एका "क्ष" व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा आणि राशीकुंडलीचा अभ्यास करून धन कसे कमवायचे ह्याचा सल्ला इथे उदाहरणासहीत देत आहे. तर ह्या व्यक्तीची रास आहे धनु. शिवाय राशीस्वामी गुरु हा धनु ह्या स्वराशीला आहे. लाभात सूर्य उच्चीचा (मेषेचा) अशी पत्रिका असलेली हि व्यक्ती आहे. धनु हि रास जशी गुरुबळानुसार बलवान बनते तसेच रवीची गतीही ह्या राशीला फार महत्वाची असते. सध्या ह्या राशीला पाचवा (२-५-७-९-११ यापैकी एक) गुरु आहे, म्हणजे राशीला उत्तम गुरुबळ आहे. ह्या काळात उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
दुसरे म्हणजे ह्या राशीला साडेसाती चालू झालेली आहे. आता आपण गुरु शनि आणि रवि ह्यांचा एकत्र विचार ह्या पत्रिकेच्या बाबत करू.
१) गुरुबळ उत्तम म्हणून उत्तम आर्थिक लाभ,
२) रवी हा ह्या राशीला मकर संक्रांतीला धनस्थानात (म्हणजेच मकर राशीला) गेला. रवी हा पापग्रह असल्याने तो ३-६-१०-११ ह्याच स्थानात अनुकूल असतो म्हणून ह्या पत्रिकेला (तो दुसऱ्या स्थानात आल्याने) तो प्रतिकूल होता. नंतर तो कुंभ राशीला १५ फेब्रुवारीला गेला. म्हणजे तो राशीला तिसरा व अनुकूल झाला.
३) शनीची साडेसाती हि अडीच वर्षे एका टप्प्यात याप्रमाणे तीन टप्पे म्हणजे साडेसात वर्षे चालणार आहे.
४) ह्या व्यक्तीला राहू दशा चालू आहे. राहू अष्टमात असल्याने २०२० पर्यंत त्याची फळे म्हणजे आप्तस्वकीय ह्यांच्यापासून दूर जाणे, मित्र, जवळची माणसे नसणे, पैशासाठी लोक वाईट वागणे हि आहेत. हि दीर्घकालीन फळे आहेत.
तर ह्या व्यक्तीने काही आर्थिक गुंतवणूक केलेली होती. मकर राशीला रवी येणार म्हटल्यावर धनु राशीच्या लोकांनी सावध व्हायला हवे. नेमके तेच ह्या व्यक्तीने केले. त्याने जानेवारीच्या सुरुवातीला सगळी गुंतवणूक काढून घेतली. वरील चित्रात व्होटसअप मासेज (७ जानेवारीचा) दिलेला आहे. त्यात बँकेचा एजंट पुन्हा कधी गुंतवणूक करणार म्हणून विचारात आहे. तेव्हा ह्या व्यक्तीने फेब्रुवारीच्या मध्याला गुंतवणूक करणार म्हणून सांगितलेले दिसते.
ती गुंतवणूक वर दिलेल्या चित्राततल्या योजनेत केलेली होती. ह्या योजनेत दरमहा एका लाखाला ६५८ रुपये इतका करमुक्त लाभांश (डिव्हिडंड) मिळत होता. इतका लाभ बँकेत रक्कम दीर्घकालीन ठेव करूनही मिळत नाही. नेमका जानेवारी महिन्यात तो फक्त ०.०२ प्रती युनिट म्हणजे १६५ रुपये इतकाच मिळाला. त्यानंतरच्या महिन्यात (१५ जाने -१५ फेब्रु.) तो मिळालाच नाही. कारण मार्केट अगदीच कोसळले होते. आणि नेमका रवी मेष राशीला (म्हणजे ह्या व्यक्तीच्या राशीला ३रा) पूर्ण अंशात १३ फेब्रुवारीला आला तेव्हा मार्केट परत तेजीत आले. ह्या व्यक्तीने ह्याचा नेमका फायदा घेत फेब्रुवारीच्या शेवटी परत ह्याच योजनेत गुंतवणूक केली.
आता मार्केटने ७७७+४६०+३०० = अशी १५३७ अंशाची उडी घेतली आहे. जेव्ह्या ह्या व्यक्तीने योजनेचे युनिट्स विकत घेतले तेव्हा त्याची किंमत १२. १६ प्रती युनिट होती तीच आज १२.६० प्रती युनिट झाली आहे. म्हणजे एका लाखाची त्याला ८२२३ इतकी युनिट मिळाली, आणि प्रत्येकी १२. ६-१२.१६ = ०.४४ रुपये इतका आज रोजी फायदा झाला. म्हणजे लाखाला ३६१८ रुपये इतका फायदा झाला. शिवाय लाभांश मिळणार तो वेगळाच.
तर अशा प्रकारचे गुरुबळ, रवी शनीची चक्रे चालू असतात त्यातून आपला नेमका लाभ साधून घेण्यासाठी सावध असणे गरजेचे असते. मार्केट मध्ये मध्यम जोखीम असलेले व्यवहार करण्यास काहीच हरकत नसते. इतकेच कि अतिजोखीम असलेला सट्टा खेळू नये.
(टीप: वरील लेख हा उदाहरणासाठी दिलेला आहे, त्याच्या अनुषंगाने कोणी कुठे आणि कशी गुंतवणूक करावी व होणाऱ्या फायदा तोट्याला लेखक जबाबदार नाही)