आला दिवस जात असतो, पण मनातील उद्दिष्ट साध्य होईल अशी परिस्थिती दिसत नसते. एक रटाळपणा आलेला जाणवतो. हा रटाळपणा जसा मार्केटमध्ये मंदीच्या स्वरुपात जाणवतो तसाच प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत असा रटाळपणा व मरगळ आलेली असते. ही कशामुळे आलेली असते ते आपण या लेखात पाहू,
त्याआधी वर्षफल नावाचा एक ज्योतिष्य प्रकार आहे त्याबद्दल थोडे बोलू. वर्षफल म्हणजे एखादे वर्ष ज्यावेळी सुरु होते त्यावेळी जे ग्रहमान असते त्याप्रमाणे दिलेला फलादेश. हे वर्षफल मोठ्या गमतीशीर वाक्यांनी भरलेले असते जसे "खरीपाचा स्वामी हा बुध असल्याने पर्जन्यमान मध्यम राहील", "रसांचा अधिपती मंगल असल्याने गुळ, तूप, मध कमी मिळेल", "यावर्षी हेममाली नावाचा नाग आहे म्हणून पाऊस भरपूर पडेल" (ही काय ती हेमामालिनी नाही, हा नाग आहे तो कुठे असतो ते मला विचारू नका) काय वाट्टेल ते लिहिलेले असते त्यामुळे त्याचा अर्थ काय आणि कुणासाठी उपयोगी हे कळत नाही. बऱ्याचदा वर्षफल हे फसलेले सिद्ध होते.
वर्षफल सर्व भविष्यवेत्त्यांनी एकाच निकषावर सांगावे असा काही नियम नसल्याने प्रत्येकजण आपापले हेमामालीनी? नाग?? प्रकारचे वर्षफल छापून मोकळा होतो. हे छापणारे लोक यांच्याकडे जे साहित्य वंशपरंपरेने आलेले होते तेच आजही वापरत आहेत.या साहित्यात किती घालघुसड केली गेली असेल किवा वर्षानुवर्षे एकाकडून दुसर्याकडे हस्तांतरित होत असताना काय काय बदल झालेत यात न शिरता आपण आत्ताचे वर्षफल कसे काय असू शकते हे जाणून घेऊ.
हे वर्षफल म्हणजेच; माझा सध्याचा काळ व येणारा पुढील १ वर्षातील येणारा काळ कसा आहे हे आपण आपल्या सोप्या पद्धतीने जाणून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत.
त्यासाठी ९ ग्रह व १२ राशी अशी सोपी मांडणी आहे. सध्या कुठले ग्रह कुठे (कुठल्या राशीत) आहेत यावरून आपण हा अभ्यास करणार आहोत.
शनी: शनी हा ग्रह सध्या धनु राशीला आहे, धनु हि गुरूची मूळत्रिकोण राशी आहे. शनी व गुरु हे सम ग्रह आहेत. शनी व गुरु सम ग्रह असल्याने त्यांचा न्याय व सत्याशी जवळचा संबंध आहे. उदा. आपल्याकडे नोटबंदी केली गेली. यात चोर सापडलेच जातील हा गुरूचा विचार होता, पण शनी गुरु गृही असल्याने बरेच काळे पैसेवाले सुटले. कारण ते रंगेहाथ पकडले गेले नाहीत. हीच जर शनीच्या स्वगृहात शनी असताना नोटबंदी झाली असती तर बरेच चोर रंगेहाथ मोठमोठे व्यवहार करताना सापडले असते. असो,शनी६ महिने मंगळाच्या वृश्चिक राशीला जाऊन सप्टेंबर २०१७ ला परत गुरूच्या धनु राशीला येतो. तोवर हीच स्थिती राहणार. नन्तर मग पुढे २० जाने २०२० ला शनी स्वराशीला म्हणजेच मकर राशीला येतो. तो काळ एकदम झकास असणार. न्यायदान, खटले, मोठ्या कालावधीची नोकरी यासंबंधी तेव्हा तो शुभफळे देणार हे नक्की. आत्ता अजिबात अपेक्षा करू नका.
गुरु: गुरु सध्या बुधाच्या राशीला आहे, बुध-गुरु मित्र नाहीत. बुध जरी गुरूशी सम ग्रह असला तरी गुरु बुधाशी सम अथवा मैत्र नाही. ह्या काळात प्रत्येक व्यवहार खूप चिकित्सा करून, त्यावर वादविवाद करून केला जाणार. त्यात वेळ खर्च होणार. गुरु पुढे शुक्राच्या तुला राशीला जाणार तेव्हा तर गुरूला महत्व फार कमी राहणार, आत्ता मुहूर्त आहे म्हणून लोक लग्न उरकून घेणार, उंची वस्त्रे, विवाहातील खर्च, सर्वसामान्य डामडौल यासाठी लोक आपल्या कुवतीपेक्षा पैसे खर्च करणार.
राहू: राहू सध्या सिंह ह्या त्याचा अतोनात दुश्मन असलेल्या रवीच्या राशीला आहे. पुढे सरकून तो सप्टेंबर मध्यास मकर राशीला येतो. विशेष म्हणजे मकर हि राहूची मूळ त्रिकोण राशी आहे.राहू हा जे जे गूढ आणि लपवलेले गेले आहे त्याचा कारक आहे,त्यामुळे भ्रष्टाचाराची मोठमोठाली प्रकारणे उजेडात येऊन निकाली निघतील.टेबलाखालून पैसे घेणारेजागोजागी सापडतील.भ्रष्टाचार लपवून चाललेले उद्योग संकटात येतील.
तर हे आहे माझे वर्षफल.
बाकी राहिलेले, रवी शुक्र, मंगल, बुध हे ग्रह १-१ महिना राशीत असतात ते वर्षफल फारसे प्रभावित करीत नाहीत. फक्त शुक्र आत्ता बरेच काळ वक्री चालला आहे व तोही मीन ह्या उच्च राशीला.त्यामुळे काही महत्वाचे खर्च करावेच लागतील, ते वाया जाणार नाहीत.
No comments:
Post a Comment