Saturday, 14 November 2015

पुस्तकविक्री आणि जातीय विभागणी

जसा एकेकाळी पौरीहीत्य हा नावाजलेला व्यवसाय होता तसा आता पुस्तके लिहिणे आणि विकणे हा व्यवसाय झालेला आहे. पुस्तकांचे वेड सुमारे २०० वर्षात आपल्या समाजाला लावले गेले. पूर्वी पुस्तकातून ज्ञान येत नव्हते, ते मुखोद्गत असे. जे लहानपणी किवा दिवस रात्र आपण पाठ करतो ते आपल्या मनावर इतके चिकटते कि झोपेतही आपण ते सांगू शकतो. जे शिकायचे वय असते तेव्हाच हे शिकले जाते. नंतर पुस्तकांची मदत घ्यावी लागते. 
force = mass x acceleration, 
energy = mass x (velocity of light) square.
DNA variations = time of existence. 
Natural frequency = root(mass/stiffness)
ज्या घरात आपण राहतो ते घर भूकंपात तग धरू शकते का? हा सिद्धांत आपले घर कसे हादरते व कसे पडते  ह्याला कारणीभूत आहे. उंच टोलेजंग इमारती गुजरातेत बांधल्या आणि त्या भूजच्या भूकंपात पडल्या व असंख्य लोकांना गारद केले गेले, नेपाळमध्ये तेच झाले. आधीही भूकंप होत होते. पण चोरांची घरे दुमजली होती आणि सामान्य लोकांची घरे एकमजली होती. तेव्हा मेले ते चोर मेले. सामान्य मेले नाहीत, कारण त्यांची घरे कुडाची, आणि लाकडाची होती. लातूर, भूज ह्या भूकंपानंतर तिथे मी स्वतः काम केले आहे आणि डोळ्याने बघितले आहे कि परमेश्वराची काठी कशी चालते, तिचा आवाजही येत नाही. मोठमोठे इमले, वाडे आणि बंगले  कोसळले तेव्हा सामान्य लोक तिथे आमच्या आधी येउन त्यांचे लुटलेले सोने शोधून शोधून घेऊन जात होते.
असे अनेक आधुनिक सिद्धांत आम्ही शिकलो आहोत. भूकंपात मरणारे  पापी आणि पुण्यवान वेगळे कसे हे प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांनी पाहता तेव्हाच तुम्हाला ते कळू शकते. समस्त मानव दुसऱ्या जीवाला लुटताना कसलाच विधीनिषेध पाळत नाही. त्यात तो आपल्या जगण्याच्या लढ्यात सृष्टीला सुद्धा सोडत नाही. 
नंतर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही. 
आपण आता मूळ विषयाकडे  वळूया 
सध्या पुस्तकविक्री जोरात करण्यासाठी लोकांनी २ सिद्धांत  बनवले आहेत, ते असे,
१) सवर्ण हे वैदिक आणि बहुजन हे अवैदिक,
२) आर्य हे देव आणि अनार्य हे असुर. 
हे दोन्हीही सिद्धांत कसे फोल आहेत हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल, 
ज्योतिष्य शास्त्रानुसार मानवाचे खालील चार प्रकार बनतात,
सवर्ण म्हणजे ब्राम्हण, आपल्या प्रथा जपणारे कट्टरवादी, त्यांची सहनशक्ती अतिशय अल्प असते, हा त्यांचा दुर्गुण. जेव्हा विश्वामित्राने कर्णाला शाप दिला तेव्हा त्याने हेच सांगितले होते. त्यांची संख्या समाजात आज किती राहिली आहे तर फारफार ३ %. 
त्यानंतर क्षत्रिय वर्णाचा नंबर लागतो, तो थोडा संयमी आहे पण तोही फार सहनशक्ती बाळगत नाही. आपल्या देशात  बंडाळी करणाऱ्या लोकांचा इतिहास तपासला तर त्यांची सहनशक्ती कशी संपली हे वाचकांना नक्कीच लक्षात येईल. 
