Saturday, 29 August 2015

जन्मपत्रिकेतील चार वर्ण व तीन गण.

आता  आपण जन्मपात्रिकेतील चार वर्ण आणि त्यांचे स्वभाव कसे ते बघूया.
१) ब्राम्हण वर्ण:
_हा कधीही व्यायाम करून शरीरयष्टी बळकट करणार नाही.
_बोलणार अतिशय मोजके. पण ह्याची एखाद्याशी नाळ जुळली कि त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो.
_स्वतःची शारीरिक आणि मानसिक कमजोरी हुशारीने लपवून ठेवणार आणि दुसर्याच्या मर्मावर बरोबर बोट ठेवणार!
_अति उन्ह, थंडी, पाऊस अशात ह्याला लगेच त्रास होतो.
_स्वतःच्या वेळा अगदी पळणार. दुसर्यांच्या वेळेची फारशी तमा बाळगत नाही. 
_स्वच्छता जरी म्हणत असला तरी त्याची फार तमा बाळगत नाही.
_स्वतःच्या खिशातले पैसे कधीच काढणार नाही. गावाबाहेर गेला तर सर्व नातेवाईक ह्यांचे पत्ते नीट जपून ठेवणार.
_विश्वातील सगळे सत हे आपल्याच मुळे अबाधित राहिले आहे असा प्रत्येक ब्राम्हण वर्णीयाचा समज असतो.
_समोर वाघ काय साधे कुत्रे जरी आले तरी हा पळून जातो.
अश्या अनेक गमतीजमती आहेत ह्या ब्राम्हण वर्णाच्या.

२) आता शुद्र वर्णाकडे वळू.
_मुळात शुद्र म्हणजे शू: ह्या शौच, तथा शुचिता आणि पुढे स्वच्छता ह्या शब्दाचे कारण आहे. द्र हा देणारा द्र आहे. शुचिता देतो तो शुद्र. असा मूळ वैदिक अर्थ आहे. _स्वभावाने सगळ्यात आळशी हा शुद्र. त्याला उठवून उठवून कामाला लावावे  लागते. शेवटी जे शिल्लक राहते ते त्याला काम करावे लागते हा यज्ञ संस्थेतील मूळ अर्थ वैदिकांना माहित होता. म्हणून सगळा सोहळा आटोपला कि जागा होऊन साफसफाई करणारा हा वैदिक शुद्र होय.
_नंतर हा अर्थ काही कारणांनी अधिक विस्तृत होत गेला.
_शूद्राला स्वतःचे मत तयार व्हायला थोडा अधिक जास्त काळ लागतो. पण ज्यावेळी त्याचे स्वतःचे मत प्रगल्भ नसते तेव्हा तो जे त्याला पटलेले आहे त्याला पूर्णपणे चिकटून राहतो.
_शूद्राची कष्ट करण्याची क्षमता अफाट असते. तो शारीरिक श्रम किवा मानसिक श्रम अफाट करू शकतो. पण त्याला अजिबात जाणीव करून देऊ नका कि तो कष्ट करतोय ती. एखादे गाणे गुनगुनत तो संपूर्ण घर धुवून काढेल, किवा २४ तास नेटवर मान मोडून एखादा शोध घेत राहील.
_ तुमच्या दारात एखादे कुत्रे, किवा गाढव मरून पडले तर उचलायला दोनच वर्ण पुढे येतात ते म्हणजे शुद्र आणि क्षत्रिय.   

