प्रश्नकुंडली विषयावर आपण गेल्या लेखात चर्चा केली. त्याच विषयी आणखी काही माहिती देत आहे.
१) प्रश्नशास्त्र हे अजब शास्त्र आहे, माणूस प्रयत्न करूनही ज्यावेळी हरतो आणि हताश होतो तेव्हा देवाला/दैवाला विचारतो कि माझे काय चुकले? मला कशाची शिक्षा मिळत आहे? हा तो नेमका क्षण/ वेळ असते जी प्रश्नकुंडलीसाठी फार महत्वाची असते.
अर्थात दरवेळी व्यक्ती हताश किवा हरलेली असायला हवी असा नियम नाही. हताश होणे/हार मानणे हे अप्पर लिमिट आहे. व्यक्ती प्रश्न विचारताना गंभीर हवी हा यामागील मतितार्थ आहे इतकेच. समोर ज्योतिषी दिसला मग गम्मत म्हणून प्रश्न केला असेही लोक करतात. तोवर प्रश्न नीट तयार झालेला नसतो. एखादा प्रश्न तयार होण्यास कालावधी लागतो. मुलगी २१ वर्षांची झाली, शिक्षण घेत आहे, २६ व्या वर्षी आता नोकरी करत, तरीही लग्न ठरत नाही. वय वर्षे ३२ लाही जर लग्नाचाच प्रश्न असेल तर तो प्रश्न व्यवस्थितरित्या मनात गुंता करून राहिलेला असतो. आणि असा प्रश्न विचारण्यायोग्य असतो. असे अनुभव आपण इतर अनेक प्रश्नांचा बाबत घेऊ शकता. नोकरीतील बदल, परदेशगमन, आजारपण याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यायोग्य होतो तेव्हाच विचारणे गरजेचे असते.
२) सर्वात पहिल्यांदा पाहिलेला प्रश्न हा जास्त परिणामकारक उत्तरे देतो. कारण आपण हा आपल्या नियतीशी-दैवाशी संवाद साधत असतो. तुमची अडचण व आकांत बघून नियती अशावेळी जास्तीत जास्त अचूक उत्तर द्यायचा प्रयत्न करते. कधीकधी जातकाला मिळालेले उत्तर पटलेले नसते मग तो परत परत प्रश्न विचारून काही चांगले उत्तर मिळते का याचा प्रयत्न करतो.
इथे एक महत्वाचे समजून घेतले पाहिजे, तुम्ही एखादा सस्पेंस किवा कॉमेडी चित्रपट पाहता तेव्हा पहिल्यांदा पाहत असताना जी उत्कंठा असते ती दुसर्यांदा पाहताना शिल्लक राहत नाही, तसेच थोडेफार हेही आहे. म्हणून एखाद्या विषयावरील सर्वात प्रथम जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा असतो. नंतर त्यावर कितीही प्रश्न विचारले तरी ते वेगळे निष्कर्ष दर्शवितात. जो अतिविद्वान ज्योतिषी आहे तो पुढच्या प्रश्नात काय दडले आहे हेही सांगू शकतो. पण असे लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहे. अशावेळी आपण पहिल्यांदा ज्या ज्योतिष्याला भेटलो ती तारीख व वेळ नोंद करून ठेवावेत. म्हणजे समजा त्या ज्योतीश्याकडून तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर दुसर्या ज्योतिष्याला तुम्ही विचारू शकता. प्रश्न तोच राहतो वेळही तीच राहते.. वाटल्यास आपल्या ज्योतिष्याला तो जर परत प्रश्नकुंडली मांडण्यास तयार असेल ती काढावयास लावावी.
३) ज्योतिष्याची जबाबदारी: