Saturday, 8 October 2016

भाग्यरेषा: पैसा, पैसा आणि पैसा

पैसे कुणाला नकोय, दात पडले असतील तरी माणूस चणे गोळा करतच असतो. पैसे प्रत्येकालाच हवे असतात. त्यातच स्थिर प्राप्ती होत असेल तर स्वतःची आणि प्रपंचाची काळजी करावी लागत नाही. आपण ह्या लेखात भाग्यरेषेचा विचार करूया, कारण भाग्यरेषा ही जवळ असणारा पैसा व पैसे कमावण्याची शक्ती दर्शविते. ही शक्ती परिस्थिती सापेक्ष असते. आजूबाजूची परीस्थिती हलवून सोडून पैसे मिळवण्याची क्षमता भाग्यरेषेवरून सूचित होते. 

त्याआधी हातावरील मुख्य रेषा कुठल्या हे खालील चित्रात पहा,
 

आपण भाग्यरेषेच्या काही मूलभूत बाबी समजावून घेऊ, केस-१
 ह्या व्यक्तीची भाग्यरेषा फार लवकर म्हणजे मनगटाजवळ सुरु झाली आहे. याचा अर्थ कुटुंबात ह्या व्यक्तीला लहानपणीच बरेच अधिकार मिळाले. थोरला असणे, लाडका असणे, एकुलता एक असणे, व्यवहारज्ञान अधिक असणे अशा कारणास्तव वयाच्या लहानपणीच असे अधिकार मिळतात. 


 वय वर्षे १५ च्या आधीच सुमारे १० वर्षे भाग्यरेषा ठळक आहे, म्हणजे ही व्यक्ती चांगले भाग्य अर्थात पैसा ह्याची मालक अगदी वयाच्या ५ व्या वर्षांपासून झाली होती. अर्थात ह्या व्यक्तीने स्वतःच्या करिअर कडे लक्ष दिले. स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे गेला. त्यामुळे भाग्यरेषा आयुष्यरेषेपासून दूर सुरु होतेय. आत्ता ह्या व्यक्तीचे वय ४५ च्या दरम्यान आहे. तोवरचा काळ उत्तम पदावर नोकरी करण्यात गेला. सांप्रतच्या काळात काही अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहेत. ही व्यक्ती परदेशात स्थायिक आहे, परदेशी नागरिक आहे. चित्र झूम करून पहा. 

 आता थोडक्यात भाग्यरेषा काय काय दर्शविते ते बघू,
 १) भाग्यरेषेची सुरुवात: ह्यावरून व्यक्ती स्वकर्तृत्व करून पैसे मिळवणार कि वडिलार्जित व्यवसाय करून जगणार हे कळते. 
२) भाग्य रेषेची लांबी ही कर्तृत्वाचा काळ दर्शविते. ज्यावेळी भाग्यरेषा बोटाच्या मुळापर्यंत जाते तेव्हा ती व्यक्ती वयाच्या ८० -९० व्या वर्षापर्यंत कार्यरत असते. 
३) भाग्यरेषेला समांतर पण न छेदणाऱ्या रेषा इतर मार्गाने येणारे उत्पन्न व धन दर्शवितात. 
४) भाग्यरेषेला कट करणाऱ्या रेषा खर्च दर्शवितात. 
५) भाग्यरेषेवरील त्रिकोण दुधात साखर असल्यासारखे पैसे कमावण्याचा अधिक अनुकूल काळ दर्शवितात. 
६) भाग्यरेषेला वर जाणारा फाटा किंवा अनेक फाटे असल्यास तो योग पैसे द्विगुणित त्रिगुणित करणारा योग असतो. 
७) भाग्यरेषेला व्यत्यय किंवा छेद असेल तर उपजीविकेचा मार्ग बंद होऊन परत सुरु होतो. 
८) हातावर भाग्यरेषा नसेल तर तो माणूस कंगाल असतो असे नाही. पण तो कर्तृत्वहीन असतो. मोठ्या श्रीमंत घरात जन्मलेल्या व्यक्तीच्या हातावर कधी कधी भाग्यरेषा दिसून येत नाही. कारण धन असते ते नुसते ऐश आणि आरामासाठी वापरले जात असते. त्यात वाढ करायची वृत्ती दिसून येत नाही. 

तर अशी आहे भाग्यरेषा. हिचे बरेच बारकावे आहेत. 

केस-२ 
 दोन्ही हात पहिले असता व दोन्हीवर भाग्यरेषा सारख्याच प्रकारची असेल तर आर्थिक यश येण्याची खात्री पक्की होते. बऱ्याचदा एक व्यक्ती युरोपमध्ये बसून लाखो रुपये छापत असते आणि तेच शिक्षण, तोच अनुभव असलेली व्यक्ती मात्र एखाद्या खेड्यात तितकेच कष्ट घेऊन काही हजार कमावू शकते त्यातला हा प्रकार आहे. 

भाग्यरेषेच्या बाबत व्यक्तीची पार्श्वभूमीही पाहावी लागते.
 ह्या व्यक्तीच्या बाबतीत ह्याचे उत्तम सेव्हिंग झाले आहे, दुसरा जोड व्यवसाय करण्यासारखी स्थिती दिसत आहे, पण तसे वास्तवात नाही. याने त्याची सर्व संपत्ती पत्नीच्या नावे केलीये आणि ती संपत्ती ती मुलांसाठी वापरणार आहे. त्यामुळे तो ती संपत्ती स्वतःच्या मर्जीने वापरू शकत नाही. भाग्यरेषा १ व २ मध्ये अंतर आहे. त्याच जर एकत्र मिळाल्या असत्या तर संपत्ती तो वापरू शकला असता. 

तर असा हा भाग्यरेषेचा खेळ आहे. कोण लिहून ठेवते. कधी लिहून ठेवते. कोणास ठाऊक!!









No comments:

Post a Comment