३) आता आपण क्षत्रिय वर्णाकडे वळू, ह्या वर्णातील वैदिकांचा क्षत्रिय आणि शेतकऱ्यांचा क्षेत्रीय ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. वैदिक क्षत्रिय हा क्षत करणारा क्षतिःय, क्षत्रप असा आहे त्याचबरोबर क्षत्रपाळ, म्हणजेच छत्रपाल हा शब्द पुढे आला नंतर त्याचे छत्रपति अशी व्युत्पत्ती झालेली आहे. त्याआधीच ग्रामीण भागातील मोठमोठ्या शेत्या ह्या क्षेत्रीय, शेतकरी लोकांनी पटकावल्या. शिवाय वैदिकांनीही त्यांना गपचूप मान्य करून घेतले. कारण त्यांना क्षत्रिय शुद्र हा सगळा समाज आयता मिळाला होता. त्यांनी आपली जुनी वर्णीय नावे नवीन लोकांना चिकटवली. शेतकरी हे लोक साधे होते त्यांनीही आपल्या आजच्या संस्कृत संशोधकांसारखे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र ह्या शब्दाचे अर्थ जुळवायचा प्रयत्न केला. वैदिकांनी दरवेळी त्यांना जो त्यांच्या धर्माप्रमाणे अर्थ अभिप्रेत होता तोच सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकून घेतोय कोण? ज्याला सगळ्यात मोठा वाटा मिळालाय तो कशाला पुढे येउन आपल्या वाट्यात  वाटेकरी करून घ्यायला तर होणार? विस्तृत जमिनीबरोबर बहुपत्नीत्व ह्यासारखी अनेक सुखे आपोआपच क्षेत्रीय लोकांना प्राप्त झाली. सत्युगात एकपत्नी राम झाला आणि पुढे तोच कृष्ण कसा झाला ह्यातले गूढ हेच आहे.
 वैदिक स्वतःच्या लढवैय्या समाजाची संख्या वाढवण्यात विलक्षण चाणाक्ष होते. पण नाईलाजास्तव त्यांना आता एका अनोळखी लोकांना क्षत्रिय समजून त्यांची संख्या वाढवायला मूक अनुमती द्यावी लागली. वैदिक इथे काहीच करू शकत नव्हते. ते मोठे तत्वज्ञान सांगू शकत होते पण समाजात बदल घडवून आणण्याइतकी त्यांची शक्ती नव्हती. आत्ताही तेच चालू आहे, हे नीट विचार केला तर चटकन लक्षात येते. .....contd

Sunday, 2 August 2015

पुरोगाम्यांचा सूळसूळाट?

पुरोगाम्यांचा सूळसूळाट
 लेखाचा विषय जरा कटू शब्दाने वर्णीत केला आहे पण मुळात पुरोगामी ह्या शब्दाबद्दल काही फार राग नाही, पण कधी कधी असे वाटते कि तथाकथित पुरोगामी लोक आपल्या समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास एका विचित्र अलिप्त टोकावरून करत असतात. त्यांनी आपल्या देशाचा खालीलप्रमाणे अभ्यास, करणे गरजेचे आहे
  • भौगोलिक स्थान,
  • कटू-गोड इतिहास,
  • लोकांच्या उपजीविकेची साधने,
  • इथे जन्मलेले धर्म व विचार
कॉंग्रेसचे विचार पुरोगामी होते असे वाटून भारतीय जनतेने त्यांना ६० वर्ष वंशपरंपरागत सत्ता भोगायला दिली. सुरुवातीला ते पुरोगामी विचार मोठे रोचक वाटत होते, पण नंतर नंतर त्यातला फोलपणा स्पष्ट होत गेला. आणि मे २०१४ ला ऐतिहासिक सत्तापालट होऊन कोन्ग्रेस हा पुरोगामी पक्ष विरोधी नेतेपदाची दावेदारीही सांगू शकला नाही. हजारो वर्षे पुरोगामी विचारांचा लढा देणाऱ्या आपल्या देशाने हा विचार का केला? का नाकारले ह्या पुरोगामी पक्षाला? ह्या लेखात पुरोगामी नावाखाली सध्या काय चालू आहे, काय आहे, ह्याचा उहापोह केला आहे.
  
१) सध्याचे पुरोगामित्व हे भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाला अधोगामी ठरवत चाललेले पुरोगामित्व आहे. बरेचसे पुरोगामी देशाचे व समाजाचे  वाट्टोळे हे वैदिक ह्यांनीच केले हे पटविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात.  पुरोगामी विचारतात कि समजा सगळे मुस्लिम भारतातून निघून गेले तर आपले सगळे प्रश्न संपतील का? त्यांना एक प्रश्न विचारायला हवा कि, वैदिक शिल्लकच नाहीत, ते संपुष्टात आल्याने समाज फार बदललाय का? समाजाचे सगळे प्रश्न सुटलेत का? ज्यांनी आत्तापर्यंत ज्ञान आपल्या ताब्यात ठेवले ते ते तथाकथित वैदिक तर परदेशात पळून गेलेत. थोडेफार राहिलेत तेही पळून जायच्या मार्गावर आहेत. मग उच्चवर्णीय राहतात कोण? तर राहतात क्षत्रिय, (म्हणजे मराठे) त्यांना फक्त लढायला लावले गेले. लढायला लावणारे जसे वैदिक होते तसेच वैश्य व शुद्रही होते, कारण लढणे हि सामाजिक जबाबदारी होती. शुद्र आणि वैश्य आम्ही लढायला जबाबदार नाही असे म्हणून हात काढून घेते झाले नसतील हे हे सत्य असू शकते. 

