Tuesday, 30 May 2017

मुख्यमंत्री व नांगरे पाटील अपघात



गेल्या काही दिवसात दोन अपघाताच्या बातम्या गाजत आहेत. त्यातील पहिली माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची तर दुसरी विश्वास नांगरे पाटील यांची!

अपघात झाले पण दोघेही सुखरूप वाचले. अपघात का झाला व सुदैव कि दोघेही सुखरूप का वाचले हे खाली पहा. 

हा २७.५.२०१७ चा सकाळी मांडलेला आकाशातील ग्रहांचा नकाशा. 

शनी-मंगळ प्रतियोग हे अपघाताचे प्रमुख कारण होते. नीट निरीक्षण करून पहा. शनी १.५२ अंशावर वक्री आहे, तर मंगळ ०.१९ अंशावर मार्गी आहे. शनी हा मंदगती ग्रह आणि मंगळ हा शीघ्र गती ग्रह यांची थोड्याच अवधीत युती होणार आहे.
 हे दोन ग्रह एकमेकांचा वेध घेत आहेत म्हणजेच एकमेकांकडे येत आहेत. ह्या वेध घेण्याच्या काळात अपघाताचे प्रमाण खूप वाढते व ह्या दोन ग्रहयोगाची फळे तेव्हाच मिळतात. जेव्हा हे दोन ग्रह युती करून नंतर एकमेकांपासून दूर जाऊ लागतात तेव्हा फळे कमी होत जातात. 
यासाठी अंशात्मक योग बघणे अतिशय महत्वाचे असते. 

आता हे दोघे सुदैवाने वाचले. ते सुदैव कोणते होते? त्यासाठी गुरु आणि चंद्राची युती पहा. गुरु १९ अंशावर आहे पण तो वक्री आहे म्हणजे तो शनीकडे वेध घेतो आहे. तसेच चंद्र १.२५ अंशावर शनीकडे वेध घेतो आहे. थोडक्यात शनी-गुरु-चंद्र-मंगळ यांचा केंद्र योग होत आहे. त्यातील गुरुचा शनिमंगळ युतीकडे होणारा वेध आणि चंद्र गुरूबरोबर करणारी युती यामुळे अशुभ टाळले. 
त्यामुळे वेळीच काळजी घ्या, दरवेळी सुदैव पाठीशी असत नाही असा एक अनाहूत सल्ला!!