प्रत्येकाला आपल्या वंशाचा, त्यांच्या इतिहासाचा, पूर्वजांचा खूप अभिमान असतो. माणूस आपल्या शक्ती भूतकाळात शोधत असतो. माझ्या पूर्वजांनी हे केले ते केले हे आपण जोरात सांगत असतो. हे सांगतानाही आपण इतके हिंसक का होतो?
हिंसा आणि अहिंसा ह्यात काय चांगले ह्या वादात मी तूर्तास पडत नाही. फाशीची शिक्षा ही एक हिंसाच आहे, ही हिंसा करायला समाज का प्रवृत्त होतो ह्याची कारणे महत्वाची आहेत. तोही विषय तूर्तास बाजूला ठेऊ.
आपला समाज एका मोठ्या बदलातून पुढे जात आहे हे आधी समजून घेणे महत्वाचे आहे. आपली १०० ते ११०० वर्षापूर्वीची पिढी ही मोठी गुलामगिरी भोगत होती. ह्या गुलामगिरीत समाजव्यवस्था पूर्ण भरडली गेलेली होती. अगदी साधे साधे मुद्दे विचारात घेतले तर सुरुवातीस परकीय आक्रमणांच्या काळात,
१) गोमांस खाणे/ न खाणे,
२) मूर्तीपूजा,
३) एकपत्नी प्रथा,
४) एकेश्वरवाद
वंशवाद आणि जाती : इत्यादी मुद्द्यांचा आधार घेत आपल्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक लुट करण्यात आली. ही लुट होत असताना समाजाचा जो पुरुष वर्ग असतो तोच सगळ्याला जबाबदार असल्यामुळे त्यावर काही मानसिक आघात होत होते. त्या आघातामुळे तो एकप्रकारे अतिरेकी विचार करू लागला होता. हे अतिरेकी विचार करणे पूर्णतः नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहेत. फाईट ऑर फ्लाईट (म्हणजे लढा किवा पळून जा) ह्या मानसिक अवस्थेत माणूस विचित्र मानसिक आघात झेलत असतो. आजही मुस्लिम राष्ट्रात अमेरिकेच्या दादागिरीबद्दल राग आहे तो याच कारणास्तव आहे. हा राग एकांगी असतो. समाज अशाच एकांगी प्रकारे घडत जात असतो. तसाच आपला समाज एकांगी पद्धतीने घडत गेला. भले आम्हाला आमच्या जातींच्या उच्च/नीचता चालतील पण आमच्या मूळ संकल्पांना हात लागता कामा नये असा विचार जुन्या समाजाने स्वीकारला. त्यातून जातीव्यवस्था जन्माला आली आणि मूळ धरू लागली.
७०० ते ८०० वर्षापूर्वी दळणवळणाची साधने अत्यल्प होती, त्यामुळे परकीय अक्रमने रोजच्या रोज होत होती असे नाही. इतिहास तपासला तर अशी अक्रमने परदेशात मोठी शक्ती उदयाला आली कि फारतर ५०-१०० वर्षातून एखादे मोठे आक्रमण होत असे. पण ते इतके भयंकर असे कि समस्त समाज अशा आक्रमणासाठी तयार होऊन बसत असे. कोणी हत्यार घेऊन, कोणी पोथ्या घेऊन, तर कोणी कारागीर व सेवक म्हणून. ह्याच त्या आपल्या जाती!
बुद्धिबळाच्या खेळातील राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी हे आपले सैन्य, बाकी राहिले ते युद्ध न करू शकणारे सर्व. हे आम्ही आपपसात ठरवून घेतलेले होते.
तरीही शेतकरी समाजात वंशवाद एका वेगळ्या अर्थाने पुढे आला. चांगले बियाणे उत्तम पिक देते, चांगल्या दर्जाचा घोडा, बैल, शेळी, मेंढी इत्यादी चांगल्याच पिल्लांना जन्माला घालतात हे शेतकऱ्यांना समोर दिसत होते. हेच तत्व मानवाने स्वतःबद्दलही वापरले. काही राजकीय वंशांशी विवाहादी नाती जोपासणे हा त्यातीलच एक भाग होता.
हे सगळे होत होते ते फक्त सवर्ण लोकांत, सामान्य मागासवर्ग असले छंद कधी जोपासत नव्हता, किवा त्याला ह्याची गरजही नव्हती. पण ब्राम्हण क्षत्रीयादी वर्णांना हा मात्र आपली शक्ती वाढविण्यासाठी उत्तम वंशाशी नाते जोडणे गरजेचे होते. संकराचे शास्त्र इतके पुढारलेले नसले तरी सामान्यतः चांगल्या बीजातून उत्तम संतती जन्माला येते इथवर लोकांना कळू लागले होते.
मग इथूनच पुढे राजे-राजवाडे त्यांची मुले ह्यांची लग्ने करताना त्यांना उपवर मुलगा शोधताना वंशाचा विचार केला जाऊ लागला. उंचपुरा, राजबिंडा मुलगा नक्की त्याच्यासारखीच संतती देणार हि गृहीतके बनवली गेली. तसेच राजकीय घरातील मुलींचेसुद्धा झाले. तर अशी ही राजघराणी बनत गेली. हाच प्रकार राजाचे सरदार, सेनापती, सैनिक ह्यांनी पुढे चालू ठेवला.
पण जनुकीय शास्त्र मात्र ह्या सगळ्या गोष्टी मानत नाही. संपूर्ण पांढरी आई व वडील असलेल्या पिल्लाचे रंग तपकिरी, करडा किवा आणि काही विचित्र असू शकतो. कारण ह्याआधी जी क्रोमोसोम ची असंख्य वर्षे मिसळ-सरमिसळ चालली आहे ती ह्याला कारणीभूत आहे. पिल्लू जन्माला आले तर ते आई-बाबांपेक्षा काही बाबतीत उजवे असू शकते किवा काही बाबतीत त्यात कमतरता असू शकते. हे पूर्णतया नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे.
