Tuesday, 20 September 2016

कालसर्पयोग असतो कि राव

प्रत्येक माणूस अनुभवातून शिकत असतो. तसेच माझेही चाललेले असते. मीही गेल्या आठवड्यात अशाच एका अनुभवातून शिकलो. 

त्याचे काय झाले ते सांगतो, मी माझ्या आधीच्या एका लेखात कालसर्प योग हे थोतांड आहे असे ठासून सांगितले होते पण ते चुकीचे असावे असा अनुभव मला आला त्याविषयी हा लेख. 

साधारण ९ महिन्यापूर्वी उत्तरांचल वरून एका महिलेचा फोन आला. (नाव इथे देत नाही) साधारण सुशिक्षित व विवाहित महिला आहे. तिची तोवर ७ बाळंतपणे झाली होती. बहुतेक मुली जन्माला आल्या पण एकही मूल ६ महिन्यापेक्षा जास्त जगले नाही. वेगवेगळ्या कारणांनी व अगदी गर्भातच आणि ६ महिने मोठी होऊन सगळी अपत्ये देवाघरी गेली. तिने नाना उपाय केले होते पण काही साध्य झाले नव्हते. मी लगेच प्रश्नकुंडली मांडली. त्यावरून थोडीफार अनुकूल वेळ बघून तोवर तिला काही उपाय करायला सांगितले. (उपाय हे फक्त वेळ काढण्यासाठी असतात असे प्रगत ज्योतिषांचे मत आहे पण मी सध्या त्या वादात पडत नाही असो). मग चान्स घ्यावा असे सांगितले. खरेतर असे चान्स घ्यायला सांगणे म्हणजे एक कायदेशीर महाचूक आहे कारण आधी तिचे बहुधा २-३ सीझर झालेले होते आता परत हे नवीन कांड करायला लावायचे म्हणजे एक अत्याचारच होता व तो करून घ्या म्हणून सांगणे हेही तितकेच चुकीचे होते, पण ती महिला मातृत्वाला आसुसलेली एक माता होती. आपला समाज संतानहीन स्त्रीला स्वीकारत नाही हे दुर्दैव आहे आणि नेमका तोच प्रश्न तिला अगदी सतावत होता. मी ते सगळे समजावण्याचा प्रयत्न केला पण ते व्यर्थ होते. शेवटी काय ते मी तिला सांगितले. हे सगळे करण्यासाठी मी एक रुपयाही तिच्याकडून आजवर घेतला नाही उलट वेळोवेळी स्वतः फोन करून कसे काय आहे हे विचारात राहिलो. 

साधारण तिचे गर्भारपणाचे ५ महिने उलटले असावेत. तेव्हा एका हेल्थ कॅम्प मध्ये तिने चेक केले तेव्हा डॉक्टरांनी तिचे रक्त लवकर गोठते असे सांगून निदान करून काही उपाय केले. तेही त्या महिलेने मला लगेच सांगितले. अर्थात मला ते पटले नाही कारण तिचे एक मूल ६ महिन्याचे होऊन दगावले होते त्याचा गर्भात रक्त गोठण्याचा काहीच संबंध नव्हता, कारण ते मूल छातीत पाणी झाल्याने गेले होते. उत्तर भारतात थंडी भयंकर असते तेव्हा छातीत कफ व पाणी होऊन मृत्यू होणे हे बरेचदा होते हा माझा विचाराचा मुद्दा होता. असो डॉक्टर आणि ज्योतिषी अशी तुलना सगळीकडे होती म्हणून हे लिहिले... 

नंतर त्या मातेचा फोन आला, जेव्हा डॉक्टरांनी सांगितले कि १ महिना आधी सीझर करावे लागेल तेव्हा. चांगली वेळ कुठली हा तिचा सामान्य प्रश्न होता. मी २-३ वेळा दिल्या, पण त्याप्रमाणे काहीच झाले नाही. आपल्या देशात जन्माला आणायची आणि मेल्यावर जाळायची प्रचंड घाई असते. नंतर पुढे ९ सप्टें २०१६ रात्री ११.१८ मिनिटांनी डॉक्टरांनी मूल बाहेर काढले. त्याची जन्मपत्रिका खाली दिलेली आहे.



