ईश्वराचा साक्षात्कार
सृष्टीतील
दृश्य शक्ती म्हणजेच देव हि एक कल्पना प्रथम रूढ झाली. सूर्य, चंद्र,
समुद्र, वायू, पाऊस, नद्या हेच देव असावेत असे मानवाला वाटू लागले. पण
कधीकधी ह्या सृष्टीतील शक्ती ह्याच मानवाच्या जीवावर उठत असत. हा देव असा कसा ! त्याची किती स्तुती केली, धावा केला तरी तो कधी कोणासाठी हलत असे ना
येत जात असे. त्याला करायचे तेच काम तो करत असे. मग त्या शक्ती देव कशा असू
शकतील? पण प्रत्येक वेळी पराधीन मानवाला संकटकाळी कोणांतरी अज्ञात शक्तीचा
धावा करण्याचा शेवटचा मार्ग शिल्लक असतो, इथेच देव ह्या संकल्पनेची सुरुवात झाली. त्यावेळच्या
लोकजीवनाची कल्पना केली तर लक्षात येते कि त्या मानवाचे जीवन निसर्गाशी फार
सुसंगत होते. माणूस संख्येने फारच थोडा होता. त्यामुळे जीवन फारच शांत होते. रोजची आजारपणे, संघर्ष संकटे
क्वचित येत असत. पण जो अशा संकट काळी मदत करतो तोच परमेश्वर, हा माणसाचा विश्वास
धृढ होत होता. डोंगर हाच देव हीआदिम मानवाची सगळ्यात प्रथम कल्पना होती. डोंगरातच आदिम मानव लपून राहू शकत होता. डोंगरामुळे
एक निसर्गसंस्था निर्माण होत असते. तिथेच जीवन असते पाउस पडतो, वनस्पती
वाढतात, नद्या वाहतात.बरेच पर्वत हेच शिव (लिंगाकार) आहेत अशी संकल्पना तेव्हा अस्तित्वात आली असावी.
शिवलिंग म्हणजे पुरुष जननेन्द्रिय हा काहीसा अर्धवट विचार आहे. शिव ही संकल्पना मूलतः द्वीपकल्पीय भारतात निर्माण झाली. जिथे पर्जन्याचे महत्व वादातीत आहे. पाऊस प्रकट होण्यास पर्वतांचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणून पर्वत ह्या संकल्पनेचे पूजन करण्यास शिवलिंग हे स्वरूप वापरले गेले असावे. शिवलिंग व त्याबरोबर असलेली शाळुंका (खालील भाग) हे पर्वत व त्याचे टोक अशा स्वरुपात दिसतात.
पर्वत त्यातील गुहा ह्याच तात्कालिक मानवाला स्वताच्या जीवितासाठी अधिक जवळच्या होत्या. हा असा पर्वत व गुहा यांच्या आश्रयाला राहणारा सर्वात जुना मानवाचा पूर्वज होता. शिकार व शाकाहार हे सर्वात प्राचीन आद्य व्यवहार होते.
शिवलिंग म्हणजे पुरुष जननेन्द्रिय हा काहीसा अर्धवट विचार आहे. शिव ही संकल्पना मूलतः द्वीपकल्पीय भारतात निर्माण झाली. जिथे पर्जन्याचे महत्व वादातीत आहे. पाऊस प्रकट होण्यास पर्वतांचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणून पर्वत ह्या संकल्पनेचे पूजन करण्यास शिवलिंग हे स्वरूप वापरले गेले असावे. शिवलिंग व त्याबरोबर असलेली शाळुंका (खालील भाग) हे पर्वत व त्याचे टोक अशा स्वरुपात दिसतात.
पर्वत त्यातील गुहा ह्याच तात्कालिक मानवाला स्वताच्या जीवितासाठी अधिक जवळच्या होत्या. हा असा पर्वत व गुहा यांच्या आश्रयाला राहणारा सर्वात जुना मानवाचा पूर्वज होता. शिकार व शाकाहार हे सर्वात प्राचीन आद्य व्यवहार होते.
विचारांची सुरुवात
प्रत्येक प्रदेशात आपल्या परमेश्वराच्या वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्यात. त्यात शिव हे आदिदैवत आहे. आदिम आदिवासी सुद्धा शिवाला आदिदैवत मानतात. वेद्पुर्वी अनेक हजार वर्षे हा काळ बराच अंधारात राहिलेला काळ आहे. त्याकाळात प्रगल्भ अशी संस्कृती अस्तित्वात होती. शिवाने दिलेले ज्ञान हे आगम ग्रंथ ह्या स्वरुपात वेदांच्या पूर्वी अस्तित्वात होते. त्या ज्ञानापैकी एक असे वेद असावेत. जैन आणि श्रमण धर्म यांचीही पाळेमुळे आगम ग्रंथात आढळतात.