वैश्य हे तिसरे जातिवंत सहनशील पण  संधी साधून आपला माल विकून मोकळे होतात. 
शुद्र हे पिढीजात सहनशील, त्यांना कसेही रेटा, हाणा, मारा पण ते  सेवाच करत राहणार. 
म्हणजे ह्यातील ब्राम्हण, अर्धे साधन क्षत्रिय, ह्यान्ना सोडून बाकी राहिलेले लोक ह्यांना बहुजन आणि असुर (राक्षस) म्हणायचे. कारण ह्यांची संख्या समाजात ९७% आहे, त्यांची सहानुभूती मिळवून आपली पुस्तके विकायची असल्या घाणेरड्या युक्त्या हे लोक करतात. शिवाय ह्यांच्या विचारात काही तथ्य आहे का हे शोधण्यासाठी राहिलेले ३% ह्यांची पुस्तके वाचतात असा हा १००% ग्राहक गळाला लावायचा धंदा लोक करत आहेत. 
एकवेळ निरीश्वरवादी परवडले पण आपले आत्मघातकी लांडगे किती घाणेरडी कामे करतात ते पहा,
आपलेच काही लोक वैदिक अवैदिक वाद उकरून काढतात, देव-असुर वाद असे माहित नसलेले विषय काढून लिखाण करतात. हे लोक नरकासुर, टिपू सुलतान आणि पेरीस हल्ला हा गरम विषय असल्याने हिरहिरीने त्यावार लिहित आहेत. 
पुढे हेच लोक टिपू सुलतानाची पाठराखण करीत आहेत, हीही त्यांना  काहीच गरज नव्हती. पण आपण अति हुशार असे समजून काहीतरी लिहायचे, त्याचा सर्वांनी शक्य त्या प्रकारे निषेध करावा. टिपू सुलतान हा अतिशय क्रूर, कपटी, हिंदूद्वेष्टा राज्यकर्ता होता हे सुर्याइतके स्पष्ट आहे त्यामुळे त्याची पाठराखण करणे म्हणजे इसीस, तालिबान ह्यांची पाठराखण करण्यासारखे होईल.  
हे कमी झाले म्हणून हे लोक पेरीस मध्ये झालेल्या हल्ल्याला हिंदूंना दोष देत आहेत. ते अमेरिकेला देतच आहे, पण ते त्यानच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत, जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा भारतात परकीयांचे अनन्वित अत्याचार चालू होते. त्यावेळी जे अतिरेकी काम चालले होते त्याला अमेरिका कारणीभूत होती का? इस्लाम्वाद्यांनी हिंदुस्तान वर आक्रमण करून हजारो वर्षे लुट केली त्याला बायबलचा पहिला करार, पलेस्ताइन इस्राईल वाद कारणीभूत आहे असे हे लोक सांगतात. आहे कि नाही हास्यास्पद. हिंदू हे करार करायला गेले होते का? मग त्यांना ह्यात ओढून का आणले जात आहे? हिंदूंनी इस्लामी आक्रमकांना इथे बोलावले नव्हते, इंग्रजांनाहि कधी आम्ही इथे बोलावले नव्हते. इथल्या मातीची सुबत्ता पाहून ते इथे आले, त्यांनी "घी बघितले पण बडगा बघितला नाही" . कुठे ह्यांचे वाद आणि कुठे हिंदुंवर झालेले अत्याचार! काहीही संबंध नाही. फक्त प्रसिद्धी लोलुप, आणि संधिसाधू वृत्तीने काहीतरी लिहायचे आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे. जे आज दुसर्याचा घरात झाले आहे ते पूर्वी अपल्या घरात झालेले होते, व पुढे होणार आहे याचा विचार न करता हे लोक इसीस तालिबान आणि तत्सम दहशतवादी संघटनांची वकिली करताहेत. टिपू सुलतानला महान ठरवत आहेत, अशा लोकांचा जाहीर धिक्कार!!
 