पण तरीही जेव्हा जेव्हा वंश वाद उफाळून आला तेव्हा आम्ही अमुक एका वंशाचे म्हणून श्रेष्ठ असे मानण्याशिवाय दुसरा पर्यायाच शिल्लक नव्हता.
विशेष म्हणजे हा वंशवाद जपण्यासाठी परदेशातून चांगल्या जाती मागवल्या गेल्या तेही काही वाईट नाही म्हणा . ह्यासंबंधी अनेक राजकीय दाखले वेळोवेळी मिळतात.
तर वंशवाद हा जातीयवादाचा एक भाग आहे. यथा राजा तथा प्रजा ह्या ऊक्तीप्रमाणे जे कारागीर वर्ग व सेवक होते त्यांना हि पुढे ह्या वंशवादाची लागण झाली.
तरीही शेतकरी समाजात वंशवाद एका वेगळ्या अर्थाने पुढे आला. चांगले बियाणे उत्तम पिक देते, चांगल्या दर्जाचा घोडा, बैल, शेळी, मेंढी इत्यादी चांगल्याच पिल्लांना जन्माला घालतात हे शेतकऱ्यांना समोर दिसत होते. हेच तत्व मानवाने स्वतःबद्दलही वापरले. काही राजकीय वंशांशी विवाहादी नाती जोपासणे हा त्यातीलच एक भाग होता.
हे सगळे होत होते ते फक्त सवर्ण लोकांत, सामान्य मागासवर्ग असले छंद कधी जोपासत नव्हता, किवा त्याला ह्याची गरजही नव्हती. पण ब्राम्हण क्षत्रीयादी वर्णांना हा मात्र आपली शक्ती वाढविण्यासाठी उत्तम वंशाशी नाते जोडणे गरजेचे होते. संकराचे शास्त्र इतके पुढारलेले नसले तरी सामान्यतः चांगल्या बीजातून उत्तम संतती जन्माला येते इथवर लोकांना कळू लागले होते.
मग इथूनच पुढे राजे-राजवाडे त्यांची मुले ह्यांची लग्ने करताना त्यांना उपवर मुलगा शोधताना वंशाचा विचार केला जाऊ लागला. उंचपुरा, राजबिंडा मुलगा नक्की त्याच्यासारखीच संतती देणार हि गृहीतके बनवली गेली. तसेच राजकीय घरातील मुलींचेसुद्धा झाले. तर अशी ही राजघराणी बनत गेली. हाच प्रकार राजाचे सरदार, सेनापती, सैनिक ह्यांनी पुढे चालू ठेवला.
पण जनुकीय शास्त्र मात्र ह्या सगळ्या गोष्टी मानत नाही. संपूर्ण पांढरी आई व वडील असलेल्या पिल्लाचे रंग तपकिरी, करडा किवा आणि काही विचित्र असू शकतो. कारण ह्याआधी जी क्रोमोसोम ची असंख्य वर्षे मिसळ-सरमिसळ चालली आहे ती ह्याला कारणीभूत आहे. पिल्लू जन्माला आले तर ते आई-बाबांपेक्षा काही बाबतीत उजवे असू शकते किवा काही बाबतीत त्यात कमतरता असू शकते. हे पूर्णतया नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे.
पण तरीही जेव्हा जेव्हा वंश वाद उफाळून आला तेव्हा आम्ही अमुक एका वंशाचे म्हणून श्रेष्ठ असे मानण्याशिवाय दुसरा पर्यायाच शिल्लक नव्हता.
विशेष म्हणजे हा वंशवाद जपण्यासाठी परदेशातून चांगल्या जाती मागवल्या गेल्या तेही काही वाईट नाही म्हणा . ह्यासंबंधी अनेक राजकीय दाखले वेळोवेळी मिळतात.
तर वंशवाद हा जातीयवादाचा एक भाग आहे. यथा राजा तथा प्रजा ह्या ऊक्तीप्रमाणे जे कारागीर वर्ग व सेवक होते त्यांना हि पुढे ह्या वंशवादाची लागण झाली.
एकास एक युद्धात शक्तिशाली पुरुष आवश्यक होता. म्हणून चांगली प्रजाती निर्माण करणे गरजेचे होते. पण हे होत असताना युद्धाची शस्त्रे, कुटनीती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सैनिकांची संख्या इत्यादीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. आपल्याकडून काही जातीचे आणि वंशाचेच लोक युद्ध करीत होते तसे आपल्या शत्रूचे नव्हते ते सगळेच लढत असत, आणि संख्या ही एकास एक युद्धात फार महत्वाची होती.
नुसते शरीर मोठे असून चालत नाही, मेंदूही तितकाच मोठा हवा. पण ह्या वंश आणि जातीयवादाच्या वेली आपल्याला इतके घट्ट जखडून टाकतात कि तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. समोर जो चेहरा दिसतो तो अमुक एक वंशाचा आहे म्हणून श्रेष्ठ असे मानून आपण गुमान जीवन जगतो. असे खरेच असते का?
नुसते शरीर मोठे असून चालत नाही, मेंदूही तितकाच मोठा हवा. पण ह्या वंश आणि जातीयवादाच्या वेली आपल्याला इतके घट्ट जखडून टाकतात कि तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. समोर जो चेहरा दिसतो तो अमुक एक वंशाचा आहे म्हणून श्रेष्ठ असे मानून आपण गुमान जीवन जगतो. असे खरेच असते का?