Saturday, 14 October 2017

हस्तरेषा - एक संशोधन

मानवाची उत्क्रांती:"मानवाच्या उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या. एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. दुसरे म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे 'काही शब्द' आणि नंतर 'भाषा' निर्माण झाली व तिसरे म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली."
हाताचा आकार: मानवी हाताचा आणि मेंदूचा घनिष्ट संबंध आहे हे शास्त्रीय सत्य आहे. पृथ्वीवर माणूस वेगवेगळ्या परीस्थितीत उत्क्रांत झाला. काही मानव जंगलात वृक्षाच्या आधाराने उत्क्रांत झाले तर काही सपाट वाळवंटी प्रदेशात उत्क्रांत झाले. दोन्हीकडे स्वतःच्या जीवाचे रक्षण करणे हे सर्वात महत्वाचे होते. जे मानव वृक्षाच्या आधाराने उत्क्रांत झाले त्यांचे हात हे झाडावर चढण्यास व त्याद्वारे स्वतःचा बचाव करून घेण्यास अधिक बलवान ओबडधोबड व बोटे मोठी असलेले असे झाले. तर जे मानव सपाट प्रदेशात उत्क्रांत झाले त्यांचे हात लहान नाजूक, बोटे आखूड असे उत्क्रांत झाले. झाडावर स्वतःचा बचाव करून घेणे सोपे असल्याने ह्या वर्गातील मानवांची बुद्धीमत्ता हि मध्यम दर्जाची अशी असते. सपाट प्रदेशात उत्क्रांत झालेले लोक स्वतःचा बचाव करणारे व लहान हाताचे पण अधिक चतुर प्रकारचे लोक आहेत.
अर्थात नन्तर पुढे लाखो पिढ्यात एकमेकांच्या जनुकांचे मिश्रण झाल्याने पूर्ण लांब किवा पूर्ण आखूड हात अभावानेच पाहायला मिळतो. बरेच हात हे यातील या दोन टोकाच्या प्रकारांपैकी मधल्या प्रकारचे असतात. तरीही पूर्ण लांब व पूर्ण आखूड हात असलेल्या लोकांच्यात त्यांच्या बुद्धीत व सांपत्तिक स्थितीत ठळक वेगळेपणा पाहायला मिळतोच.
अंगठा: कोणतेही काम करताना किवा वस्तू उचलताना चार बोटे एकीकडे तर एकट अंगठा एकीकडे हि स्थिती असते. ह्याचा अर्थ अंगठ्याचे महत्व चार बोटांइतके आहे. अंगठ्याच्या आकारावरून माणसाच्या विचारांची आणि बुद्धीची कल्पना येते. लांब अंगठा हा प्रगल्भ विचार दर्शवितो. तसेच फार जाड बाकदार अंगठा हा कष्ट करणाऱ्या माणसाचा असतो. फार लांब अंगठा असलेला माणूस हा मात्र संकटांचा सामना करण्यास असमर्थ असतो. 


हाताची बोटे: हाताच्या बोटांचे सुद्धा अनुवान्शिकीय महत्व आहे. बोटे आणि तळवा ह्यांचा परस्पर आकाराच्या गुणोत्तराचे महत्व तर आहेच आहे. तसेच बोटांची कमी अधिक लांबी हीसुद्धा महत्वाची आहे. मधले बोट लांब असणारी व्यक्ती हे स्थिर वातावरणात उत्क्रांत झालेली असते. तर बोटांची लांबी समान आकाराची असणारे लोक हे अस्थिर वातावरणात उत्क्रांत झालेले असे आहेत. बोटाच्या लंबित विषमता असणारे लोक हे शांतताप्रिय, कलाप्रेमी असतात.
बोटांची लांबी सारखी असणारे लोक अधिक आक्रमक व कला इत्यादी क्षेत्रात थोडे मागास असतात पण व्यावहारिक बाबीत मात्र हुशार असतात. 

हातावरील रेषा:  माणूस जेव्हा मुठ वळतो तेव्हा हाताच्या रेषा निर्माण व्हायला लागतात. आयुष्यरेषा (life line) हि मुख्यता अंगठ्याच्या हालचालीमुळे निर्माण होते. आयुष्यरेषा हि शुक्राच्या (सेक्स) क्षेत्राजवळ असल्याने जगण्याची प्रेरणा सेक्सशी संबंधित असल्याचे दर्शविते. मस्तिष्करेषा (head line) (म्हणजे बुद्धी) व व हृदयरेषा (heart Line) (म्हणजे समाधान व शांतता) ह्या अंगठा व चार बोटे यांच्या एकत्रित उपयोगाने निर्माण होते. हि चार बोटे जितकी एकत्रित काम करतात तितक्या मस्तिष्क व हृदयरेषा जास्त लांब बनतात. गुरु (तर्जनी), शनी (मध्यमा), रवी (अनामिका) व बुध (करांगुली) यांच्या कमीअधिक प्रयोगाने मस्तिष्क व हृदय रेषा कमीअधिक लांब बनतात. 
भाग्यरेषा (fate line) ही चंद्राचे क्षेत्र (म्हणजे प्रतिभा) उन्नत असल्याने बनते. 
काही सामान्य नियम: डावा हात हा नेहमी तुमचे आई वडिलांवर अवलंबून असलेले आयुष्य दर्शवितो. डाव्या बाजूला मानवाचे हृदय असल्याने नेहमीच तो डावी बाजू मागे ठेऊन उजव्या बाजूला पुढे करतो. त्यामुळे डावा हात आहे ती स्थिती स्वीकारणे व उजवा हात स्थितीत बदल घडविणे यांचे निर्देशक ठरतात. उजवा हात पूर्वीचे आयुष्य व नंतर तुम्ही घडवलेले बदल दर्शवितो. दोन्ही हातात साम्य असणारे लोक सुखी असतात. दोन्ही हातात फरक असणारे लोक हे खूप कष्ट करून यशप्राप्ती करणारे असतात. 
बरेचदा वय १८ ते २७ पर्यंत हातावरील रेषा विकसित होत असतात. एका ठराविक टप्प्याला हि प्रक्रिया थांबते. 
विवाह, संतती, भावंडे, शिक्षण ह्या रेषा अनुवांशिक गुण दर्शवितात. आई-वडील व मुले यांच्या रेषात साम्य असते. 


याशिवाय हातावर असंख्य लहान लहान चिन्हे असतात, ती येतात पुढे नष्ट सुद्धा होतात. त्यांचे महत्व काय हे इतरत्र पाहू.
धन्यवाद!!

No comments:

Post a Comment