वरील चित्रात त्या बिचार्या मुलाच्या कुंडलीत खालचा भाग अगदी महान ग्रहांनी खचाखच भरलाय पण वरचा भाग अगदी रिकामा आणि शुष्क आहे. तिथे एकटाच हर्षल राहिलाय, तोही खूप लांब आहे म्हणजे परिणाम इतके प्रभावी देत नाहीये. 
आणि विशेष म्हणजे राहू-केतू बघा. दोघेही १८ अंशावर आहेत. सगळे ग्रह त्यांच्यापेक्षा पुढे आहेत. म्हणजे राहू-केतूने सगळ्यांना एका बाजूला अडकवून ठेवले आहे. म्हणजे ह्यालाच कालसर्प योग म्हणतात हो भाऊ, ह्या सर्पाचे नाव आहे शंखपाल कालसर्प. गुगल करा. भरपूर साहित्य मिळेल. असो आता आपण पुढे जाऊ. 

तर झाले काय कि ७ बहिणींच्या पाठीवर हा कृष्ण, कान्हा जन्माला आलाय तो ह्या कालिया नागाच्या विळख्यात सापडला आहे. कालच त्याच्या आईने सांगितले कि त्याला उलट्या होताहेत. नतंर ती माता चक्क बेशुद्ध झाली. होणारच. आता दोघेही आयसीयु मध्ये आहेत. माझी फोनाफोनी झाली. डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत असणार.... पण हा कान्हा जगणार का? मला तर वाटते आहे कि नक्कीच जगणार. लगेच मी प्रश्नकुंडली मांडली आणि मला निर्णय मिळाला कि हा कृष्ण-कन्हैय्या जगणार आणि मोठा होणार... आता बघूया काळसर्पाला (कालियाला) तो मारतोय का हे.. नाहीतर आपले आहे ते रोजचे चालूच राहणार!!

त्या कृष्ण कन्हैयाचे पुढे काय काय होणार हे मी ह्याच लेखात टाकणार आहे... 

आजच कृष्ण कान्हैयांच्या आजोबांना (आईचे वडील) फोन लागला, दोघेही सुखरूप आहेत, धोका टाळलाय. आनंदाची बातमी म्हणजे उद्या घरी परतणार आहेत. आता पुढे काही अडचणी येऊ नयेत यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. एकंदर हे मुल कालसार्पला गिळणार असेच वाटते आहे. 
 
आज ३/१०/२०१६ ला त्याच्या आजोबांचा परत फोन आलेला. "पंडितजी प्रणाम" आता काय झाले असेल म्हणून मी हादरलोच. लगेच विचारले "लडका कैसे है?" ते म्हणाले "पंडितजी आपकी कृपा से बहुत बढिया है, माँ और बेटा बिलकुल तंदुरुस्त हो गये है" एकदाचा जीव भांड्यात पडला. मग आजोबाच बोलायला लागले. "ऊं क्या हैं ना कि हमरा बडा लडका मतलब xxx जी (त्यांची मुलगी व कन्हैयाची आई) का बडा भाई, वह बहुत पढालींखा है, एलएलबी किये है, लेकिन नौकरी नही मिल रही है, कुछ देखिये ना पंडितजी" मी जन्मतारीख वेळ ठिकाण लिहून घेतले आणि कामाला लागतो. मामाची कुंडली मांडली शिवाय प्रश्न विचारला होता तेव्हाची प्रश्नकुंडली मंडळी. प्रश्नकुंडलीत बिचारा मामा सापडला कालसर्पाच्या तडाख्यात. आता कसे सोडवावे काय करावे हा विचार करत होतो. 
 
अचानक आठवले कि महाराष्ट्रातील एका नामांकित पंचांगात कालसर्प योग झूट असतो, ते थोतांड आहे इत्यादी इत्यादी लिहिलेले होते. आणि परत विचाराची चक्रे सुरु झाली.



No comments:

Post a Comment