प्रत्येक प्रदेशात आपल्या परमेश्वराच्या वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्यात. त्यात शिव हे आदिदैवत आहे. आदिम आदिवासी सुद्धा शिवाला आदिदैवत मानतात. वेद्पुर्वी अनेक हजार वर्षे हा काळ बराच अंधारात राहिलेला काळ आहे. त्याकाळात प्रगल्भ अशी संस्कृती अस्तित्वात होती. शिवाने दिलेले ज्ञान हे आगम ग्रंथ ह्या स्वरुपात वेदांच्या पूर्वी अस्तित्वात होते. त्या ज्ञानापैकी एक असे वेद असावेत. जैन आणि श्रमण धर्म यांचीही पाळेमुळे आगम ग्रंथात आढळतात.
इसवी सन १९२०-३०च्या दशकात सिंधु
नदीच्या खोऱ्यात म्हणजे हल्लीच्या पाकिस्तानांतील मोहोंजोदरो आणि हरप्पा
येथे आणि भारत व पाकिस्तानात इतरत्रही दहा ठिकाणी उत्खनन करून इतिहास
संशोधकांनी ज्या 'सिंधुसंस्कृतीचा' शोध लावला ती संस्कृती कोणाची व कशी
होती ते आपण आता पाहू या. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 'हिंदू
धर्माची समीक्षा' या त्यांच्या ग्रंथात 'वेदपूर्व भारतीयांचा धर्म' या
शीर्षकाखाली दिलेली सिंधुसंस्कृतीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अनार्यांचे स्थान सिंधुसंस्कृती?
'वैदिक आर्याच्या पूर्वी हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या सुसंस्कृत
समाजांचा हा धर्म होय. या धर्मात व इजिप्त-इराकमधील पुरातन धर्मात तसेच
आशिया मायनर व भूमध्य समुद्रीय संस्कृतीमध्ये आणि तेथील
मानववंशामध्येसुद्धा फार मोठे साम्य आढळते. त्यांच्यात समुद्रमार्गे
दळणवळणही होते. ही आर्यपूर्व संस्कृती होय. इजिप्त, क्रीट व मेसापोटेमिया
येथील संस्कृतीमध्ये स्त्री व पुरुष वाचक शिव, विष्णू, काली यांच्याशी साधर्म्य असलेल्या देवता होत्या. तसेच त्या संस्कृतीमध्ये नागपूजा, लिंगपूजा, चंद्रपूजा, ग्रहपूजा,
पितृपूजा व मातृपूजासुद्धा आहेत. नाईल, युफ्रेडिस, तेग्रिस आणि सिंधु
नद्यांच्या तीरावर वाढलेल्या या प्राचीन संस्कृतीचा वारसा हिंदू समाजाकडे
अजूनही चालू आहे. हीच वेदपूर्व भारतीय संस्कृती होय.
शास्त्रीजींनी इतरत्र
असेही म्हटलेले आहे की, 'आजच्या हिंदू धर्मात आर्य संस्कृतीपेक्षा, आर्येतर
किंवा अनार्य संस्कृतीचा सहभाग जास्त आहे.'.
भारतात
आर्याचे आगमन होण्यापूर्वी आणि वर उल्लेखिलेल्या भूमध्य समुद्रीय
लोकांचेसुद्धा भारतात स्थिरस्थावर होण्यापूर्वी, नेग्रिटो, प्रोटो,
ऑस्ट्रेलाईड, मंगोलाईड, मुंड, मुखमेर वगैरे दुसरे अनेक वंश वेगवेगळ्या वेळी
भारतात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले होते आणि त्यांच्याही
संस्कृतींचे विपुल अंश सध्याच्या हिंदू संस्कृतीत अंतर्भूत आहेत. तरीही मानववंश विस्तार आफ्रिकेतून इतर भागात झाला का हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कारण अगदी म्यानमार व ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी फार जुने मानवी जीवाश्म सापडत आहेत. वर
वर्णिलेली सिंधुसंस्कृती केव्हा आणि कशी नष्ट झाली ते आपण पुढे पाहू.