-त्रिशूल ही अस्त्रे प्रभावी असली तरी एकावेळी फक्त एकाचाच संहार करू शकतात. व तत्कालीन धातुकामाचा विचार करता फार धार नसलेली शस्त्रे फक्त जखमी करू शकत असतील हे सत्य लक्षात येते. तलवारीचे सुद्धा तसेच आहे. 
थोडक्यात काय तर युद्धातील विजय हा शस्त्रांवर अवलंबून नसून सैन्याच्या संख्येवर अवलंबून आहे हे स्पष्ट होते. आता पुढचा प्रश्न हा कि तेव्हा खरेच हि भयंकर युद्धे झाली कि नुसते शक्तीप्रदर्शन केले गेले? 
युद्धे होऊन नष्ट झालेल्या रथ, शस्त्रे, मानवी सांगाडे यांचे कोणतेही अवशेष आजवर देशात कुठेही सापडले नाहीत. याचा अर्थ हि युद्धे इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली याला कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. हारले कि मारले गेले हे निश्चित नाही. हारले पण मारले असा इतिहास लिहिला जेत्त्याकडून लिहिला जाऊ शकतो.त्यातअनेक वर्षांचा अपभ्रंश जोडला तर हे उघड होते.   
समाजाला जोवर जीवनावश्यक वस्तू अपुऱ्या पडत नाहीत तोवर तो युद्धाला उतरत नाही हे महत्वाचे तत्व इथे तपासून बघावे लागते. पिकपाणी उत्तम असताना सगळे मजेत जीवन जगत असताना ही युद्धे समजा झाली असतील तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संपत्ती, पत्नी अधिकार यासाठी सर्वसामान्य माणूस या युद्धात स्वताच्या जीवावर उदार होऊन उतरणे शक्य आहे का? त्रयस्थ माणूस फारतर दोन्ही पक्षांची समजूत काढण्याइतपत सहभागी होऊ शकतो. त्यामुळे या युद्धांचा अन्वयार्थ एक सांस्कृतिक ठेवा जो पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगताना वाढत व अपभ्रंशीत होत गेला इतकाच आहे. 
दसरा हा सण साजरा करताना आपण तांदुळाचा दैत्य करून कापतो तसा काहीसा हा प्रकार आहे.

थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच कि ह्या काळात व मागील व पुढील काळात जी युद्धे लढली गेली ती आपापसातील युद्धे होती. पण ती जीवनावश्यक वस्तूंची लुट करण्यासाठी केली गेलेली धाड-सदृश्य युद्धे नव्हती. सगळे समाज गुण्यागोविंदाने नांदत होते. ज्याची राजकीय आकांक्षा मोठी होती तो त्याच्या नगरातील सगळ्यांचेच (म्हणजे पगारी लढवैय्ये व कारागीर) सैन्य उभारून नुसता उभा राहिला तरी जो संख्येने मोठा तो विजयी व संख्येने कमी तो पराजित असा निकाल लागत होता. इतिहास हा नेहमी जेता लिहित असतो त्यामुळे पुढे ते युद्ध कसे अधिकाधिक भयाण होते हेही लिहिले गेले. पण ह्या युद्धाचा मूळ उद्देश काय हे लक्षात येतच नाही.

हा उहापोह करायचे कारण हेच कि युद्धामुळे जातीसंस्था निर्माण झाल्या. १) युद्धासाठी एकत्र केले गेलेले लढवैय्ये लोक यांची एक जात, 2) त्यांना अन्न पुरवणारे शेतकरी यांची दुसरी  जात व ३) इतर वस्तू व तांत्रिक सेवा देणारे हि तिसरी जाती, अशा प्राथमिक जाती निर्माण झाल्या.
याचा अर्थ आपला हा मध्ययुगीन समाज शांततेत धनधान्याची भरपूर रेलचेल असलेले जीवनमान जगत होता. त्याला कुठल्या आक्रमणाची कसलीही तोशीश लागली नव्हती. मग इतक्या कट्टर तेव्हा निर्माण झाल्या होत्या का?

आत्ता आपण पुढील काळाकडे वळूया. हा काल होता इस्लामी आक्रमणाचा. इस्लामी आक्रमणे सुरुवातीच्या फार मोठ्या काळात हि धाडी आणि लुटालूट करण्यासाठी केलेली असत. त्यांचा मुळ उद्देश जीवनावश्यक वस्तूंची लुट हाच होता. अशी लुट करण्यास सुरुवात मुहमद बिन कासीम याने केली. त्याने अनेक हल्ले करून मोठी संपत्ती, दागिने, पैसा, सोने चांदी, स्त्रिया, गुलाम पशु हे सगळे लुटून एकदा नव्हे तर अनेकदा नेले. पुढे गझनी, अब्दाली तैमुर यांनीही लुट केली व निघून गेले. इथे राज्य स्थापन केले नाही हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.
परकीय लुट करायला आले असता आपण आपले शांत जीवन जगात बसलेले होतो. असे संकट येणार आहे याची अजिबात खबर समाजाला लागलेली नव्हती. अचानक कित्येक लाखांचे सशस्त्र सैन्य थोड्या अंतरावर येऊन धडकते तेव्हा धावाधाव सुरु होई. 
आपला समाज अजगरासारखा पसरला होता. परकीय आक्रमणाला उत्तर देण्यास अजून त्याने काहीच पवत्रा घेतला नव्हता. 
पुढे आपल्या समाजाने कसा पवित्रा घेतला आणि जाती कशा निर्माण झाल्या हे पाहू.
तोवर शुभ रात्री!!
क्रमश:


मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी 

https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared 

गणपती बाप्पा मोरया 

जय शिवाजी जय भवानी  










No comments:

Post a Comment