दहशतवादाचे उद्दातीकरण
इतिहासाचे दाखले देताना पुरोगामी नेहमी वेद, त्यातील हिंसा, वैदिक वान्ग्मायाचा भंपकपणा ह्यावर हिरहिरीने लिहितात पण पण इतर धर्मातील हिंसा व त्यातील दाखले ह्याबद्दल नेहमीच आदराने बोलतात. त्यांच्या ह्या लूटमारीत किती पुरुष मेले, किती बायकानची अब्रू लुटली गेली, किती गुलाम देशातून बंदी बनवून नेले गेले ह्याचा आकडा हे पुरोगामी शोधत नाहीत. 
पुरोगामी संकल्पना
पुरोगमी म्हणजे आपल्या जुनाट संस्कृतीला नावे ठेवणे असे झाले आहे. त्यापेक्षा आपले पूर्वज कशा प्रतिकूल परिस्थितीत राहत होते. प्रतिकूल जीवन असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण संकल्पना जन्माला घातल्या. ह्यांचा पूर्ण अभ्यास न करता विचार करणे म्हणजे पुरोगामी असे पुरोगामित्वाचे स्वरूप झालेले आहे. त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी ह्यातील सीमारेषा आपली चिकित्सावृत्ती आणि प्रतिगामी लोकांचे जीवन जाणून घेण्यावरून अवलंबून आहे. आत्ता आपण एक रात्र वीजपुरवठा बंद झाल्यास नुसते उकाड्याने अस्वस्थ होण्याशिवाय अनेक प्रश्नांना आपण तोंड देतो. आत्ताची पिढी रात्री भटकण्याला पुरोगामी समजते. पण हे इतिहासात किती अवघड होते? आत्ताही काहींना ते सोपे असले तरी काही अपवाद वगळता सर्वांना ते चमत्कारिक वाटते!

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था
कोणत्याही धर्माचा व त्यातील गुणावगुण ह्यांचा अभ्यास नुसताच इतिहासावरून होत नसतो, त्यासाठी तो धर्म जिथे स्थापला गेला, वाढला त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची जीवनपद्धती, उत्पन्नाची साधने, भौगोलिक स्थान हेही विचारात घेणे महत्वाचे असते.
१) हिंदू धर्माचा अभ्यास करताना नुसतेच वैदिक व इतर असा विचार करणे चूक आहे, त्यासाठी हिंदू धर्माची इतर धर्मांशी तुलना केली तर फारच महत्वपूर्ण माहिती हाती लागते.
अ) हिंदू धर्म जिथे वाढला तिथे शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. तसेच नागरिकीकरण झालेले होते. त्यामुळे शेतीवर आधारित समाजरचना अस्तित्वात आली. शेती करणारा, त्या मालाची विक्री (देवाण घेवाण) करणारा व थोडेफार रक्षण करणारा समाज येथे तयार झाला. भारताचा उत्तर, वायव्य भाग दुर्गम असल्याने अंतर्गत भागावर सहसा सतत अक्रमने झाली नाहीत (चंगेज खान हा भारतात न घुसता मध्य पूर्वेत गेला होता त्याआधी खलिफा क्र. १ अनेकदा सिंध पर्यंत येउन माघारी गेला होता कारण त्याच्या सैनिकांनी त्याला सांगितले कि पुढे मोठे वाळवं
आहे तिथे आपल्याला लुटायला काहीच नाही. ).
ब) याउलट इस्लाम, ख्रिश्चन आदि
धर्म हे टोळीवाल्यांच्या प्रदेशात वाढले. त्यांचे थोडेफार पशुपालन होते. त्यांचे प्रमुख उद्योग पशुपालन त्यामुळे पशूंना लागणारा चारा ह्यासाठी भटकणे, अक्रमणे करून लुट मिळवणे हेच होते. त्यात त्यांना वर्ग जाती व वर्ण तयार करणे अशक्य होते. कारण समाज वर्गात विभाजित झाला तर लढाईला संख्याबळ कमी पडत असे. पूर्वी लढल्या संख्याबळावर लढल्या जायच्या हे  वेगळे सांगायची गरज नाही.
क) हिंदू धर्मात रक्षण करणारा वर्ग पूर्वी अस्तित्वातच नसावा कारण त्याची गरज नव्हती. जो रक्षक समाज होता तो फक्त अंतर्गत नियमन करणारा पोलीस सदृश राजा होता.
ड) ग्रामीण भागात जातीय/वर्णीय व्यवस्था अजून टिकून आहे त्याचे कारण तिथे शेती अजून टिकून आहे. वाढत्या शहरीकरणात वर्ण/जातीव्यवस्था गळून पडत आहे हे त्याचेच पुढचे कारण.