Thursday, 5 November 2015

जातीसंस्थाविरोधी ज्योतिषशास्त्र

जातीसंस्था शब्दाचा अर्थ जन्माधारित जातीसंस्था असाच आहे, हे मी आधीच सांगून लेखाची सुरुवात करतोय.
बरेच विद्वान ऋग्वेदाचे अर्थ/अन्वयार्थ काढून हिरहिरीने वैदिक लोक हे जन्माधारित वर्णव्यवस्थेचे कारक आहेत हे सांगत असतात. हे सगळे विद्वान एकतर पाश्चिमात्य इतिहास संशोधक किवा डॉ. आंबेडकरांचे साहित्य वापरून सगळे दाखले देत असतात. स्वतःचे असे त्यांचे काहीच नाही हे अगदी स्पष्ट होते. क्षत्रिय शब्द हा खेतीय/खतिय ह्या प्राकृत शब्दावरून आला हे वाचून हसू आल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्या खतीय शब्दाला काहीच अर्थ नाही, उलट क्षत्रिय शब्दाला क्षत: त्रायते इति क्षत्रिय हि साधी बाळबोध उत्पती आहे, पण त्यात खेत आणि खेती आली कुठून? उलट जे क्षत्रिय होते त्यांना शेती दिली गेली हे वास्तव आहे. क्षत्रिय वर्णाशिवाय कुठलाही समाज हा पंगु आहे, इतकेच काय गुनाधारित वर्ण आणि कर्म विभाजनाशिवाय समाज प्रगती आणि स्वरक्षण करू शकत नाही. साधी गोगलगायसुद्धा संकटकाळात पोटात पाय घालून घेते. आधी शेती करणारा हिंदू समाज ह्या गोगल गाइपेक्षा स्वरक्षणासाठी अधिक पंगु होता. मध्ययुगात इस ७०० ते १७०० ह्याकाळातही आपला समाज पंगूच होता हे इतिहास वाचून सिद्ध होते. असे का त्याची मुलभुत कारणे ह्यांचा विचार आपण करूया,
१) शेती उघड्या जमिनीवर असल्याने युद्धप्रसंगी तिचे रक्षण करणे अवघड नव्हे अशक्य होते. 
२) शेती करणारा समाज विस्तृत प्रदेशात पसरलेला असल्याने तो विखुरला होता, सीमावर्ती भागात एकत्र होणे शेतीच्या दृष्टीने अशक्य होते. 
३) पाण्याची धरणे, नद्या अडवून शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले जात होते. 
४) शेती व्यवसायात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नव्हते.
५) शेतिअधरित मानव हा अधिकाधिक शाकाहारी बनत चालला होता त्यामुळे हिंसा हा प्रकार शेती समाजाला निषिद्ध होता, 
अशी अनेक कारणे आहेत. 
पशुपालक मानव हा हिंसा करणारा असणार हे नक्की. नंतर हजारो शेती करण्याच्या नादात तो हिंसा विसरून गेला. इतकेच वेदपूर्व काळातील पुरावे पाहून सांगू शकतो. ऋग्वेदात सर्वात प्रथम वर्णांचा उल्लेख आढळतो. पण तो वेगळ्या शब्दांनी व्यक्त केला आहे. विशेषतः तिथे क्षत्रियाला राजन्य शब्द आलेला आहे. तसे पहिले तर राजन हा एक आदरवाचक शब्द आहे इतकेच. पण तूर्तास आपण राजन ह्या रजोगुणी म्हणून राजन्य म्हणूया. 
नंतर ऋग्वेदातच पुरुषसुक्त आलेले आहे, त्यात समाजरुपी पुरूषाचे अनुक्रमे शीर हे ब्राम्हण, हात हे क्षत्रिय, पोट हे वैश्य तर पाय हे शुद्र असे वर्णन आलेले आहे. पण ह्यात कुठेही हे चार वर्ण जन्माधारित आहेत असे म्हटलेले नाही. तर तो इतिहास्कारांचा काढीव अर्थ आहे. पुढे पुरुषसुक्त हे ऋग्वेदात नंतर घुसडले गेले असा तर्क विद्वान काढतात. ह्याचे कारण म्हणे चार वर्णांचा शब्दशः अर्थ पूर्वी ऋग्वेदात कुठेही येत नाही म्हणून. हेही आपण मान्य करूया. 
म्हणजे जन्माधारित वर्णवाद वाढवण्यासाठी पुरुषसुक्त बनवले गेले असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. आता आपण थोडे पुढे जाऊ, ज्योतिष्यशास्त्र भारतीय लोकांना पूर्वी माहीतच नव्हते असे विद्वान समजतात. ते अलेक्झांडर ह्याच्या आक्रमणानंतर ग्रीकांनी भारतात आणले असे विद्वान मानतात. ज्योतिष्यशास्त्राचे जनक वराहमिहिर ह्यांचा काळ इस ५०० ते ६०० असा सांगितला जातो. म्हणजे पुरुषसुक्त समजा ह्याच काळात जरी घुसडले गेले असे मानले तरी न ज्योतिष्यशास्त्र जन्माधारित वर्णांचा पुरस्कार करते न पुरुषसुक्त. 
ज्योतिष्यशास्त्राप्रमाणे दर २ तासाच्या अंतराने जन्माला आलेल्या व्यक्तीचा वर्ण वेगळा असतो. तो सर्वस्वी आकाशातील ग्रह तारे व नक्षत्र ह्यांच्यातील चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतो. म्हणजे ज्योतिष्य शास्त्र जन्माधारित वर्ण व्यवस्थेला मोठा सुरुंग लावणारे आहे. तसेच पुरुषसुक्त फक्त एका सर्वांग आणि मजबूत समाज संस्थेचे वर्णनमात्र आहे.

आता विचार करा कि ह्या समाजात सर्वात वरचे स्थान प्राप्त झालेल्या ब्राम्हणांना पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य ह्यांचा उदो उदो करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा होता का? पण तरीही त्यांनी तो मूर्खपणा केलाच. इतकेच नव्हे तर बरेच ज्ञान शोधणारे आपले पूर्वज हे नुसते ब्राम्हण नव्हते. तेसुद्धा त्याकाळातील पुरोगामी होते. बहुजनांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पुरातन जन्माधारित प्रथा चालूच ठेवल्या. शेवटी पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य सांगणारे हारले आणि नाईलाजास्तव त्यांनीही जन्माधारित जाती-वर्ण ह्यांना होकार दिला, अजूनही आपल्या समाजात गुनाधारित कर्म व्यवस्था येत नाही तोवर आपला समाज पंगूच राहणार आहे. बाकी सगळ्या वल्गना आहेत.